शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जरांगेंचा इशारा, सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी कधी?; चंद्रकांत पाटलांनी दिलं थेट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 09:54 IST

चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या सगेसोयरे अधिसूचनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

Chandrakant Patil ( Marathi News ) : आरक्षण प्रश्नावरून महाराष्ट्रात मागील काही महिन्यांपासून मोठा गदारोळ सुरू आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारल्यानंतर ओबीसी नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेत या मागणीला कडाडून विरोध केला आहे. या दोन्ही घटकांच्या आंदोलनामुळे राज्य सरकार कोंडीत सापडल्याची स्थिती आहे. अशातच भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या सगेसोयरे अधिसूचनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, "सरकारने जी सगेसोयऱ्यांची अधिसूचना काढलेली आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी स्वत: ड्राफ्ट केलेली आहे. सरकारने ती त्यांच्यावर थोपवलेली नाही. या अधिसूचनेवर ८ लाखांच्या आसपास सूचना आणि हरकती आलेल्या आहेत. या हरकती तपासल्यानंतर आम्ही अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करणारच आहोत. या अधिसूचनेमुळे ओबीसी समाजाने घाबरण्याचं काहीच कारण नाही, हे आम्ही ओबीसी समाजाला समजावून सांगत आहोत. ही अधिसूचना निघाल्यामुळे ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का बसत नाही. एखाद्याचं कुणबी प्रमाणपत्र सापडल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनाही हे प्रमाणपत्र मिळावं, अशी ती अधिसूचना आहे," अशा शब्दांत पाटील यांनी सरकारची भूमिका मांडली. 

दरम्यान, २०१७ सालीच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना याबाबत एक निर्णय घेतला होता. रक्तसंबंधांमध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही, असा कायदा केला होता, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

मनोज जरांगेंचा इशारा 

मनोज जरांगे पाटील यांनी सध्या मराठा शांतता रॅलीला सुरुवात केली आहे. "सरकारने आता मराठा समाजाचा संयम पाहू नये. १३ जुलैपर्यंत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण द्यावे व सगेसोयरे कायदा अमलात आणावा, अन्यथा त्यानंतरची भेट थेट मुंबईत होईल," असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी हिंगोलीत संवाद रॅलीदरम्यान दिला. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत संवाद रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीला ६ जुलैला हिंगोलीतून प्रारंभ झाला. यावेळी मराठा समाजबांधवांशी संवाद साधताना जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळांवर कडाडून टीका केली. भुजबळांचे ऐकून मराठ्यांचे नुकसान करू नका, नाही तर या सरकारला जड जाईल. मराठ्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर २८८ पैकी एकही उमेदवार सरकारचा निवडून येऊ देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी दिला.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणchandrakant patilचंद्रकांत पाटील