शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

मराठी विश्वकोश होणार अद्ययावत

By admin | Updated: June 1, 2016 00:36 IST

विश्वकोशातील नोंदी कालबाह्य झाल्याने त्यांमध्ये सुधारणा करण्याबरोबरच मानव्य शाखांमधील नवीन संकल्पना, विचारप्रवाह या सर्व बदलांची नोंद

नम्रता फडणीस,  पुणेविश्वकोशातील नोंदी कालबाह्य झाल्याने त्यांमध्ये सुधारणा करण्याबरोबरच मानव्य शाखांमधील नवीन संकल्पना, विचारप्रवाह या सर्व बदलांची नोंद घेण्यासाठी विश्वकोश अद्ययावत करण्यात येणार आहे. यासाठी राज्य मराठी विश्वकोश मंडळाकडून राज्यभरातील विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने पहिल्या टप्प्यात २० ज्ञानमंडळांची स्थापना करण्यात आली आहे.सद्य:स्थितीत मराठी विश्वकोशाच्या २३ खंडांपैकी २० खंड प्रकाशित झाले आहेत. हे खंड पूर्ण करण्यास लागलेल्या प्रदीर्घ कालावधीमुळे विश्वकोशातील अनेक नोंदी या कालबाह्य झाल्या आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवनवीन संशोधनामुळे मोठ्या प्रमाणावर भर पडली असून, नव्या संकल्पना, विचारप्रवाह पुढे आले आहेत. त्यामुळे सर्व विषय आणि ज्ञानशाखांतील झालेल्या बदलांची नोंद घेऊन विश्वकोशामध्ये सुधारणा करण्याचा विचार शासनस्तरावर सुरू होता. हे अद्ययावतीकरण करताना विश्वकोशाचा मूळ दर्जा कायम ठेवून माहिती व तंत्रज्ञानाच्या साह्याने सर्व ज्ञानक्षेत्रातील माहिती एकाच वेळी उपलब्ध करून त्याचे समीक्षण-संपादन करून अंतिम नोंद करणे आवश्यक वाटत असल्याने विविध विषयांशी संबंधित ज्ञान मंडळे स्थापन करण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला. त्यानुसार विविध विद्यापीठे, शैक्षणिक व संशोधन संस्थांशी चर्चा केल्यानंतर पहिल्या टप्प्यात २० ज्ञान मंडळे स्थापन करण्यात आल्याची माहिती राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यानुसार मुंबई येथे १२ (आयसीटी आणि मराठी विज्ञान परिषद), पुणे ४ (डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ-३ आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर-१), जळगाव २, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, अहमदनगर १, नाशिक १ अशा ठिकाणी २० ज्ञान मंडळे स्थापन करण्यासंबंधी संबंधित विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांमध्ये करार झाले आहेत. पुणे विद्यापीठ, एसएनडीटी, नांदेड विद्यापीठाशी ज्ञान मंडळ निर्मित करण्यासंबंधी बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक ज्ञान मंडळाकडे सोपविण्यात आलेल्या विषयाची व्याप्ती व मर्यादा ठरवून विश्वकोशाच्या १ ते २० खंडांमधील शब्दांची नव्याने नोंद यादी तयार करणे, या नोंदयादीची जुन्या नोंदयादीशी पडताळणी करणे आणि नव्याने समाविष्ट करण्याच्या नोंदी, कालबाह्य नोंदी व अद्ययावत करायच्या नोंदी यांचा अहवाल तयार करणे तसेच ज्ञान मंडळातील तज्ज्ञांच्या साह्याने नोंदीचे लेखन, समीक्षण-संपादन व भाषांतर करणे, विश्वकोशातील नोंदींच्या लेखनासाठी लेखकांसाठी कार्यशाळा आयोजित करणे आणि नोंदींचे लेखन करणाऱ्या तज्ज्ञांनी दिलेले नोंदींचे संदर्भ, त्यासंबंधीची चित्रे, रेखाचित्रे, नकाशे, आराखडे, आॅडियो-व्हिज्युअल यांची पडताळणी व संपादन करणे या गोष्टी ज्ञान मंडळामार्फत केल्या जाणार आहेत. यामध्ये विश्वकोश मंडळावरील सदस्यांवर पालक म्हणून विशिष्ट विषयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच संबंधित विद्यापीठ, शैक्षणिक व संशोधन संस्था येथील मराठीतून संशोधनात्मक लेखन करण्याचा अनुभव असलेले विषयतज्ज्ञ, सेवानिवृत्त विषयतज्ज्ञ, संशोधक विद्यार्थी यांना समन्वयक म्हणून नेमले जाणार आहे.