शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

कोट्यवधी मराठे २४ डिसेंबरनंतर मुंबईत, मनोज जरांगे-पाटील यांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 12:48 IST

Maratha Reservation: कोणाच्या दबावाखाली येऊन शासनाने २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर कोट्यवधी मराठे मुंबईत धडकतील आणि शांततेचे हे आंदोलन तुम्हाला जड जाईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.

जालना - अंतरवालीसह महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे अद्याप मागे घेतलेले नाहीत. कोणाला अटक करणार नाही, असे आश्वासन दिलेले असताना लोकांना अटक केली जात आहे. कोणाच्या दबावाखाली येऊन शासनाने २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर कोट्यवधी मराठे मुंबईत धडकतील आणि शांततेचे हे आंदोलन तुम्हाला जड जाईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी अंतरवाली सराटी येथे १७ डिसेंबर रोजी बैठक होणार असल्याचेही ते म्हणाले.

शहरातील पांजरपोळ मैदानावर शुक्रवारी जरांगे-पाटील यांची सभा झाली. धनगर आरक्षणाबाबत ते भूमिका स्पष्ट करत नाहीत. ज्या जाती ओबीसीत आहेत त्या जातींवरही त्यांनी अन्याय केला आहे, अशी टीका त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केली. 

आता आम्ही दंड आणि मांड्या थोपटल्या आहेत. लेकरांच्या न्यायासाठी कोणत्याही टाेकाला जाऊ. मुंबईत येऊ; परंतु उग्र आंदोलन करणार नाही आणि शांततेचे आंदोलन तुम्हाला पेलणार नाही. आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आले असून, ३२ लाख मराठ्यांच्या घरात प्रमाणपत्र गेले आहे. त्यामुळे कोणीही उग्र आंदोलन करू नये. - मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते

या प्रश्नांची द्या उत्तरेअंतरवाली सराटीसह महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे का मागे घेतले नाहीत, कोणालाही अटक करणार नाही, असे आश्वासन दिलेले असताना आमच्या लोकांना अटक का केली, एमसीआर मिळालेला असताना पीसीआर कसा काय घेतला, आमच्यावर हल्ला करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना का रुजू केले, या प्रश्नांची उत्तरे शासनाने द्यावीत, अशी मागणीही जरांगे-पाटील यांनी सभेत केली.  

कुचेंवरही हल्लाबोल जरांगे-पाटील यांनी भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्यावरही हल्लाबोल केला. आंदोलनादरम्यान मध्यस्थीस तुम्ही आले होते; परंतु त्यांना दोन नावे कोणी दिली. बीडमधील मराठा बांधवांना धनंजय मुंडे गुंतवत असल्याचे आ. कुचे यांनी फोनवर सांगितल्याचा आरोप करत एमसीआरचा पीसीआर तुम्ही दोघांनी करायला लावला, असा संशय असल्याचेही ते म्हणाले. 

सभास्थळी उसळला लाखोंचा जनसमुदाय - १४० एकर मैदानावर सभेचे नियोजन करण्यात आले होते. १०० एकरांत पार्किंग आणि ४० एकरांत सभा झाली. गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे मैदान ओले झाले होते.- परंतु अशा ओल्या मैदानावरही लाखोंवर मराठा समाजबांधवांनी शुक्रवारी सकाळपासून ते रात्री सभा होईपर्यंत हजेरी लावली होती.- जरांगे पाटील यांचे जालना शहरात स्वागत झाल्यानंतर २० हजार दुचाकींसह युवकांची रॅली काढण्यात आली. यावेळी जरांगे पाटील यांचे सर्वधर्मीयांच्या वतीने स्वागत करण्यात आले.  

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणMumbaiमुंबई