शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
2
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
3
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
4
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
5
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
6
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
7
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
8
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
9
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
10
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
11
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
12
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
13
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
14
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
15
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
16
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
17
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
18
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
19
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
20
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

मराठवाडा जलमय

By admin | Updated: October 3, 2016 05:46 IST

मराठवाड्यावर परतीच्या पावसाने अतिकृपा केल्याने जवळपास सर्व धरणे, पाझर तलाव ओसंडून वाहत आहेत.

औरंगाबाद : सलग तीन वर्षांच्या दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यावर परतीच्या पावसाने अतिकृपा केल्याने जवळपास सर्व धरणे, पाझर तलाव ओसंडून वाहत आहेत. धरणांचे दरवाजे उघडल्याने बिंदुसरा, मांजरा, तेरणा, तावरजासह अनेक नद्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. लातूर, बीड आणि उस्मानाबादमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली. औरंगाबाद व जालना वगळता संपूर्ण विभागात पाणीच पाणी झाले आहे. हजारो हेक्टर शेतीही पाण्याखाली गेली. बिंदुसरेचे पाणी रविवारी पहाटेच बीडमध्ये घुसल्याने आपत्ती निवारण पथकाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. शेकडो पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. अनेक गावे रिकामी केली आहेत. उस्मानाबादमध्ये २४ तासांत तब्बल १५६ मि.मी. म्हणजेच ‘दुप्पट’ अतिवृष्टी झाली. तेरणा धरण ६ वर्षांनी ओव्हरफ्लो झाले. माजलगाव धरणाचे दरवाजे उघडल्याने परभणीत गोदावरीला उधाण आले आहे.नांदेडमधील लिंबोटी धरणाचे १७ दरवाजे उघडण्यात आले आहेत. डोंगरगावला तब्बल १६ तास पुरात अडकलेल्या २३ जणांची शनिवारी रात्री सुटका करण्यात आली. मांजरा नदीपात्रात अडकलेल्या तिघांच्या बचावासाठी प्रयत्न सुरू आहेत़ नांदेडमधील अकोला-हैदराबाद व्हाया देगलूर हा राष्ट्रीय महामार्ग देगलूरजवळ पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे तब्बल १७ तासांपेक्षा अधिक काळ ठप्प झाला होता.तुळजापूरमध्ये सत्यजीत वाघे यांच्या घराची भिंत ढासळली. त्यात त्यांची पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला. तर खान्देशात धुळे आणि जळगाव जिल्ह्यांत नैसर्गिक आपत्तीत दोन दिवसांत ९ जणांचे बळी गेले आहेत.नैसर्गिक आपत्तीत मराठवाड्यात आठ दिवसांत विविध दुर्घटनांत ३६ जणांचा मृत्यू झाला, त्यात बीड येथे सर्वाधिक १८ जणांचा मृत्यू झाला आहे.मुंबईसह कोकण, सोलापूर, नगरमध्ये पाऊस सुरू आहे. साताऱ्यातील दुष्काळी माण, खटाव व फलटणमध्ये दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. सोलापूर जिल्ह्यातीलही प्रकल्प भरले आहेत.