शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

मराठवाडा ३४; मुंबईमधील बहुतांश ठिकाणे अद्यापही २० अंशांखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 06:36 IST

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या उपनगरात किमान तापमान २० अंश नोंदविण्यात येत आहे. यात नॅशनल पार्कलगतच्या परिसराचा समावेश आहे.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक ठिकाणी किमान तापमानाची नोंद २० अंश सेल्सिअस नोंदविण्यात येत आहे. किमान तापमानाचा हा कल आणखी २४ तास कायम राहील. त्यानंतर मुंबईच्या किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दुसरीकडे राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत असून, मराठवाड्यात कमाल तापमानाने ३४ अंश सेल्सिअसचा आकडा पार केला आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या उपनगरात किमान तापमान २० अंश नोंदविण्यात येत आहे. यात नॅशनल पार्कलगतच्या परिसराचा समावेश आहे. विशेषत: रात्री आणि पहाटे किमान तापमानात बऱ्यापैकी घसरण होत आहे. त्यामुळे मुंबईकरांना अद्यापही पहाटे थंडीचा अनुभव घेता येत आहे. दुसरीकडे दुपारी कडाक्याचे ऊन पडत आहे. मुंबईचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस असले तरीदेखील उन्हाचे असह्य चटके मुंबईकरांना बसत आहेत. सूर्याचा प्रकोप दुपारच्या सुमारास वाढत असल्याने दुपारी घराबाहेर पडणे मुंबईकरांना नकोसे वाटत आहे. अनेक जण दुपारी घराबाहेर पडणे टाळत आहेत.

राज्याचा विचार करता विदर्भास देण्यात आलेला पावसाचा इशारा अद्याप कायम आहे. तर कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र येथे हवामान कोरडे राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मुंबईचा विचार करता शुक्रवारी मुंबई काही अंशी ढगाळ राहील, अशी शक्यता असून, गुरुवारी सकाळीदेखील मुंबई काही प्रमाणात का होईना ढगाळ नोंदविण्यात आली होती.

टॅग्स :weatherहवामानTemperatureतापमान