शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

मराठवाड्यात आठ महिन्यांत 580 शेतकरी आत्महत्या, परिस्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 17:35 IST

मराठवाड्यामध्ये आठ महिन्यांमध्ये 580 शेतक-यांनी आत्महत्येसारखा अखेरचा पर्याय निवडला असून मागील काही वर्षांपासून सुरु असलेले आत्महत्येचे सत्र यावर्षी देखील सुरुच असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देअनियमित आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस होत असल्याने शेती तोट्यात गेली6 ते 13 ऑगस्ट दरम्यान तब्बल 34 शेतक-यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावर्षी पावसाळ्याचे दोन सव्वा दोन महिने उलटले तरी समाधानकारक पाऊस न पडल्याने पुन्हा एकदा दुष्काळी ढग दाटून आले आहे

औरंगाबाद, दि. 16 : सरकारच्या कर्जमाफीनंतंर शेतक-यांचे प्रश्न आता तरी सुटतील अशी अपेक्षा होती. पण मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्या थांबायला तयार नाहीत. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दरदिवशी सरासरी तीन - चार शेतकरी आपली जिवनयात्रा संपवतात.  

दोन वर्षापूर्वी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती.  प्रत्येकवर्षी पडणाऱ्या अनियमित आणि सरासरीपेक्षा कमी पावसामुळे शेती तोट्यात जात आहे. मराठवाड्यामध्ये आठ महिन्यांमध्ये 580 शेतक-यांनी आत्महत्येसारखा अखेरचा पर्याय निवडला असून मागील काही वर्षांपासून सुरु असलेले आत्महत्येचे सत्र यावर्षी देखील सुरुच असल्याचे दिसत आहे. बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या घडल्याचं समोर आलं आहे. एकट्या बीडमध्येच 107 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.  यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये सरकारविरोधात अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे. सर्वसामान्या लोकांच्यामते सरकारनं शेती समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढायला हवा. मराठवाड्या सारख्या भागात कमी पाऊस पडतो हे जगजाहीर असताना सरकरनं केलेल्या उपायोजनाचा कोणताच फायदा का होत नाही. सरकारनं जलयुक्त शिवारसारख्या योजना यशस्वी केल्याचा दावा केला आहे. तर मग आत्महत्या का थांबायला तयार नाहीत. असा प्रश्न सर्वसामान्या जनतेतून विचारला जात आहे. 

गेल्या तीन ते चार वर्षापासून मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळामुळे शेतक-यांवर मोठे संकट होते. याकाळात बँका, सावकाराकडून घेतलेल्या कर्जात मोठी भर पडत गेली. राज्य सरकारने शेतक-यांचे दीड लाखापर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा केल्याने अनेक शेतकठयांना मोठा दिलासा मिळाला. परंतू पावसाच्या अवकृपेने हजारो हेक्टर जमिनीवर घेतलेल्या पिकांचे पाण्याअभावी योग्य वाढ होत नसल्याने अपेक्षित उत्पन मिळणार नाही. असा प्रश्न सतत शेतक-यांना भेडसावत आहे. मराठवाड्यात सतत पडणा-या दुष्काळाने शेतकरी आत्महत्या प्रमाण प्रत्येक वर्षी वाढतच असून सरकारने केलेले प्रयत्न फोल ठरत असल्याचे दिसत आहे. जानेवारी ते जुलै महिन्यापर्यंत मराठवडा महसूल विभागात प्राप्त झालेल्या आकडेवारी नुसार 531 शेतक-यांनी आत्महत्या केल्याची माहिती होती. तोच आकडा ऑगस्ट महिन्याच्या 13 तारखे पर्यंत तब्बल 580 पर्यंत पोहचला तर 6 ते 13 ऑगस्ट या सात दिवसाच्या काळात 34 शेतक-यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. या तेरा दिवसांत औरंगाबाद जिल्ह्यात 5, बीड जिल्ह्यात 12, नांदेड 9, परभणी 7, जालना 6, लातूर 5, उस्मानाबाद 4 तर हिंगोलीत एका शेतक-याने आत्महत्या केल्याची नोंद घेण्यात आली आहे. 

तीन वर्षापूर्वी तर खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात शेतक-यांना उत्पन्न मिळाले नाही. मागील वर्षी ब-यापैकी पाऊस झाल्याने येथील कृषीक्षेत्रात समाधानाचे वातावरण असले तरी नापिकी, कर्जबाजारीपणा आदी कारणांमुळे शेतक-यांच्या होणा-या आत्महत्या थांबल्या नसल्याचे दिसत आहे.  यावर्षी पावसाळ्याचे दोन सव्वा दोन महिने उलटले तरी समाधानकारक पाऊस न पडल्याने पुन्हा एकदा दुष्काळी ढग दाटून आले आहेत. त्यामुळे निराशेतून शेतकरी आत्महत्या करण्याचा टोकाचा मार्ग पत्करतो आहे. 

आणखी वाचा : कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या अन् आंदोलने

मराठवाडा विभागातील शेतकरी आत्महत्येची प्रकरणे