शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

विद्यार्थ्यांसाठी गणित कठीणच! आकलन क्षमता कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 06:54 IST

विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसलेला असो किंवा पाचवीला, त्याला सर्वात जास्त भीती कोणत्या विषयाची असेल किंवा तुला कोणता विषय जास्त अवघड वाटतो, असा प्रश्न विचारला, तर बहुतांश विद्यार्थ्यांचे हमखास उत्तर गणित हेच असते.

मुंबई : विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसलेला असो किंवा पाचवीला, त्याला सर्वात जास्त भीती कोणत्या विषयाची असेल किंवा तुला कोणता विषय जास्त अवघड वाटतो, असा प्रश्न विचारला, तर बहुतांश विद्यार्थ्यांचे हमखास उत्तर गणित हेच असते. नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेच्या दुसऱ्या टप्प्यानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांची गणित विषयातील प्रगती इतर विषयांच्या तुलनेत अत्यंत खालावलेली असल्याचे समोर आले आहे. राज्यातील केवळ सरासरी ३३.५७ टक्के विद्यार्थी गणितात योग्य प्रकारे उत्तरे देऊ शकत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. इतर विषयांच्या तुलनेत ही टक्केवारी सगळ्यात कमी असल्याने विद्यार्थ्यांच्या मनातील गणित विषयाची भीती यातून समोर दिसून येते.राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) शैक्षणिक सर्वेक्षण विभागाने देशभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेविषयी भाग-२ चे सर्वेक्षण (न्यास ) नुकतेच पूर्ण केले. त्यानुसार, प्रत्येक राज्याच्या जिल्ह्यांचे प्रगतिपुस्तक जारी केले आहे. यात हे प्रगतिपुस्तक प्रत्येक प्रकारच्या शाळेतील, गणित, इंग्रजी, समाजशास्त्र, विज्ञान आणि नवीन भाषा या विषयांतील विद्यार्थ्यांच्या संपादणूक क्षमतेवर आधारित आहे.या सर्वेक्षणानुसार, राज्यातील विद्यार्थ्यांची गणित विषयातील कामगिरी अत्यंत कमी म्हणजेच ३३.५७% इतकी आहे. मुंबई उपनगरतील विद्यार्थ्यांची गणितातील कामगिरी २७.११% असून, मुंबईतील विद्यार्थ्यांची टक्केवारी ३५.२२% आहे. यामध्येही बीजगणितातील राज्यातील विद्यार्थ्यांची कामगिरी ३३.८२ % तर मुंबई उपनगर व मुंबईतील विद्यार्थ्यांची कामगिरी अनुक्रमे २८.५७ % आणि ३६.३८ टक्के आहे.भूमितीतील राज्यातील विद्यार्थ्यांची कामगिरी ३७.२२ % इतकी आहे. मुंबई उपनगर व मुंबईतील विद्यार्थ्यांची भूमितीतील कामगिरी अनुक्रमे २९.६५ % आणि ४०.४१ % इतकी आहे. आकडेवारीमध्ये राज्यातील विद्यार्र्थ्यांची सरासरी कामगिरी ३०.५७ % इतकी आहे. २४.०४ % आणि २७.६० % ही कामगिरी मुंबई उपनगर व मुंबई शहरातील विद्यार्थ्यांची असल्याचे समोर आले आहे. संख्या प्रणाली, त्रिकोणमिती, संभाव्यता, समनव्य भूमिती यांची आकडेवारी या सर्वेक्षणातून समोर आली असून, कोणत्याच विषयांची सरासरी आकलन क्षमता ४५%च्या वर नसल्याचे समोर आले आहे. यावरून दहावीच्या विद्यार्थ्यांना वाटणारी भीती त्यांच्या आकलन क्षमतेच्या पातळीवर अवलंबून असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र