शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
4
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
5
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
6
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
7
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
9
Viral Video: लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
10
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
11
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
12
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम
13
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
14
पैशाचा खेळ! ऑनलाईन सेलचं धक्कादायक सत्य; घाईत महागड्या वस्तुंची खरेदी, बेस्ट डील कोणती?
15
GST कपात व्यतिरिक्त नवीन गाडी घेताना १५ हजारांची करा बचत! खरेदी करण्यापूर्वी वापरा 'या' ५ स्मार्ट टिप्स!
16
इस्रायलवर भारताचे मोठे उपकार! १०० वर्षांनी समोर आलं 'हाइफा' शहराच्या इतिहासातील सत्य, काय घडलं?
17
जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय...
18
कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल
19
Rakhi Sawant : Video - "डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडील, मी तान्या मित्तलपेक्षा श्रीमंत..."; राखी सावंतचा मोठा दावा
20
लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, पहिल्याच दिवशी मोठं नुकसान; लागलं लोअर सर्किट

विद्यार्थ्यांसाठी गणित कठीणच! आकलन क्षमता कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 06:54 IST

विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसलेला असो किंवा पाचवीला, त्याला सर्वात जास्त भीती कोणत्या विषयाची असेल किंवा तुला कोणता विषय जास्त अवघड वाटतो, असा प्रश्न विचारला, तर बहुतांश विद्यार्थ्यांचे हमखास उत्तर गणित हेच असते.

मुंबई : विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसलेला असो किंवा पाचवीला, त्याला सर्वात जास्त भीती कोणत्या विषयाची असेल किंवा तुला कोणता विषय जास्त अवघड वाटतो, असा प्रश्न विचारला, तर बहुतांश विद्यार्थ्यांचे हमखास उत्तर गणित हेच असते. नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेच्या दुसऱ्या टप्प्यानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांची गणित विषयातील प्रगती इतर विषयांच्या तुलनेत अत्यंत खालावलेली असल्याचे समोर आले आहे. राज्यातील केवळ सरासरी ३३.५७ टक्के विद्यार्थी गणितात योग्य प्रकारे उत्तरे देऊ शकत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. इतर विषयांच्या तुलनेत ही टक्केवारी सगळ्यात कमी असल्याने विद्यार्थ्यांच्या मनातील गणित विषयाची भीती यातून समोर दिसून येते.राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) शैक्षणिक सर्वेक्षण विभागाने देशभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेविषयी भाग-२ चे सर्वेक्षण (न्यास ) नुकतेच पूर्ण केले. त्यानुसार, प्रत्येक राज्याच्या जिल्ह्यांचे प्रगतिपुस्तक जारी केले आहे. यात हे प्रगतिपुस्तक प्रत्येक प्रकारच्या शाळेतील, गणित, इंग्रजी, समाजशास्त्र, विज्ञान आणि नवीन भाषा या विषयांतील विद्यार्थ्यांच्या संपादणूक क्षमतेवर आधारित आहे.या सर्वेक्षणानुसार, राज्यातील विद्यार्थ्यांची गणित विषयातील कामगिरी अत्यंत कमी म्हणजेच ३३.५७% इतकी आहे. मुंबई उपनगरतील विद्यार्थ्यांची गणितातील कामगिरी २७.११% असून, मुंबईतील विद्यार्थ्यांची टक्केवारी ३५.२२% आहे. यामध्येही बीजगणितातील राज्यातील विद्यार्थ्यांची कामगिरी ३३.८२ % तर मुंबई उपनगर व मुंबईतील विद्यार्थ्यांची कामगिरी अनुक्रमे २८.५७ % आणि ३६.३८ टक्के आहे.भूमितीतील राज्यातील विद्यार्थ्यांची कामगिरी ३७.२२ % इतकी आहे. मुंबई उपनगर व मुंबईतील विद्यार्थ्यांची भूमितीतील कामगिरी अनुक्रमे २९.६५ % आणि ४०.४१ % इतकी आहे. आकडेवारीमध्ये राज्यातील विद्यार्र्थ्यांची सरासरी कामगिरी ३०.५७ % इतकी आहे. २४.०४ % आणि २७.६० % ही कामगिरी मुंबई उपनगर व मुंबई शहरातील विद्यार्थ्यांची असल्याचे समोर आले आहे. संख्या प्रणाली, त्रिकोणमिती, संभाव्यता, समनव्य भूमिती यांची आकडेवारी या सर्वेक्षणातून समोर आली असून, कोणत्याच विषयांची सरासरी आकलन क्षमता ४५%च्या वर नसल्याचे समोर आले आहे. यावरून दहावीच्या विद्यार्थ्यांना वाटणारी भीती त्यांच्या आकलन क्षमतेच्या पातळीवर अवलंबून असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र