शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

महापौरपद सेनेकडे !

By admin | Updated: March 4, 2017 06:20 IST

राज्यातील सरकारचे स्थैर्य आणि काही जिल्हा परिषदांतील सत्ता समीकरणांचा विचार करून भाजपाने नरमाईची भूमिका घेतली

मुंबई : मुंबई महापौरपदासाठी शिवसेनेची जुळवाजुळव सुरू असतानाच राज्यातील सरकारचे स्थैर्य आणि काही जिल्हा परिषदांतील सत्ता समीकरणांचा विचार करून भाजपाने नरमाईची भूमिका घेतली असून दिल्लीच्या आदेशावरून महापौरपद शिवसेनेला देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकूलता दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांनी लावलेली हजेरी, युतीबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेले सकारात्मक वक्तव्य आणि रात्री झालेल्या भाजपाच्या कोअर कमिटीतील चर्चेचा एकूण सूर बघता मुंबई महापौरपदासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे संकेत मिळतात. शिवाय, स्वत: मुख्यमंत्रीदेखील युतीसाठी अनुकूल असल्याचे त्यांच्या निकटस्थांनी सांगितले. मात्र, उपमहापौरपदासोबतच स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा मात्र भाजपा आग्रह धरेल, असे सूत्रांकडून समजते.>स्थायी समितीचे अध्यक्षपद मात्र हवे मुंबईच्या विकासाकरता आम्ही एकत्र येऊ इच्छितो. याचा अर्थ आम्ही सेनेसमोर नमते घेतले असा अजिबात होत नाही, असे भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. ते म्हणाले की, आम्ही शिवसेनेशी चर्चा करताना अडीच वर्षे नाही तर किमान दोन वर्षांसाठी महापौरपद द्यावे, अशी भूमिका मांडू. याशिवाय, स्थायी आणि अन्य समित्यांच्या अध्यक्षपदाचीही मागणी केली जाईल. >सेना बाहेर पडल्यास राज्याच्या स्थैर्यावर परिणामसेनेला बाजूला सारून मुंबई महापालिकेची सत्ता मिळविणे अवघड नाही, पण त्याचा परिणाम राज्य सरकारच्या स्थैर्यावर होऊ शकतो. भाजपाचा महापौर झाल्यास सेना कमालीची दुखावेल.ते सरकारमधून बाहेर पडू शकतील किंवा सरकारमध्ये राहून दररोज काही ना काही कटकटी दोन पक्षांमध्ये सुरू राहतील, असे भाजपामधील ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे. >स्वबळावर सत्ता स्थापन केल्यास धक्का देणारमुंबईत शिवसेनेसोबत युती करण्याची भाजपाची इच्छा आहे, मात्र भाजपाला सोबत न घेता स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला तर शिवसेनेला हिसका देऊन त्यांना धक्का देण्याची भाजपाची तयारी आहे, असा सूचक इशारा भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिला.>मंत्रिमंडळात एकमतनिवडणूक निकालानंतर शुक्रवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीला दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, डॉ. दीपक सावंत आदी शिवसेना मंत्री हजर होते. बैठकीतील सर्व निर्णय भाजपा-शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकमताने घेतले. एवढेच नव्हे तर ६ मार्चपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातील राज्यपालांच्या अभिभाषणाचा मसुदाही एकमताने मंजूर करण्यात आला. बैठक संपल्यानंतर शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी, मंत्रिमंडळ बैठक पारदर्शक व्हावी म्हणून विरोधी पक्षनेते, पत्रकार यांनाही या बैठकीला बसू द्यावे, अशी मागणी केली. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका मांडलेली आहेच, असे ते म्हणाले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केवळ स्मित केले.