शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
"ज्यांना नरकात जायचंय, त्यांनी 'गजवा-ए-हिंद'च्या नावावर..."; योगी आदित्यनाथांचा दंगेखोरांना इशारा
18
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
19
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
20
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."

मनसेचा राडा!

By admin | Updated: September 14, 2016 06:29 IST

विदर्भ राज्य आंदोलन समितीने मंगळवारी प्रेस क्लबमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत गोंधळ घातला

मुंबई : विदर्भ राज्य आंदोलन समितीने मंगळवारी प्रेस क्लबमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत गोंधळ घातला. मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे, संतोष धुरी, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी काही काळासाठी पत्रकार परिषद बंद पाडली. स्वतंत्र विदर्भासाठी येत्या ३ व ४ आॅक्टोबरला प्रति विधानसभेचे आयोजन करणाऱ्या नागपूरच्या विदर्भ राज्य आंदोलन समितीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मनसेच्या कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या. विदर्भ राज्य आंदोलन समितीने नव्या वर्षात ‘करो या मरो’ आंदोलनाची हाक दिली आहे. सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत स्वतंत्र विदर्भाची स्थापना करावी, यासाठी अहिंसक पद्धतीने आंदोलन करणार, मात्र १ जानेवारीपासून थेट ‘देता की जाता, जनतेच्या लाथा खाता’ आंदोलन सुरू होईल. या वेळी लोक रस्त्यावर उतरून कायदा हातात घेतील. त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, असा इशारा समितीच्या कोअर कमिटीचे सदस्य अ‍ॅड. वामनराव चटप यांनी मंगळवारी दिला. स्वतंत्र विदर्भाची मागणी करायची असेल तर विदर्भातच पत्रकार परिषद घ्यावी. अखंड महाराष्ट्रासाठी केलेले आंदोलन गैर नसून, मराठी जनतेची हीच इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली. दरम्यान, आझाद मैदान पोलिसांनी मनसेची राड्याची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. राज्यावर असलेल्या कर्जाचा डोंगर पाहता, पुढील ५० वर्षांमध्ये तरी विदर्भाचा विकास अशक्य असल्याचा दावा कोअर कमिटी सदस्य डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केला. ते म्हणाले की, आर्थिक विकासाच्या दृष्टीने पाणी, वने, खनिजे, वीज, कापूस आणि संत्री याबाबतीत विदर्भ अधिक समृद्ध आहे. मात्र राज्यातील इतर भागांचा बोजा विदर्भावर टाकला जात असून त्या बदल्यात विविध योजनांत विदर्भाला मागे ठेवले जात आहे. त्यामुळे केवळ आर्थिक शोषणासाठी विदर्भाचा वापर केला जात असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप त्यांनी केला.विधानभवनावर दिंड्याविदर्भातील सिंदखेड, शेणगाव, कालेश्वर, उमरखेड आणि देवरी येथून नागपूर विधानभवनावर ५ डिसेंबर रोजी दिंड्या घेऊन धडकणार असल्याचे समितीने सांगितले. पोलीस जेथे अडवतील, तेथेच ठिय्या दिला जाईल. ३१ डिसेंबरपर्यंत सरकारने ठोस पाऊल उचलावे, म्हणून शांततेच्या मार्गाने आंदोलन केले जाईल.‘देता की जाता’ आंदोलनसत्तेवर येण्यापूर्वी स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन भाजपाने दिले होते. मात्र सत्तेच्या सव्वादोन वर्षांनंतरही मागणी मान्य झालेली नाही. परिणामी ३१ डिसेंबरपर्यंत मागणी मान्य झाली नाही, तर १ जानेवारीपासून ‘देता की जाता, जनतेच्या लाथा खाता’ आंदोलन सुरू होईल. या वेळी लोक रस्त्यावर उतरून कायदा हातात घेतील. त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, अशा इशाराही चटप यांनी यावेळी दिला.