शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

मराठवाडा अजूनही दुष्काळाच्या विळख्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 04:45 IST

वार्षिक सरासरीच्या तुलनेत मराठवाड्यात फक्त ४०.५७ टक्के पाऊस झाला.

औरंगाबाद : आॅगस्ट महिना संपत आला तरीही मराठवाड्यावरील दुष्काळाचे मळभ कायम आहे. कमी पावसामुळे खरीप हंगामात १० टक्क्यांनी पेरा कमी झाला आहे. ४३ हजार जनावरे चारा छावण्यांत आहेत, तर विभागातील सर्व ८७२ पैकी बहुतांश प्रकल्पांत अजून जोत्याच्यावर पाणी आलेले नाही. १०३७ गावे व १७१ वाड्या १३२३ टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.

वार्षिक सरासरीच्या तुलनेत मराठवाड्यात फक्त ४०.५७ टक्के पाऊस झाला. विभागाची वार्षिक सरासरी ७७९ मि.मी. आहे. ५०९.४६ मि.मी. पाऊस आजवर होणे अपेक्षित होते ३१६.६७ मि.मी. इतका पाऊस विभागात आजवर झालेला आहे. १९२ मि.मी. पावसाची विभागात तूट आहे.

विभागातील लहान-मोठ्या ८७२ प्रकल्पांत १.५० टक्क्यांच्या आसपास, ११ मोठ्या प्रकल्पांत ०.६२ टक्के, ७५ मध्यम प्रकल्पात ३ टक्के, ७४९ लघुप्रकल्पांत दीड टक्का पाणी आहे. जायकवाडी धरण भरले आहे, एवढीच समाधानाची बाब आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ१ जानेवारी ते २५ आॅगस्ट २०१९ पर्यंतच्या काळात विभागात ५६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ८१, जालन्यात ६५, परभणी जिल्ह्यात ५०, हिंगोलीत २४, नांदेड ७४, बीड १३१, लातूर ५८, उस्मानाबाद जिल्ह्यात ८१ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे.