शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जरांगेंची मुंबईकडे कूच; मुख्यमंत्री 'अलर्ट मोड'वर; आरक्षणाबाबत आश्वस्त करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 16:34 IST

मराठ्यांना कायद्याच्या चौकटीत बसणारं टिकणारं आरक्षण देण्यावर सरकार ठाम आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

CM Eknath Shinde ( Marathi News ) : राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आज झालेली बैठकही निष्फळ झाली असून आम्ही मुंबईला जाणारच, अशी ठाम भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाने सरकारला सहकार्य करावं, असं आवाहन केलं आहे. तसंच मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यावर सरकार ठाम असल्याचंही शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

हजारो आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील हे आता लोणावळ्याहून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. आंदोलक लवकरच मुंबईत धडकणार असून जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, "सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे. आंदोलकांच्या मागणीप्रमाणे आम्ही आश्वासन न देता थेट ओबीसींप्रमाणे ज्या सुविधा मराठा समाजाला देणं आवश्यक आहे त्या सुविधा देण्याचं काम करत आहोत. जरांगे पाटलांशी होत असलेल्या चर्चा सकारात्मक आहेत. मराठा समाजाला ज्या सोई-सुविधा द्यायच्या आहेत त्यामध्ये सरकार अजिबात आखडता हात घेणार नाही. तसंच मराठ्यांना कायद्याच्या चौकटीत बसणारं टिकणारं आरक्षण देण्यावर सरकार ठाम आहे," असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

काय आहे जरांगेंचा आरोप?

सरकारच्या शिष्टमंडळाकडून सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली जात आहे. मात्र या चर्चेतून अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नाही. "आमच्या ज्या मागण्या आधी होत्या त्या अजूनही कायम आहेत. सरकार फक्त मागण्या घेऊन जातं, पण त्यातील काही शब्द काढून परत कागदे घेऊन येतात. त्यामुळे तोडगा निघत नाही," असा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उद्या हजारो आंदोलक राजधानी मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबईत पोहोचण्याआधी सरकार आणि जरांगे पाटलांमध्ये एकमत होऊन आंदोलनावर तोडगा निघणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण