शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: सर्वात मोठी बातमी! भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा
2
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
3
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
4
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
5
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
6
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
7
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
8
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
9
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
10
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
11
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
12
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
13
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
14
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
15
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
16
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
17
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
18
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
19
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
20
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती

विद्यार्थ्यांसाठी गणित कठीणच! आकलन क्षमता कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 06:54 IST

विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसलेला असो किंवा पाचवीला, त्याला सर्वात जास्त भीती कोणत्या विषयाची असेल किंवा तुला कोणता विषय जास्त अवघड वाटतो, असा प्रश्न विचारला, तर बहुतांश विद्यार्थ्यांचे हमखास उत्तर गणित हेच असते.

मुंबई : विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसलेला असो किंवा पाचवीला, त्याला सर्वात जास्त भीती कोणत्या विषयाची असेल किंवा तुला कोणता विषय जास्त अवघड वाटतो, असा प्रश्न विचारला, तर बहुतांश विद्यार्थ्यांचे हमखास उत्तर गणित हेच असते. नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेच्या दुसऱ्या टप्प्यानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांची गणित विषयातील प्रगती इतर विषयांच्या तुलनेत अत्यंत खालावलेली असल्याचे समोर आले आहे. राज्यातील केवळ सरासरी ३३.५७ टक्के विद्यार्थी गणितात योग्य प्रकारे उत्तरे देऊ शकत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. इतर विषयांच्या तुलनेत ही टक्केवारी सगळ्यात कमी असल्याने विद्यार्थ्यांच्या मनातील गणित विषयाची भीती यातून समोर दिसून येते.राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) शैक्षणिक सर्वेक्षण विभागाने देशभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेविषयी भाग-२ चे सर्वेक्षण (न्यास ) नुकतेच पूर्ण केले. त्यानुसार, प्रत्येक राज्याच्या जिल्ह्यांचे प्रगतिपुस्तक जारी केले आहे. यात हे प्रगतिपुस्तक प्रत्येक प्रकारच्या शाळेतील, गणित, इंग्रजी, समाजशास्त्र, विज्ञान आणि नवीन भाषा या विषयांतील विद्यार्थ्यांच्या संपादणूक क्षमतेवर आधारित आहे.या सर्वेक्षणानुसार, राज्यातील विद्यार्थ्यांची गणित विषयातील कामगिरी अत्यंत कमी म्हणजेच ३३.५७% इतकी आहे. मुंबई उपनगरतील विद्यार्थ्यांची गणितातील कामगिरी २७.११% असून, मुंबईतील विद्यार्थ्यांची टक्केवारी ३५.२२% आहे. यामध्येही बीजगणितातील राज्यातील विद्यार्थ्यांची कामगिरी ३३.८२ % तर मुंबई उपनगर व मुंबईतील विद्यार्थ्यांची कामगिरी अनुक्रमे २८.५७ % आणि ३६.३८ टक्के आहे.भूमितीतील राज्यातील विद्यार्थ्यांची कामगिरी ३७.२२ % इतकी आहे. मुंबई उपनगर व मुंबईतील विद्यार्थ्यांची भूमितीतील कामगिरी अनुक्रमे २९.६५ % आणि ४०.४१ % इतकी आहे. आकडेवारीमध्ये राज्यातील विद्यार्र्थ्यांची सरासरी कामगिरी ३०.५७ % इतकी आहे. २४.०४ % आणि २७.६० % ही कामगिरी मुंबई उपनगर व मुंबई शहरातील विद्यार्थ्यांची असल्याचे समोर आले आहे. संख्या प्रणाली, त्रिकोणमिती, संभाव्यता, समनव्य भूमिती यांची आकडेवारी या सर्वेक्षणातून समोर आली असून, कोणत्याच विषयांची सरासरी आकलन क्षमता ४५%च्या वर नसल्याचे समोर आले आहे. यावरून दहावीच्या विद्यार्थ्यांना वाटणारी भीती त्यांच्या आकलन क्षमतेच्या पातळीवर अवलंबून असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र