शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
5
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
6
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
7
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
8
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
9
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
10
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
11
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
12
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
13
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
14
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
15
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
16
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
17
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
18
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
19
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
20
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सागरी मार्गाला डिसेंबरचा मुहूर्त

By admin | Updated: July 9, 2017 02:38 IST

वाहतुकीच्या कटकटीतून सुटका करीत मुंबईकरांचा प्रवास सुकर करणारा सागरी मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्पाचा अखेर श्रीगणेशा होत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वाहतुकीच्या कटकटीतून सुटका करीत मुंबईकरांचा प्रवास सुकर करणारा सागरी मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्पाचा अखेर श्रीगणेशा होत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांची मंजुरी, कोस्टल रोडसाठी सल्लागार व ठेकेदाराच्या नेमणुकीसाठी निविदा मागवण्यात येत आहेत. त्यानुसार डिसेंबरपासून पहिल्या टप्प्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे (कोस्टल रोड) प्रमुख अभियंता मोहन माचीवाल यांनी मुंबई महापालिकेतील स्थायी समितीत केलेल्या सादरीकरणावेळी दिली.या प्रकल्पाचे श्रेय आपल्या पदरात टाकण्यासाठी शिवसेना-भाजपामध्ये चढाओढ सुरू आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कृती आराखड्याचे सादरीकरण करण्याची मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली होती. त्यानुसार या प्रकल्पाचे प्रमुख अभियंता मोहन माचीवाल यांनी सादरीकरण केले. या वेळी किनारपट्टीवर भराव टाकून, पूल आणि बोगद्यांचे बांधकाम करून एकूण ३५.६ किलोमीटर लांबीच्या कोस्टल रोडची बांधणी केली जाणार आहे. या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यासाठी ५३०३.३४ कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सागरी मार्गाचे काम झाल्यावर मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहेत. तसेच या मार्गामुळे सुमारे एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असा दावा त्यांनी केला आहे.अशी झाली प्रकल्पाची सुरुवाततत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नरिमन पॉइंट ते वर्सोव्यापर्यंत सागरी मार्ग प्रकल्प व्यवहार्य आहे का, याचा अभ्यास करण्यासाठी २०११ मध्ये समिती स्थापन केली होती. मात्र मच्छीमारांचा विरोध, पर्यावरणवादी संस्थांचा आक्षेप अशा अडथळ्यांमुळे हा प्रकल्प लांबणीवर पडत गेला. राज्यात सत्तांतरानंतर या प्रकल्पाचा लगाम भाजपाच्या हातात गेला. वाहतूककोंडी फुटणार या प्रकल्पासाठी गिरगाव चौपाटी येथे भूमिगत बोगदा बांधण्यात येत आहे. चौपाटी येथून निघालेला हा बोगदा थेट प्रियदर्शनी पार्कजवळ बाहेर पडेल. त्यामुळे काम सुरू असताना वाहतुकीला अडथळा होणार नाही. तिथून हा प्रकल्प वांद्रे सागरी सेतू ते गोराई असा प्रवास करेल. याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. प्रकल्पासाठी पंधरा हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातून उपनगरात जाण्यास लागणारा दीड ते दोन तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांचा होणार आहे. नरिमन पॉइंट ते कांदिवली - २९.२ कि.मी. सागरी मार्ग पहिल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे सी-लिंक या ९.९८ किमीचे काम २0१९ पर्यंत करण्यात येणार आहे.त्यानंतर वांद्रे सी-लिंक ते कांदिवली या दुसऱ्या टप्प्याचे काम करण्यात येणार आहे. हा प्रकल्प झाल्यास ३४ टक्के इंधनाची बचत होणार आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी १० कोटी डॉलर्सची बचत होईल, असे माचीवाल यांनी स्पष्ट केले. या मार्गावर सागरी भिंतींची उभारणी केली जाईल. त्यामुळे सागरी किनाऱ्याची धूप होण्यापासून संरक्षण होईल, तसेच वादळी लाटा व पुरापासूनही संरक्षण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना-भाजपात श्रेयाची लढाईनौदल, तटरक्षक दल, मेरीटाइम बोर्ड, राज्य पर्यावरण खात्याची परवानगी भाजपाने आपले वजन वापरत मिळवली. याचे श्रेय घेणारे फलकही भाजपाने मुंबईभर लावले. यामुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेनेनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकल्प आपला असल्याचा दावा केला होता. शिवसेना पक्षप्रमुखांनी यापुढे जात आपल्या नेतेमंडळी व नगरसेवकांसह या प्रकल्पाची पाहणी करीत भूमिपूजन पुढच्या पावसाळ्यात होईल, असे परस्पर जाहीर केले. अत्यावश्यक सेवा सुसाट : कोस्टल रोडवर रुग्णवाहिकेसाठी स्वतंत्र मार्गिका असणार आहे. ही मार्गिका पावणेतीन मीटर रुंदीची असेल. त्यामुळे रुग्णवाहिका, अग्निशमन गाड्यांचा मार्ग खुला होणार आहे.अशाही काही सुविधा : कोस्टल रोडला जोडून सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक तसेच खुले प्रेक्षागृह आदींचा समावेश असेल. कोस्टल रोड प्रकल्पासाठी वाहनतळाचीही सुविधा आहे. त्यामुळे नागरिकांसाठी उत्तम प्रवास सुविधा या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.