शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

मुंबईत भाजपा प्रदेश कार्यकारणीची बैठक; मंत्रिमंडळातील खांदेपालटावर चर्चेची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 11:38 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यकारणीची बैठक होणार आहे.

ठळक मुद्दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत भाजप प्रदेश कार्यकारणीची बैठक होणार आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मंत्रिमंडळातील खांदेपालटावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

मुंबई, दि. 16- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यकारणीची बैठक होणार आहे.  आज संध्याकाळी 6 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मंत्रिमंडळातील खांदेपालटावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 

घोटाळ्याचे आरोप झालेले गृहनिर्माण राज्यमंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती पण मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मंत्र्यांची पाठराखण केली. सध्या राजीनामा देण्याची गरज नाही, चौकशी पूर्ण होऊ द्या, त्यानंतर बघू, असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. लोकायुक्तांमार्फत मेहतांची चौकशी होणार आहे. मात्र विरोधकांनी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे रावसाहेब दानवे आणि आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांचीही मंत्रिमंडळातून गच्छंती होण्याची शक्यता आहे.

आणखी बातम्या वाचा

तामिळनाडूप्रमाणे आता कर्नाटकात 10 रुपयात मिळणार जेवणाची थाळी

26/11 सारखा हल्ला रोखण्यासाठी कोस्ट गार्डसाठी 32 हजार कोटींचा प्लान मंजूर

रावसाहेब दानवे यांच्या सततच्या वादग्रस्त विधानामुळे त्यांना मंत्रिमंडळातून नारळ देण्यात येईल, अशी शक्यता वर्तविली जाते आहे. दानवेंनी शेतकऱ्यांबद्दल केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर लक्ष्मीदर्शन घेण्याचा सल्ला आणि आता थकवलेलं वीज बिल. त्यामुळे दानवेंबद्दल चर्चांना उधाण आलं आहे. तर याशिवाय गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचं नावही रडारवर आहे. एमपी मिल कंपाऊंडचा एफएसआय खासगी बिल्डरच्या घशात घालण्यासाठी यांनी फाईलवर थेट मुख्यमंत्र्यांचं नाव वापरण्याची कमाल केली. एसआरए घोटाळ्याची ही मालिका मुख्यमंत्र्यांसाठी अडचणीची ठरु लागली आहे.  शिवाय मेहतांना हटवलं नाही, तर खडसेंवर अन्याय झाल्याची भावना एका समाजात बळावू शकते आणि सरकार बिल्डरधार्जिणं असल्याचा प्रचारही वाढू शकतो. त्यामुळे मेहतांना विश्रांती देण्याची सक्ती होणार आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मंत्रिमंडळात खांदेपालट होण्याच्या यादीत आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचंही नाव चर्चेत आहे. पालघर जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. एप्रिल 2016 पासून तब्बल 600 आदिवासी मुलं कुपोषणाने दगावली. त्यामुळे सावरांच्या कारभारावर मुख्यमंत्री नाखुश असल्याचं बोललं जातं आहे.  

दरम्यान, आज होणाऱ्या भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत नेमकं काय होणार ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.