शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

मार्च महिन्यातच नदीचे पात्र झाले ‘ड्राय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 21:19 IST

शहराला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या डांगोर्ली येथील वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यात कोरडे पडल्याने शहरवासीयांना पुढील दोन महिने पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

ठळक मुद्देशहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट : बंधारा बांधून वाढविला जलस्तर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहराला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या डांगोर्ली येथील वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यात कोरडे पडल्याने शहरवासीयांना पुढील दोन महिने पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. सध्या वैनगंगा नदीच्या पात्रात बंधारा तयार करुन विहिरीची पाणी पातळी वाढवून पाणी पुरवठा केला जात आहे.गोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातंर्गत डांर्गोली येथे वैनगंगानदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र मागील दोन वर्षांपासून शहरवासीयांना एप्रिल ते मे महिन्यादरम्यान पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे यावर मात करण्यासाठी गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावरील पुजारीटोला धरणातून कालव्याव्दारे पाणी आणून शहरवासीयांना पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र यंदा मार्च महिन्यातच वैनगंगा नदीचे पात्र ड्राय झाल्याने महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाला वैनगंगा नदीच्या पात्रात बंधार तयार करुन विहिरीची पाणी पातळी वाढविण्याची वेळ आली. बंधारा तयार केल्यामुळे किमान महिनाभर पाणी टंचाईवर मात करणे शक्य होणार आहे. मात्र तापमान वाढल्यास पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासाठीच जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पुजारीटोला धरणातून कालव्याच्या माध्यमातून पाणी आणून शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याव्दारे डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविले जाणार आहे. मात्र त्यापूर्वी नहराची दुरूस्ती करावी लागणार आहे. त्यासाठी आत्तापासूनच हे काम सुरू करण्याची गरज आहे.गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणातून एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाणी आणण्याची गरज पडणार आहे. त्यादृष्टीकानोतून नियोजन करण्यात आले आहे. सध्या वैनगंगा नदीच्या पात्रात बंधारा तयार करुन विहिरीची पाण्याची पातळी वाढविण्यात आली आहे.- राजेंद्र मडके, उपविभागीय अभियंता मजीप्रा.

टॅग्स :riverनदीwater shortageपाणीटंचाई