शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

पाणी ओसरल्यानंतर पुरग्रस्त भागात रोगराई पसरण्याची भीती, अमित देशमुखांनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 15:57 IST

Maharashtra Flood: 'राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन जनतेची मदत करण्याची ही वेळ आहे.'

ठळक मुद्देपुराचे पाणी ओसरल्यानंतर आता नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई: राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात तर महापूराची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. आता या पुराचे पाणी ओसरत असले तरी, नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लेप्टो, डेंग्यूसह इतर साथीचे रोग पसरु नयेत यासाठी पूरग्रस्त जिल्ह्यात मेडीकल कॅम्प उभारले जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. 

पाऊस कमी झाल्यामुळे पुराचे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. पण, त्यामुळे चिखल आणि घाणीचे साम्राज्य प्रत्येक गावात पाहायला मिळत आहे. यामुळे रोगराई वाढण्याची भीती आहे. दरम्यान, या प्रत्येक जिल्ह्यात आता मेडिकल कॅम्प उभारले जाणार आहेत. याबाबत बोलताना अमित देशमुख म्हणाले की, ही परिस्थिती खूप भीषण आहे. आता महापुरानंतर लेप्टो, डेंग्यू आणि इतर साथीचे रोग पसरू नये यासाठी पूरग्रस्त जिल्ह्यात मेडीकल कॅम्प उभारले जाणार आहेत. तिथल्या तिथे मेडीकल सुविधा पोहोचवण्यासाठी डॉक्टरांची टीम रवाना केली आहे. राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन जनतेची मदत करण्याची ही वेळ आहे.

दोन दिवसांपूर्वीच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील पूरस्थिग्रस्त नागरिकांना लागणारी सर्व मदत राज्य सरकारकडून केली जाईल, असे सांगितले आहे. तसेच, आरोग्य विभागाच्या दृष्टीनं पुराच्या तडाख्यात सापडलेल्या गावात एक डॉक्टर आणि नर्सेस यांचा गट तयार करुन ठेवण्यात आला आहे. त्यासोबत आरोग्यविषयक सर्व साहित्य, औषधांची कुमक पाठवण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

टॅग्स :floodपूरAmit Deshmukhअमित देशमुखRainपाऊस