शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

नवा अल्टिमेटम! तारीख ठरली, अंतरवालीत या...; मनोज जरांगेंची पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 12:06 IST

या उपोषणात माझा शेवटही होऊ शकतो. कुटुंबाला सांगतो, मी नसलो तरी समाजासाठी योगदान द्या. लढा कधीही बंद करू नका हे समाजाला आवाहन आहे. 

जालना - २५ जानेवारी २०२५ ला तुफान ताकदीने घराघरातील मराठ्यांनी अंतरवालीला या. नोकरदार, शेतकरी सर्वांनी मराठ्यांच्या लेकरासाठी एकजूट होऊन अंतरवालीत यावे. मराठा समाजाच्या बैठका सुरू करा. कुणीही घरात राहू नका. राज्यभरातील कानकोपऱ्यातील मराठ्यांनी लेकराबाळासह अंतरवालीत यावं. मराठ्यांचे भगवं वादळ उसळू द्या असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी करत पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे.

अंतरवालीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, २५ जानेवारीला एकानेही लग्नाची तारीख धरू नये. सगळा मराठा समाज अंतरवालीकडे येणार आहे. त्याच ताकदीने मराठा वादळ उसळणार आहे. २५ जानेवारीला माझं आमरण उपोषण सुरू होणार आहे. २४ जानेवारीलाच रात्री गोरगरिब मराठा समाज इथं जमणार आहे. त्यामुळे २५ जानेवारी २०२५ च्या आत मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करा. मागण्या मान्य केल्या नाही तर तुम्हाला गुडघे टेकायला लावणार. २५ जानेवारीपर्यंत आरक्षण दिले नाही मराठा समाजाची तुम्ही बेईमानी केली तर तुम्हाला सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला. 

तसेच तुमची मध्यस्थी असो किंवा अन्य काही आम्ही ऐकून घेणार नाही. सगेसोयरे यांच्या अधिसूचनेला २६ जानेवारीला एक वर्ष पूर्ण होतंय अद्याप त्याची अंमलबजावणी केली नाही. गॅझेट लागू केले नाहीत. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे दिले नाहीत. मराठा-कुणबी एकच हादेखील अध्यादेश काढला नाही. त्यामुळे २५ जानेवारीपासून उपोषणाला सुरूवात करतोय. मराठा समाजाने २५ जानेवारीपर्यंत सगळी कामे आटपून घ्यावीत. जितके दिवस आपल्याला बसावे लागेल तितके आपण बसूया असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण घेईपर्यंत अंतरवालीतून उठायचं नाही. मराठा समाजाचे जे लोक इथं अंतरवालीत येणार त्यांनी येताना ज्या ज्या गोष्टी लागतात त्या घेऊन या. अंथरूण पांघरूण घ्या. कितीही श्रीमंत असला आणि कितीही गरीब असला तरी हॉटेलवर जायचे नाही. जेवायला जायचं नाही. पाण्याची व्यवस्था करून घ्यायची. गोरगरिबाच्या लढ्यात सामील व्हायचं. जेवण इथं स्वत:चं करायचं. ज्यांना उपोषण करायचं त्यांनी करा. ज्यांना नाही करायचं त्यांनी पाठिंबा द्यायला या. घरच्यांच्या विरोधात जाऊन उपोषण करू नका. मी इथं मरायला खंबीर आहे. तुम्ही खूप एकजूट दाखवली. मी समाजाच्या अपेक्षा भंग होऊ देणार नाही. मी कधीच गद्दारी करणार नाही. कधी मॅनेज होणार नाही हा माझा शब्द आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

"माझा शेवटही होऊ शकतो"

मला उपोषण आता सहन होत नाही. मी महाराष्ट्राचे दौरे करून आलो तर मला ४ दिवस आराम करावा लागला. सलाईन घ्यावे लागले. माझे खूप हाल आहेत. वेदना आहे. माझा शेवटही होऊ शकतो. माझा मराठा समाज सांभाळा. मी मागे हटणार नाही. शरीर साथ देत नाही. पहिले मी ८-१५ दिवस उपोषण करू शकत होतो. आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशीही हाल होणार आहेत. मला आत्ताच उठता बसता येत नाही. त्यामुळे माझे प्रचंड वेदना आहेत. या उपोषणात माझा शेवटही होऊ शकतो. कुटुंबाला सांगतो, मी नसलो तरी समाजासाठी योगदान द्या. लढा कधीही बंद करू नका हे समाजाला आवाहन आहे. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे