शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा जलमय

By admin | Updated: October 3, 2016 05:46 IST

मराठवाड्यावर परतीच्या पावसाने अतिकृपा केल्याने जवळपास सर्व धरणे, पाझर तलाव ओसंडून वाहत आहेत.

औरंगाबाद : सलग तीन वर्षांच्या दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यावर परतीच्या पावसाने अतिकृपा केल्याने जवळपास सर्व धरणे, पाझर तलाव ओसंडून वाहत आहेत. धरणांचे दरवाजे उघडल्याने बिंदुसरा, मांजरा, तेरणा, तावरजासह अनेक नद्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. लातूर, बीड आणि उस्मानाबादमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली. औरंगाबाद व जालना वगळता संपूर्ण विभागात पाणीच पाणी झाले आहे. हजारो हेक्टर शेतीही पाण्याखाली गेली. बिंदुसरेचे पाणी रविवारी पहाटेच बीडमध्ये घुसल्याने आपत्ती निवारण पथकाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. शेकडो पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. अनेक गावे रिकामी केली आहेत. उस्मानाबादमध्ये २४ तासांत तब्बल १५६ मि.मी. म्हणजेच ‘दुप्पट’ अतिवृष्टी झाली. तेरणा धरण ६ वर्षांनी ओव्हरफ्लो झाले. माजलगाव धरणाचे दरवाजे उघडल्याने परभणीत गोदावरीला उधाण आले आहे.नांदेडमधील लिंबोटी धरणाचे १७ दरवाजे उघडण्यात आले आहेत. डोंगरगावला तब्बल १६ तास पुरात अडकलेल्या २३ जणांची शनिवारी रात्री सुटका करण्यात आली. मांजरा नदीपात्रात अडकलेल्या तिघांच्या बचावासाठी प्रयत्न सुरू आहेत़ नांदेडमधील अकोला-हैदराबाद व्हाया देगलूर हा राष्ट्रीय महामार्ग देगलूरजवळ पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे तब्बल १७ तासांपेक्षा अधिक काळ ठप्प झाला होता.तुळजापूरमध्ये सत्यजीत वाघे यांच्या घराची भिंत ढासळली. त्यात त्यांची पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला. तर खान्देशात धुळे आणि जळगाव जिल्ह्यांत नैसर्गिक आपत्तीत दोन दिवसांत ९ जणांचे बळी गेले आहेत.नैसर्गिक आपत्तीत मराठवाड्यात आठ दिवसांत विविध दुर्घटनांत ३६ जणांचा मृत्यू झाला, त्यात बीड येथे सर्वाधिक १८ जणांचा मृत्यू झाला आहे.मुंबईसह कोकण, सोलापूर, नगरमध्ये पाऊस सुरू आहे. साताऱ्यातील दुष्काळी माण, खटाव व फलटणमध्ये दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. सोलापूर जिल्ह्यातीलही प्रकल्प भरले आहेत.