शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

हजारो लोक उद्यापासून आमरण उपोषण करणार; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 12:25 IST

जालना इथं मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत. आज या उपोषणाचा चौथा दिवस आहे.

अंतरवाली सराटी – मी मराठा समाजाच्या शब्दापुढे जात नाही. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतोय, कुणीही आत्महत्या करू नये. सरकारने आंदोलन गांभीर्याने घ्या, लोकांची लेकरं मरत असताना मज्जा घेऊ नका. मराठा समाजाला तातडीनं आरक्षण द्या. उग्र आंदोलन करू नका, शांततेत आंदोलन करू. उद्या २९ तारखेपासून आमरण उपोषण सुरू करा असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजातील लोकांना केले आहे.

जालना इथं मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत. आज या उपोषणाचा चौथा दिवस आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, वयाचा अंदाज घेऊन उद्यापासून आमरण उपोषण सुरू करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी आमरण उपोषण सुरू करा. एकदिलाने एकत्र बसा. सरकारवर दबाव निर्माण करू. प्रत्येक गावात आमरण उपोषण सुरू करा. आपल्या गावात, आपल्या दारात कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला येऊ द्यायचे नाही आणि मराठा समाजानेही राजकीय पक्षांच्या दारात जायचे नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.

तसेच आज संध्याकाळपर्यंत सरकारकडून काही उत्तर येतंय ते पाहू. उद्यापासून गावागावत आमरण उपोषण सुरू करा. कुणाच्याही जीवितास धोका झाल्यास त्याची सगळी जबाबदारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारची असेल. आता दुसऱ्या टप्प्यातील उपोषणाला सुरूवात झाली आहे. मराठा समाज एकत्र आल्याने समाजाची ताकद मोठी वाढणार आहे. मराठ्यांना बळ द्यायचे असेल आमदार, खासदारांनी मुंबईत जा, आपापल्या परीने संघर्ष करा. राज्यातले कोणकोण आमदार, खासदार, मंत्री एकत्र येतायेत हे पाहू असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, मराठा-धनगर बांधवांचे एकच दुखणे आहे. मुस्लीम समाजाचेही दुखणे आहे. त्यांना सुद्धा आरक्षण देऊ देऊ म्हणून गोड बोलून त्यांना आरक्षणापासून लांब ठेवलंय. आमच्यामुळे धनगर समाजही सावध झाला आहे. मराठा आणि धनगर समाज एकत्र आला तर मोठी शक्ती उभी राहील. दोघांनाही आरक्षण मिळेल. मराठा आंदोलन सुरू आहे हे केंद्र सरकारला माहिती आहे. तुम्हाला खरेच मराठ्यांची माया असेल आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील