शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

जरांगेंची मुंबईकडे कूच; मुख्यमंत्री 'अलर्ट मोड'वर; आरक्षणाबाबत आश्वस्त करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 16:34 IST

मराठ्यांना कायद्याच्या चौकटीत बसणारं टिकणारं आरक्षण देण्यावर सरकार ठाम आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

CM Eknath Shinde ( Marathi News ) : राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आज झालेली बैठकही निष्फळ झाली असून आम्ही मुंबईला जाणारच, अशी ठाम भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाने सरकारला सहकार्य करावं, असं आवाहन केलं आहे. तसंच मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यावर सरकार ठाम असल्याचंही शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

हजारो आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील हे आता लोणावळ्याहून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. आंदोलक लवकरच मुंबईत धडकणार असून जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, "सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे. आंदोलकांच्या मागणीप्रमाणे आम्ही आश्वासन न देता थेट ओबीसींप्रमाणे ज्या सुविधा मराठा समाजाला देणं आवश्यक आहे त्या सुविधा देण्याचं काम करत आहोत. जरांगे पाटलांशी होत असलेल्या चर्चा सकारात्मक आहेत. मराठा समाजाला ज्या सोई-सुविधा द्यायच्या आहेत त्यामध्ये सरकार अजिबात आखडता हात घेणार नाही. तसंच मराठ्यांना कायद्याच्या चौकटीत बसणारं टिकणारं आरक्षण देण्यावर सरकार ठाम आहे," असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

काय आहे जरांगेंचा आरोप?

सरकारच्या शिष्टमंडळाकडून सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली जात आहे. मात्र या चर्चेतून अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नाही. "आमच्या ज्या मागण्या आधी होत्या त्या अजूनही कायम आहेत. सरकार फक्त मागण्या घेऊन जातं, पण त्यातील काही शब्द काढून परत कागदे घेऊन येतात. त्यामुळे तोडगा निघत नाही," असा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उद्या हजारो आंदोलक राजधानी मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबईत पोहोचण्याआधी सरकार आणि जरांगे पाटलांमध्ये एकमत होऊन आंदोलनावर तोडगा निघणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण