शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
2
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
3
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
4
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
5
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
6
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
7
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
8
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
9
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
10
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
11
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
12
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
13
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
14
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
15
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
16
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
17
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
18
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
19
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
20
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ बैठकीत ‘सचिव हाजिर हो’!, प्रत्येक खात्याची होणार चीरफाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 05:04 IST

राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय आणि त्यांची संबंधित विभागाने केलेली अंमलबजावणी याचे रिपोर्ट कार्ड विभागाच्या सचिवांना थेट मंत्रिमंडळ बैठकीतच सादर करावे लागणार आहे.

विशेष प्रतिनिधीमुंबई : राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय आणि त्यांची संबंधित विभागाने केलेली अंमलबजावणी याचे रिपोर्ट कार्ड विभागाच्या सचिवांना थेट मंत्रिमंडळ बैठकीतच सादर करावे लागणार आहे. मंगळवारच्या बैठकीत जलसंपदा विभागापासून या निर्णयाची अंमलबजावणी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही पद्धत सुरू करण्याचा निर्णय घेतला असून सचिवांच्या सादरीकरणानंतर त्यांना कोणीही मंत्री प्रश्न देखील विचारू शकणार आहे.सूत्रांनी सांगितले की, सरकार म्हणून घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी कितपत केली जाते या बद्दल नोकरशाहीला उत्तरदायी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा पुढाकार घेतला आहे. जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल यांनी गेल्या तीन वर्षांत जलसंपदा विभागाशी संबंधित झालेले मंत्रिमंडळ निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी याचा लेखाजोखा सादर केला.जलसंपदा विभागाशी संबंधित ३८ निर्णय गेल्या तीन वर्षांत घेण्यात आले आणि त्यापैकी २० निर्णयांची अंमलबजावणी झाली असून १८ निर्णय अंमलबजावणीच्या प्रक्रियेत आहेत, अशी माहिती चहल यांनी दिली. धरणांमधून बंद पाइपलाइनने पाणी पुरवठा करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. सिंचन प्रकल्पांसाठी थेट शेतकºयांकडून जमिनीची खरेदी करण्याचा निर्णयही अंमलात आला असून त्याद्वारे १६ हजार ५०० हेक्टर जमीन गेल्या दोन वर्षांत खरेदी करण्यात आली आहे, अशी माहिती चहल यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांत पूर्ण झालेले ९३ प्रकल्प, त्यातून निर्माण झालेले सिंचन, किती प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली याची माहितीही चहल यांनी बैठकीत दिली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार