शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

अत्यावश्यक २१ औषधांच्या कमाल किमती आता ५० टक्क्यांनी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 06:17 IST

अत्यावश्यक औषधे रुग्णाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावीत यासाठी ‘राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणा’कडून (एनपीपीए) औषधाच्या किमतींवर नियंत्रण आणले जाते. मात्र औषधांमधील मूळ घटकद्रव्ये, उत्पादन किमतींत वाढ झाल्याने औषधांच्या कमाल किमती वाढविण्याची मागणी कंपन्यांनी केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : २१ अत्यावश्यक औषधांच्या कमाल किमतींत ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने घेतला आहे. यात बीसीजी लस, हिवताप, कुष्ठरोग अशा आजारांवरील औषधांचा समावेश आहे.

अत्यावश्यक औषधे रुग्णाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावीत यासाठी ‘राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणा’कडून (एनपीपीए) औषधाच्या किमतींवर नियंत्रण आणले जाते. मात्र औषधांमधील मूळ घटकद्रव्ये, उत्पादन किमतींत वाढ झाल्याने औषधांच्या कमाल किमती वाढविण्याची मागणी कंपन्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर बाजारात या अत्यावश्यक औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून एनपीपीएने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविषयी राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने म्हटले आहे की, ही औषधे प्रथम श्रेणी उपचारांच्या श्रेणीत येतात. ही देशातील लोकांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. औषधांची उत्पादन किंमत, मूळ घटकद्रव्यांमध्ये वाढ झाली. त्यामुळे औषधांच्या किमतींमध्येही वाढ व्हावी, अशी मागणी औषधनिर्मिती तसेच औषध विक्रेत्या कंपन्यांनी केली होती. औषध उत्पादन परवड नसल्याने हळूहळू औषधांचा तुटवडा बाजारात निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे आजारांवरील आवश्यक औषधे बाजारात उपलब्ध न होण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.

एनपीपीएच्या बैठकांमधून केलेल्या औषधांचा प्रस्ताव नीती आयोगाच्या परवडणारी औषधे आणि आरोग्य उत्पादने या स्थायी समितीकडे पाठविण्यात आला. यावर समितीने औषधांच्या कमाल किमतीमध्ये एकाच वेळेस ५० टक्के वाढ करण्यास मान्यता दिली. त्यानुसार औषध किंमत नियंत्रण आदेश (डीपीसीओ) २०१३ चा संदर्भ देत औषधांच्या कमाल किमतीमध्ये अशा रीतीने एनपीपीएने प्रथमच वाढ केली आहे. या औषधांमध्ये बीसीजी लस, जीवनसत्त्व ड यासह हिवताप, कुष्ठरोग इत्यादी आजारांवरील अत्यावश्यक औषधांचा समावेश आहे.पुनर्विचार करणे गरजेचेजन आरोग्य अभियानाचे डॉ. अभिजित मोरे यांनी सांगितले की, राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने सरसकट औषधांच्या किमतींत केलेली वाढ चुकीची आहे. यामुळे रुग्णांची हेळसांड होणार असून आरोग्यसेवेवरही याचा परिणाम होताना दिसेल. त्यामुळे याचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे.