शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

महापौरपद सेनेकडे !

By admin | Updated: March 4, 2017 06:20 IST

राज्यातील सरकारचे स्थैर्य आणि काही जिल्हा परिषदांतील सत्ता समीकरणांचा विचार करून भाजपाने नरमाईची भूमिका घेतली

मुंबई : मुंबई महापौरपदासाठी शिवसेनेची जुळवाजुळव सुरू असतानाच राज्यातील सरकारचे स्थैर्य आणि काही जिल्हा परिषदांतील सत्ता समीकरणांचा विचार करून भाजपाने नरमाईची भूमिका घेतली असून दिल्लीच्या आदेशावरून महापौरपद शिवसेनेला देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकूलता दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांनी लावलेली हजेरी, युतीबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेले सकारात्मक वक्तव्य आणि रात्री झालेल्या भाजपाच्या कोअर कमिटीतील चर्चेचा एकूण सूर बघता मुंबई महापौरपदासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे संकेत मिळतात. शिवाय, स्वत: मुख्यमंत्रीदेखील युतीसाठी अनुकूल असल्याचे त्यांच्या निकटस्थांनी सांगितले. मात्र, उपमहापौरपदासोबतच स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा मात्र भाजपा आग्रह धरेल, असे सूत्रांकडून समजते.>स्थायी समितीचे अध्यक्षपद मात्र हवे मुंबईच्या विकासाकरता आम्ही एकत्र येऊ इच्छितो. याचा अर्थ आम्ही सेनेसमोर नमते घेतले असा अजिबात होत नाही, असे भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. ते म्हणाले की, आम्ही शिवसेनेशी चर्चा करताना अडीच वर्षे नाही तर किमान दोन वर्षांसाठी महापौरपद द्यावे, अशी भूमिका मांडू. याशिवाय, स्थायी आणि अन्य समित्यांच्या अध्यक्षपदाचीही मागणी केली जाईल. >सेना बाहेर पडल्यास राज्याच्या स्थैर्यावर परिणामसेनेला बाजूला सारून मुंबई महापालिकेची सत्ता मिळविणे अवघड नाही, पण त्याचा परिणाम राज्य सरकारच्या स्थैर्यावर होऊ शकतो. भाजपाचा महापौर झाल्यास सेना कमालीची दुखावेल.ते सरकारमधून बाहेर पडू शकतील किंवा सरकारमध्ये राहून दररोज काही ना काही कटकटी दोन पक्षांमध्ये सुरू राहतील, असे भाजपामधील ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे. >स्वबळावर सत्ता स्थापन केल्यास धक्का देणारमुंबईत शिवसेनेसोबत युती करण्याची भाजपाची इच्छा आहे, मात्र भाजपाला सोबत न घेता स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला तर शिवसेनेला हिसका देऊन त्यांना धक्का देण्याची भाजपाची तयारी आहे, असा सूचक इशारा भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिला.>मंत्रिमंडळात एकमतनिवडणूक निकालानंतर शुक्रवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीला दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, डॉ. दीपक सावंत आदी शिवसेना मंत्री हजर होते. बैठकीतील सर्व निर्णय भाजपा-शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकमताने घेतले. एवढेच नव्हे तर ६ मार्चपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातील राज्यपालांच्या अभिभाषणाचा मसुदाही एकमताने मंजूर करण्यात आला. बैठक संपल्यानंतर शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी, मंत्रिमंडळ बैठक पारदर्शक व्हावी म्हणून विरोधी पक्षनेते, पत्रकार यांनाही या बैठकीला बसू द्यावे, अशी मागणी केली. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका मांडलेली आहेच, असे ते म्हणाले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केवळ स्मित केले.