शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील बिहारींनी मराठी शिकलेच पाहिजे!

By यदू जोशी | Updated: April 13, 2018 06:58 IST

मुंबईत रोजीरोटीसाठी राहत असलेल्या बिहारी बांधवांनी येथील समाजाशी नाळ जोडण्यासाठी आणि इथल्या मातीशी समरस होण्यासाठी मराठी भाषा शिकलीच पाहिजे, असे आग्रही मत मांडत बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते सुशीलकुमार मोदी यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थनच केले आहे.

मुंबई : मुंबईत रोजीरोटीसाठी राहत असलेल्या बिहारी बांधवांनी येथील समाजाशी नाळ जोडण्यासाठी आणि इथल्या मातीशी समरस होण्यासाठी मराठी भाषा शिकलीच पाहिजे, असे आग्रही मत मांडत बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते सुशीलकुमार मोदी यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थनच केले आहे.बिहार दिनानिमित्त आयोजित समारंभ आणि गुंतवणूक परिषदेसाठी मोदी मुंबईत आले असता त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.प्रश्न : उदरनिर्वाहासाठी मुंबईत राहणारे बिहारी लोक इथल्या समाजाशी एकरूप झालेत असे आपल्याला वाटते का?मोदी : मुंबईच्या विकासात बिहारी, उत्तर प्रदेशींसह अन्य हिंदी भाषिकांचेही योगदान आहे. बिहारी माणूस मेहनती आहे. पण इथे राहत असताना इथल्या मातीशी त्याने एकरूप झाले पाहिजे, मराठी भाषाही शिकली पाहिजे. संवादाची भाषा एक असेल तर परकेपणा जाणवणार नाही. शिवाय, कटुता वा गैरसमज असतील तर ते दूर होतील.प्रश्न : मुंबईवरील बिहारींचे अवलंबित्व कमी करू, असे आपले मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले होते. मुंबईतील बिहारी माणसांचे लोंढे कमी करण्यात आपल्याला यश आले आहे का?मोदी : ते अवलंबित्व पूर्णत: संपविणे शक्य नाही, पण उदरनिर्वाहासाठी मुंबईत येणाऱ्या बिहारींचे प्रमाण आज फारच कमी झाले आहे. आज जे बिहारी इकडे येतात ते चांगला व्यवसाय आणि जीवनमान उंचावण्यासाठी. हा गुणात्मक बदल आज दिसून येतो. मोलमजुरी करणारा बिहारी माणूस मुंबईत खचितच दिसेल.प्रश्न : मुंबईतील बिहारींंसाठी आपले सरकार काही करतेय का?मोदी : आमच्या सरकारने बिहार फाऊंडेशनचे कार्यालय मुंबईत सुरू केले आहे. मुंबईत ‘टाटा कॅन्सर’मध्ये उपचारासाठी येणाºया रुग्णास एक लाखाची मदत आमचे सरकार करते. या रुग्णांच्या निवासाची समस्या सुटावी म्हणून एखादी जागा वा इमारत महाराष्ट्र सरकारने द्यावी, अशी विनंती मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. बिहारबाहेर दुर्घटनेत बिहारी व्यक्ती दगावली तर तिच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत तत्काळ दिली जाते.प्रश्न : बिहार म्हटले की गुंडागर्दी असेच चित्र समोर येते. आपल्या सरकारला हे चित्र कितपत बदलता आले?मोदी : आजवर बिहारी माणसाला स्वत:ला बिहारी म्हणवून घेण्यात लाज वाटत असे. पण आज अभिमान वाटतो. हा बदल आम्ही करू शकलो. गुन्हेगारीचे प्रमाण तुलनेने फारच कमी झाले आहे. आम्ही विकासाचा अजेंडा राबवित आहोत. बिहारच्या कोणत्याही कोपºयातून पाच तासात राजधानी पाटण्याला पोहोचता येईल असे रस्ते आम्ही बांधले.>दारूबंदीच्या निर्णयाचा फायदा झाला का?मोदी : निश्चितच झाला. आमच्या राज्यातील गुन्हेगारी कमी होण्याचे तेही एक कारण आहे. इतर राज्यांनी पण आमच्यासारखी १०० टक्के दारूबंदी करायला हवी. राज्यातील जनतेच्या स्वास्थ्यासमोर दारूपासून मिळणारे उत्पन्न गौण आहे.>शत्रुघ्न सिन्हांना स्वत:बद्दल गैरसमजयशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा हे दोन भाजपा नेते नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सूर आळवण्यात आघाडीवर असतात. याबद्दल आपल्याला काय वाटते, असे विचारले असता मोदी म्हणाले, शत्रुघ्न सिन्हांना स्वत:बद्दल फार मोठे गैरसमज आहेत. आपल्या लोकप्रियतेवर आपण निवडून आलो असे त्यांना वाटते. नरेंद्र मोदींची लाट आणि भाजपाच्या ताकदीमुळे ते लोकसभेवर गेले. कार्यकर्त्यांची नाराजी पत्करून पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. ज्या ताटात खाल्ले त्याच ताटात ते छिद्र करीत आहेत. केंद्रात मंत्रिपद मिळाले नाही म्हणून ते ‘भडास’ काढत आहेत.

टॅग्स :Sushil Kumarसुशील कुमारBiharबिहार