शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वच्छता हीच सेवा मोहीम, स्वच्छ महाराष्ट्र साकारण्यासाठी व्यापक जनचळवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 15:13 IST

स्वच्छ महाराष्ट्र साकारण्यासाठी व्यापक जनचळवळ उभारण्याचे आवाहन करीत राज्य शासनाने स्वच्छता हीच सेवा ही मोहीम हाती घेतली आहे. १५ डिसेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतीमध्येही स्वच्छता हीच सेवा हा विषय घेऊन ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

अमरावती, दि. 14 - स्वच्छ महाराष्ट्र साकारण्यासाठी व्यापक जनचळवळ उभारण्याचे आवाहन करीत राज्य शासनाने स्वच्छता हीच सेवा ही मोहीम हाती घेतली आहे. १५ डिसेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतीमध्येही स्वच्छता हीच सेवा हा विषय घेऊन ही मोहीम राबविण्यात येणार आहे.स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर रानातही स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ही मोहीम प्रभावीपणे यशस्वी करावी, असे आवाहन नगरविकास विभागाने केले आहे. १५ सप्टेंबरला स्वच्छता हीच सेवा या मोहिमेला औपचारिक सुरुवात होईल. १७ सप्टेंबरला सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत श्रमदान करून सेवा दिवस साजरा करण्यात येईल. २४ सप्टेंबरला समाजातील सर्व घटकांना श्रमदानात सहभागी करून समग्र स्वच्छता केली जाणार आहे.२५ सप्टेंबरला शहरातील हॉस्पिटल, उद्याने, पुतळे व स्मारके, बसथांबे, तलाव आणि स्वच्छतागृहांची व्यापक सफाई करण्याचे वेळापत्रक नगरविकासने दिले आहे. त्यानंतर १ आॅक्टोबरला शहरातील प्रसिद्ध स्थळांची व्यापक स्वच्छता मोहीम राबविली जाईल.ओडीस्पॉटचे सौंदर्यीकरणजेथे यापूर्वी नागरिक उघड्यावर शौचास जात होते, ती ठिकाणे हागणदारीमुक्त झाली आहेत. त्याठिकाणांचे सुशोभिकरण मोहिमेदरम्यान करण्यात येणार आहे. सोबतच २ आॅक्टोबरपर्यंत सर्वांना वैयक्तिक, सामुदायिक व सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली आहे.जनआंदोलनाचे स्वरूप१५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत नागरिक, इतर संस्था व घटकांनी शहरातील शक्य त्याठिकाणी दररोज श्रमदानाद्वारे स्वच्छता करावी. जेणेकरून शहरातील प्रत्येक कानाकोपरा स्वच्छ झाल्याचे दृश्य पहावयास मिळेल. याद्वारे शहरांमध्ये ख-या अर्थाने जनआंदोलन उभे राहू शकेल, असा आशावाद नगरविकास खात्याने व्यक्त केला आहे.