शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

"उसने तो सबको हिला के रख दिया है"; मनोज जरांगेंची दिल्लीत चर्चा, खुद्द CM शिंदेंनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 13:46 IST

आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका समाजासह सरकारचीही आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

जालना – गेल्या अनेक दिवसांपासून अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी इथं आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जरांगे पाटील यांना ज्यूस पाजून उपोषण सोडले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी हे आंदोलन केले होते. जालना इथं पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर या घटनेमुळे राज्यभरात मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा पेटला. त्यात मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाची दखल राज्यासह देशातील मीडियानेही घेतली होती.

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत घडलेला एक किस्सा सांगितला आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला. मुख्यमंत्री म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल कोर्टानेही घेतली. तुमचे आंदोलन सर्वांपर्यंत पोहचले. मी दिल्लीत गेलो होते तेव्हा मला ये मनोज जरांगे पाटील कौन है असा प्रश्न विचारण्यात आला होता. मी म्हटलं सामान्य कार्यकर्ता आहे, तर त्यावर उसने तो सबको हिला के रखा है असं समोरच्यांनी सांगितले हा संवाद शिंदेंनी ऐकवला. तेव्हा उपस्थित गावकऱ्यांमध्ये हशा पिकला.

तसेच मराठा आरक्षण देण्याची सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मराठा आरक्षण रद्द झाले तेव्हा ३७०० मुलांच्या मुलाखती झाल्या होत्या परंतु त्यांना नोकरी मिळाली नव्हती. त्यावेळी त्यांना नोकरी देण्याचे धाडस सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे कुणी करत नव्हते. परंतु मी सांगितले जे काही होईल त्याला तोंड देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि मुख्यमंत्री म्हणून माझी आहे. आपण ३७०० जणांना नोकऱ्या देऊन टाकू आणि त्या दिल्या. ते आज नोकरीवर आहेत. मराठा समाजाची जी मागणी आहे ते ते आपण पूर्ण करतोय. जे फायदे ओबीसीला मिळतात ते फायदे मराठा समाजाला सरकार देतंय. आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका समाजासह सरकारचीही आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आता आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. एकनाथ शिंदेदेखील गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेला कार्यकर्ता आहे आणि आपलाच आहे. मराठा समाजाच्या भावनेची मला जाणीव आहे. साताऱ्यात आपले आंदोलन होते तेव्हा माझे बाबा तयारी करत होते. मी विचारले कुठे चाललाय, तर बोलले आंदोलनाला, मी विचारले कोणत्या तर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन आहे तिथे चाललोय. समाजाबद्दल ही आपुलकी आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदे