शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
5
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
6
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
7
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
8
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
9
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
10
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
11
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
12
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
13
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
14
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
15
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
16
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
17
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
18
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
19
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
20
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ

अत्यावश्यक २१ औषधांच्या कमाल किमती आता ५० टक्क्यांनी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 06:17 IST

अत्यावश्यक औषधे रुग्णाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावीत यासाठी ‘राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणा’कडून (एनपीपीए) औषधाच्या किमतींवर नियंत्रण आणले जाते. मात्र औषधांमधील मूळ घटकद्रव्ये, उत्पादन किमतींत वाढ झाल्याने औषधांच्या कमाल किमती वाढविण्याची मागणी कंपन्यांनी केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : २१ अत्यावश्यक औषधांच्या कमाल किमतींत ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने घेतला आहे. यात बीसीजी लस, हिवताप, कुष्ठरोग अशा आजारांवरील औषधांचा समावेश आहे.

अत्यावश्यक औषधे रुग्णाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावीत यासाठी ‘राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणा’कडून (एनपीपीए) औषधाच्या किमतींवर नियंत्रण आणले जाते. मात्र औषधांमधील मूळ घटकद्रव्ये, उत्पादन किमतींत वाढ झाल्याने औषधांच्या कमाल किमती वाढविण्याची मागणी कंपन्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर बाजारात या अत्यावश्यक औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून एनपीपीएने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविषयी राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने म्हटले आहे की, ही औषधे प्रथम श्रेणी उपचारांच्या श्रेणीत येतात. ही देशातील लोकांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. औषधांची उत्पादन किंमत, मूळ घटकद्रव्यांमध्ये वाढ झाली. त्यामुळे औषधांच्या किमतींमध्येही वाढ व्हावी, अशी मागणी औषधनिर्मिती तसेच औषध विक्रेत्या कंपन्यांनी केली होती. औषध उत्पादन परवड नसल्याने हळूहळू औषधांचा तुटवडा बाजारात निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे आजारांवरील आवश्यक औषधे बाजारात उपलब्ध न होण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.

एनपीपीएच्या बैठकांमधून केलेल्या औषधांचा प्रस्ताव नीती आयोगाच्या परवडणारी औषधे आणि आरोग्य उत्पादने या स्थायी समितीकडे पाठविण्यात आला. यावर समितीने औषधांच्या कमाल किमतीमध्ये एकाच वेळेस ५० टक्के वाढ करण्यास मान्यता दिली. त्यानुसार औषध किंमत नियंत्रण आदेश (डीपीसीओ) २०१३ चा संदर्भ देत औषधांच्या कमाल किमतीमध्ये अशा रीतीने एनपीपीएने प्रथमच वाढ केली आहे. या औषधांमध्ये बीसीजी लस, जीवनसत्त्व ड यासह हिवताप, कुष्ठरोग इत्यादी आजारांवरील अत्यावश्यक औषधांचा समावेश आहे.पुनर्विचार करणे गरजेचेजन आरोग्य अभियानाचे डॉ. अभिजित मोरे यांनी सांगितले की, राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने सरसकट औषधांच्या किमतींत केलेली वाढ चुकीची आहे. यामुळे रुग्णांची हेळसांड होणार असून आरोग्यसेवेवरही याचा परिणाम होताना दिसेल. त्यामुळे याचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे.