शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"उसने तो सबको हिला के रख दिया है"; मनोज जरांगेंची दिल्लीत चर्चा, खुद्द CM शिंदेंनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 13:46 IST

आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका समाजासह सरकारचीही आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

जालना – गेल्या अनेक दिवसांपासून अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी इथं आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जरांगे पाटील यांना ज्यूस पाजून उपोषण सोडले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी हे आंदोलन केले होते. जालना इथं पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर या घटनेमुळे राज्यभरात मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा पेटला. त्यात मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाची दखल राज्यासह देशातील मीडियानेही घेतली होती.

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत घडलेला एक किस्सा सांगितला आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला. मुख्यमंत्री म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल कोर्टानेही घेतली. तुमचे आंदोलन सर्वांपर्यंत पोहचले. मी दिल्लीत गेलो होते तेव्हा मला ये मनोज जरांगे पाटील कौन है असा प्रश्न विचारण्यात आला होता. मी म्हटलं सामान्य कार्यकर्ता आहे, तर त्यावर उसने तो सबको हिला के रखा है असं समोरच्यांनी सांगितले हा संवाद शिंदेंनी ऐकवला. तेव्हा उपस्थित गावकऱ्यांमध्ये हशा पिकला.

तसेच मराठा आरक्षण देण्याची सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मराठा आरक्षण रद्द झाले तेव्हा ३७०० मुलांच्या मुलाखती झाल्या होत्या परंतु त्यांना नोकरी मिळाली नव्हती. त्यावेळी त्यांना नोकरी देण्याचे धाडस सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे कुणी करत नव्हते. परंतु मी सांगितले जे काही होईल त्याला तोंड देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि मुख्यमंत्री म्हणून माझी आहे. आपण ३७०० जणांना नोकऱ्या देऊन टाकू आणि त्या दिल्या. ते आज नोकरीवर आहेत. मराठा समाजाची जी मागणी आहे ते ते आपण पूर्ण करतोय. जे फायदे ओबीसीला मिळतात ते फायदे मराठा समाजाला सरकार देतंय. आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका समाजासह सरकारचीही आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आता आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. एकनाथ शिंदेदेखील गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेला कार्यकर्ता आहे आणि आपलाच आहे. मराठा समाजाच्या भावनेची मला जाणीव आहे. साताऱ्यात आपले आंदोलन होते तेव्हा माझे बाबा तयारी करत होते. मी विचारले कुठे चाललाय, तर बोलले आंदोलनाला, मी विचारले कोणत्या तर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन आहे तिथे चाललोय. समाजाबद्दल ही आपुलकी आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदे