शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
2
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
3
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
4
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
5
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
7
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
8
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
9
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक
10
भारतासोबत पंगा महागात पडला! मालदीवकडे विमाने आणि हेलिकॉप्टर उडवण्यासाठी वैमानिक नाहीत
11
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
12
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
13
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
14
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
15
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
16
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
17
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
18
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
19
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
20
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे

प्लास्टिकबंदीत मराठवाडा चार ‘कदम’ मागे ! नाममात्र कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 6:10 AM

राज्यात २३ जूनपासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली असली तरी मराठवाड्यातील प्रशासन अजुनही जनजागृतीतच व्यस्त आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या आणि शिवसेनेचीच सत्ता असलेल्या औरंगाबाद महापालिकेने नऊ दिवसांत केवळ ३७ हजारांचा दंड वसूल केला आहे

औरंगाबाद : राज्यात २३ जूनपासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली असली तरी मराठवाड्यातील प्रशासन अजुनही जनजागृतीतच व्यस्त आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या आणि शिवसेनेचीच सत्ता असलेल्या औरंगाबाद महापालिकेने नऊ दिवसांत केवळ ३७ हजारांचा दंड वसूल केला आहे. तुलनेने, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्यात चांगली कारवाई ढाली असून लाखावर दंड वसूल करण्यात आला आहे.कॅरिबॅग बंदीसाठी औरंगाबाद महापालिकेने झोननिहाय नऊ पथके तयार केली आहेत. मागील आठ दिवसांमध्ये या पथकांनी केवळ ३७ हजार रुपये दंड वसूल केला. या कारवाईअंतर्गत ८४ किलो कॅरिबॅगचे संकलन करण्यात आले असून २० किलो कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या. कॅरिबॅग बंदीसाठी नेमलेल्या पथकांनी व्यापाऱ्यांवर थेट दंडाचा बडगा उगारण्यापेक्षा जनजागृतीवर अधिक भर दिला आहे. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत चार टन प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, ५० व्यापाºयांकडून १ लाख ६२ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.बीड जिल्ह्यात आतापर्यंत २५ कारवाया करण्यात आल्या. यात ४४५ किलो प्लास्टिक जप्त केले असून २५ जणांकडून एकूण ४२ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल पावणेसात टन प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे़ जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये जप्त केलेले प्लास्टिक २५ किलोंच्या आसपास आहे़ या प्लास्टिक विक्रेत्याकडून आतापर्यंत पावणेदोन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ परभणी जिल्ह्यात ८ ठिकाणी कारवाई करीत ४० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच मानवत शहरात साडेतीन क्विंटल प्लास्टीक जप्त करण्यात आले. जालना नगर पालिकेने २० व्यापाºयांना प्रत्येकी पाच हजार रूपयांचा दंड आकारला असून, जवळपास १५ क्विंटल प्लास्टिक जप्त केला आहे. हिंगोलीत चार व्यापाºयांकडून ५ हजार रुपये प्रमाणे २० हजार रुपये दंड आणि ७ क्विंटल ८० किलो प्लास्टिक जप्त केले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच नगरपरिषदांनी २० व्यापाºयांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रूपये या प्रमाणे १ लाख रूपये दंड वसूल केला आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी