शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

‘मी टू’ चळवळ दीर्घकाळ चालणारी नाही - अ‍ॅड. वैशाली भागवत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 1:37 AM

‘मी टू’ चळवळीची सोशल मीडियावर बूम झाली. लोकांनी चांगल्या-वाईट प्रतिक्रिया दिल्या. पण त्यातील कितीतरी केसेस या तक्रारीपर्यंत गेल्या नाहीत.

पुणे - ‘मी टू’ चळवळीची सोशल मीडियावर बूम झाली. लोकांनी चांगल्या-वाईट प्रतिक्रिया दिल्या. पण त्यातील कितीतरी केसेस या तक्रारीपर्यंत गेल्या नाहीत. आपल्या व्यथा मांडण्याचे सोशल मीडिया हे माध्यम नाही. कारण त्यातून महिलांना न्याय मिळणार नाही. त्यामुळे ‘मी टू’ चळवळीला जरी सामाजिक मूल्य असले तरी अशा चळवळी दीर्घकाळ चालणाऱ्या नाहीत, अशा शब्दात अ‍ॅड. वैशाली भागवत यांनी ‘मी टू’ चळवळीवर परखड भाष्य केले.युनिव्हर्सिटी विमेन्स असोसिएशन पुणेच्या वतीने ‘कामाच्या ठिकाणी महिलांची लैगिंक छळवणूक- प्रतिबंध, संरक्षण आणि उपाय कायदा २०१३’ याविषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ‘मी टू चळवळीपासून आयसीसीच्या कार्यवाहीचे वेगळेपण’ यावर त्यांनी विचार व्यक्त केले. या वेळी असोसिएशनच्या अध्यक्षा शबनम पुनावला उपस्थित होत्या.अ‍ॅड. भागवत म्हणाल्या, महिलांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळासंदर्भातील तक्रारी करण्यासाठी संस्था, कंपन्यांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ‘मी टू’सारख्या केसेसमध्ये विशाखा समिती योग्य ती भूमिका निभावू शकते. अनेकवेळा ‘मी टू’मधल्या तक्रारी अनामिक असू शकतात. ही चळवळ एकाच बाजूची आहे. केवळ पीडित महिलाच आपले म्हणणे मांडत आहेत. कुणाचे नाव पुरावे नसताना घेतले जात आहे. मात्र लिखित तक्रार करायला एकही महिला पुढे येत नाही.अ‍ॅड. अनंत रणदिवे यांनी ‘कामाच्या ठिकाणी महिलांची लंैगिक छळवणूक-प्रतिबंध, संरक्षण आणि उपाय कायदा २०१३’ मधील त्रुटींवर बोट ठेवले. महिलेने सहा महिन्यांच्या आत तक्रार करणे बंधनकारक आहे, जर हे झाले नाही तर तिची तक्रार ग्राह्य धरली जात नाही. यामुळे आरोपीला अभय मिळते. कुठल्याही संस्थेला आपले नाव बदनाम झालेले चालत नाही. त्यामुळे तडजोडीचे प्रकार घडतात. गेल्या पाच वर्षात फक्त २३ केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. तिने नुकसानभरपाईसाठी तक्रार दाखल केली आहे. असा एक सिग्मा आहे. या कायद्याअंतर्गत आरोप सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीला शिक्षेची तरतूद करणे आवश्यक आहे.अ‍ॅड. श्रुती जोशी यांनी कामाच्या ठिकाणी होणाºया लैंगिक छळाच्या मानसिक सामाजिक पैलूंवर प्रकाश टाकला. कामाच्या ठिकाणी बॉस किंवा वरिष्ठ अधिकारीच लैंगिक छळाचे अधिकांश आरोपी असतात. मग तक्रार कुणाकडे करायची असा प्रश्न पडतो. कामाच्या ठिकाणी नवीन रूजू झालेली किंवा करारावर रूजू झालेल्यांना हा त्रास अधिक दिला जातो. विधवा, एकल महिला या देखील त्याच्या बळी ठरतात. त्यामुळे महिलांमध्ये नैराश्य येते. नकारात्मक भावना यायला सुरुवात होते. कुणाला सांगितले तर नोकरी सोडण्यास भाग पाडले जाते. माझेच काहीतरी चुकतेय स्वत:लाच दोष दिला जातो.त्यामुळे ज्या वेळी नवीन ठिकाणी कामासाठी रूजू व्हाल, तेव्हा कंपनीचे नियम समजावून घ्या. आपल्या वैयक्तिक गोष्टी कुणाला सांगू नका. संवाद साधताना योग्य शब्दांचा वापर करा आपल्या बोलण्यातून कोणतेही संकेत मिळता कामा नयेत. कामाच्या ठिकाणचा लैंगिक छळ हे एकप्रकारचे शोषण असते.

टॅग्स :Metoo CampaignमीटूWomenमहिला