शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
3
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
4
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
5
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
6
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
7
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
8
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
9
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
10
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
11
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
12
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
14
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
15
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
16
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
17
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
18
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
19
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
20
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला

मराठी भाषा अभिजातच; प्रमाणपत्राची गरज नाही; प्राचार्य डॉ. कौतिकराव ठाले यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 07:46 IST

मुकुंदराज, महदंबा, संत ज्ञानेश्वर, संत रामदास, संत जनाबाई, संत नामदेव, संत एकनाथ या सर्वांनी सर्वोत्तम काव्यच नव्हे, तर नवे मूल्य, जाणिवा दिल्या. मराठवाड्यातील याच लेखक, कवी, विचारवंतांनी महाराष्ट्राच्या वाङ्मयाचा इतिहास समृद्ध केला, असेही ठाले-पाटील यावेळी म्हणाले.

नांदेड : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळेल ठाऊक नाही; पण मराठी भाषा ही अभिजात आहेच. तिला कुणाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. कौतिकराव ठाले-पाटील यांनी व्यक्त केले.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘मराठवाड्यातील लेखन’ या विषयावरील दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, तर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, संकुलाच्या संचालिका डॉ. शैलजा वाडीकर, डॉ. अच्युत बन, उपजिल्हाधिकारी विकास माने, स्नेहलता स्वामी, संयोजक डॉ. पृथ्वीराज तौर आदी उपस्थित होते.मराठी वाङ्मयाच्या आठशे वर्षांच्या इतिहासातील सुरुवातीची चारशे वर्षे मराठवाड्यातच साहित्यनिर्मिती झाली. मुकुंदराज, महदंबा, संत ज्ञानेश्वर, संत रामदास, संत जनाबाई, संत नामदेव, संत एकनाथ या सर्वांनी सर्वोत्तम काव्यच नव्हे, तर नवे मूल्य, जाणिवा दिल्या. मराठवाड्यातील याच लेखक, कवी, विचारवंतांनी महाराष्ट्राच्या वाङ्मयाचा इतिहास समृद्ध केला, असेही ठाले-पाटील यावेळी म्हणाले.यावेळी प्रो. हिरायान्ना यांच्या ‘कलानुभव’ या पुस्तकाचे डॉ. शैलजा वाडीकर यांनी भाषांतर केलेले पुस्तक, डॉ. अच्युत बन लिखित ‘माझ्या आयुष्याची स्मरणगाथा’, स्नेहलता स्वामी लिखित कादंबरी ‘गांधारी’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.