शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘मराठी भाषा विद्यापीठ’ अडकले समितीच्या कचाट्यात

By गौरीशंकर घाळे | Updated: February 27, 2022 11:26 IST

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून केंद्र सरकारवरचा दबाव वाढविणारे राज्य सरकार मराठी भाषा विद्यापीठाबाबत मात्र उदासीन असल्याचे चित्र आहे.

गौरीशंकर घाळे

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून केंद्र सरकारवरचा दबाव वाढविणारे राज्य सरकार मराठी भाषा विद्यापीठाबाबत मात्र उदासीन असल्याचे चित्र आहे. दहा दिवसांत मराठी विद्यापीठासाठी समिती स्थापन करू, या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या घोषणेला दहा महिन्यांचा काळ लोटला तरी घोषणा प्रत्यक्षात येण्याची चिन्हे नाहीत.

मराठी भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठ उभारण्यासाठी भाषा सल्लागार समितीच्या शिफारशी आणि ठरावाचा आढावा घेऊन पुढील कार्यवाही करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी वर्षभरापूर्वी विधिमंडळात केली होती. त्यानंतर नागपूर दौऱ्यात, तर पुढील दहा दिवसांत समिती स्थापन होईल, अशीही घोषणा त्यांनी केली. यालाही आता सात महिने उलटली. तरीही समितीची घोषणा झाली नाही. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने समितीला अंतिम स्वरूप देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चाच केलेली नाही, अशी माहिती मिळाली आहे. यावर्षीच्या मराठी भाषा गाैरव दिनाच्या कार्यक्रमातही समितीची घोषणा होण्याची शक्यता नसल्याचे समजते.

भाषा विद्यापीठाची कार्यकक्षा, भाषा विद्यापीठाचे संकुल, प्रशासकीय यंत्रणा, शैक्षणिक विभाग, भाषा प्रयोगशाळा, विद्यापीठाची केंद्रे, कर्मचारी वर्ग, न्यायालयीन कामकाजासाठी मराठी भाषेचा वापर, प्रशासन व नवतंत्रज्ञानात मराठीचा वापर, आदी बाबींवर शिफारस करण्यासाठी ही समिती नेमणार असल्याचे सामंत यांनी म्हटले होते. या घोषणेला वर्ष उलटले तरी कोणतीच हालचाल झालेली नाही.  

तमिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्याळम्, उडीया या राज्यांना अभिजात दर्जा बहाल करण्यात आला आहे. मात्र, हा दर्जा मिळण्यापूर्वीपासूनच या भाषांची स्वतंत्र विद्यापीठे त्या-त्या राज्यात अस्तित्वात आहेत.  तमिळ भाषेला २००४ मध्ये अभिजात दर्जा मिळाला; पण विद्यापीठ मात्र १९८१ मध्येच तयार झाले. पुढे १९८५ मध्ये तेलगू, १९९१ मध्ये कन्नड, तर २०१२ मध्ये मल्याळम भाषेसाठी त्या-त्या राज्यात स्वतंत्र विद्यापीठे अस्तित्वात आली. या जोडीलाच संस्कृत, उर्दू, हिंदी आणि इंग्रजीसह परकीय भाषांसाठी केंद्रीय, अभिमत आणि खासगी विद्यापीठे आहेत.

टॅग्स :Marathi Bhasha Dinमराठी भाषा दिनmarathiमराठी