शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणावरून मराठा समाजाची फसवणूक होण्याची शक्यता - पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 07:28 IST

राज्यातील विद्यमान सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाबाबत काही ज्येष्ठ वकील मंडळींनी माझ्याकडे शंका उपस्थित केली आहे.

पाटण (जि.सातारा) : राज्यातील विद्यमान सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाबाबत काही ज्येष्ठ वकील मंडळींनी माझ्याकडे शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे मराठा समाजाला दिलेले आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकण्यासाठी सरकारने खबरदारी घ्यावी, अन्यथा धनगर समाजाप्रमाणे मराठा समाजाचीही फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही,’ अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी व्यक्त केली.येथील एका कार्यक्रमात ते म्हणाले, ‘गत आॅगस्टमध्ये झालेल्या १०२ व्या घटनादुरुस्तीचा अभ्यास करण्याची गरज आहे. त्या घटना दुरुस्तीमधील ‘२३४ बी’ नुसार राष्ट्रपती शैक्षणिक आणि सामाजिक निकषांनुसार निर्णय घेऊ शकतात. ती घटनादुरुस्ती सरकारने लक्षात घेतली नसावी, अशी शंका राज्यातील काही ज्येष्ठ वकील मंडळींनी माझ्याकडे व्यक्त केली आहे. आता मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला असून, तो कायद्याच्या कसोटीवर टिकावा याची खबरदारी सरकारने घ्यावी.’आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्षांची आघाडी करण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. देशातील सर्व घटक पक्ष आघाडीसोबत येण्यास तयार असल्यामुळे ही आघाडी निश्चित होईल. तसाच प्रयत्न राज्यपातळीवर व्हावा, यासाठी विविध पक्षांच्या अध्यक्षांबरोबर बोलणी सुरू असल्याचेही पवार यांनी सांगितले. ते माजी सार्वजनिक बांधकाममंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवी  गौरव सोहळ्यासाठी पाटण येथे आले होते.‘निवडणुकीपूर्वी भाजपाने सत्तेवर आल्यानंतर पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देऊ, असा शब्द दिला आहे. मात्र, दिलेला शब्द न पाळता त्यांनीच धनगर समाजाची फसवणूक केली आहे, असा पलटवारही त्यांनी केला.गांधी घराण्याचे पवारांकडून कौतुकमाजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले. गांधी घराणे देशाची सेवा करण्यात कुठेही मागे पडलेले नाही.असे असूनही पंतप्रधान मोदी त्यांच्यावर तोंडसुख घेत आहेत, हे कितपत योग्य आहे? असा सवाल करुन पवारांनी गांधी घराण्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली.जिंकलेल्या जागा त्याच पक्षाकडे...महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांबाबत दोन्ही काँग्रेसची बोलणी सुरू आहे. ४० जागांवरची बोलणी पूर्ण होऊन त्याबाबतचा निर्णय झाला आहे. उर्वरित ८ जागांबाबत प्रदेश पातळीवर चर्चा सुरू आहेत. राज्यात ज्या जागा पक्षाने जिंकल्या आहेत. त्या जागा त्याच पक्षाकडे राहणार आहेत.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaratha Reservationमराठा आरक्षण