शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मराठा सैनिक तैनात असतो, तिथला शत्रू घाबरतो; लष्करप्रमुखांची स्तुतिसुमनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 07:10 IST

कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविण्याची क्षमता मराठा इन्फंट्रीमध्ये आहे, असे गौरवोद्गार लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी काढले.

कोल्हापूर : मराठा लाईट इन्फंट्री ही शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन चालते. जेथे मराठा सैनिक तैनात असतो, तेथे शत्रू कायम घाबरत असतो. कारण कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविण्याची क्षमता मराठा इन्फंट्रीमध्ये आहे, असे गौरवोद्गार लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी काढले.कोल्हापुरातील टेंबलाईवाडी येथील १०९ इन्फंट्री बटालियन (प्रादेशिक सेना) येथे बुधवारी भारतीय सेनेतर्फे माजी सैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याला उपस्थित राहण्यासाठी कोल्हापुरात आले असता, त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.रावत म्हणाले, मराठा लाईट इन्फंट्रीचा इतिहास मोठा आहे. या इन्फंट्रीला २५० वर्षे पूर्ण झाली आहेत. रणभूमीवरील इतिहासात असे एकही युद्ध नाही, जिथे ११४ मराठा रेजिमेंट लढला नाही. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी विजय मिळवूनच मराठा सैनिक परततात.पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांची सत्ता आल्यामुळे भारतीय सैन्यदलाच्या धोरणांत काही विशेष बदल केला आहे काय, यावर रावत म्हणाले, सत्ता कोणाचीही व कोणतीही असली तरीही अतिरेकी त्यांच्या कारवाईत सतत बदल करत असतात. त्यानुसार आम्हीही सतत आमचीही व्हूहरचना बदलतो. अतिरेक्यांकडून ‘स्नायपर’ बंदुकीचा वापर झाल्याचे अजून स्पष्ट झालेले नाही तरीही आपल्याकडील एके-४७ सह अन्य अत्याधुनिक कॅमेरे असलेल्या बंदुकांसह आपण त्यांचा सामना करू शकतो.नक्षल्यांचे हल्ले वैफल्यातूनसततच्या कारवायांमुळेच नक्षली हतबल झाले आहेत. त्यांच्याकडून प्रसारमाध्यमांवर होणारे हल्ले वैफल्यातून होत असून केंद्रीय सशस्त्र दल तसेच निमलष्करी दल नक्षलींचा सामना करण्यास सक्षम आहेत, असेही लष्करप्रमुख रावत यांनी सांगितले.तसेच या वेळी त्यांनी माजी सैनिक, अधिकारी, वीरमाता व वीरपत्नी यांची आपुलकीने चौकशी केली तसेच त्यांच्या समस्या जाणून घेत, प्रश्न तत्काळ सोडविण्याच्या सूचनाही दिल्या.

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतIndian Armyभारतीय जवान