शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षण आणि ‘सगेसोयरें’बाबत जरांगे पाटील ठाम, उद्या आंदोलनाची घोषणा, सरकारने दिलेल्या आरक्षणाबाबत म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 14:41 IST

Maratha Reservation : आज मराठा समाजाला घोषित करण्यात आलेल्या आरक्षणाचं स्वागत करतानाचा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यामधून आरक्षण द्यावं आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत, त्यांच्यासाठी सगेसोयरेंच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, या मागणीवर ठाम असल्याचे म्हटले आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आज बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत मांडलेला ठराव एकमताने संमत झाला आहे. या ठवानुसार मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये १० टक्के आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र मराठा समाजाला देण्यात आलेल्या या आरक्षणाचं स्वागत करतानाचा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यामधून आरक्षण द्यावं आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत, त्यांच्यासाठी सगेसोयरेंच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, या मागणीवर ठाम असल्याचे म्हटले आहे. तसेच यासाठी उद्या आंदोलनाची घोषणा करणार असल्याचा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत विधिमंडळात मांडलेला प्रस्ताव एकमताने पारित झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, या आरक्षणाचं आम्ही आधीही स्वागत केलं होतं. आताही शंभर दिडशे जणांना लाभ होणाऱ्या या आरक्षणाचं आम्ही स्वागत करतो. मात्र हक्काचं ओबीसी आरक्षण मिळावं ही ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत अशा आमच्या कोट्यवधींच्या संख्येने असलेल्या मराठा समाजाची मागणी आहे. तसेच ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांच्यासाठी सगेसोयरेंची अंमलबजावणी करा ही आमची मागणी आहे.  आम्हाला जे पाहिजे आहे ते आम्ही मिळवणारच. त्यासाठी आम्ही उद्या आंदोलनाची घोषणाही करणार आहोत, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारने दिलेले हे आरक्षण टिकेल का यााबबत शंका आहे. हे आरक्षण राज्यापुरतं आहे आणि आमचं जे हक्काचं आऱक्षण आहे. ते राज्यापासून केंद्रापर्यंत लागू होणारं आहे. आमची मुलं तिथं मोठी होतील. आज पारित झालेल्या या आरक्षणाची मागणी ही  दोघा तिघांची होती. त्यातून शंभर दीडशे जणांना फायदा होईल. मात्र त्याबाबत आम्ही त्यांचं स्वागतच केलेलं आहे. पण त्यातून गोरगरीब मराठ्यांच्या मुलांचं कल्याण होणार नाही. त्यामुळे आमचं हक्काचं असलेलं आरक्षण आम्हाला ओबीसी कोट्यामधून  द्यावं. तसेच ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाही त्यांच्यासाठी सगेसोयरेंच्या अध्यादेशाची अंमलबजावणी हवी आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत, असे जरांगे पाटील यांनी आज ठामपणे सांगितले.  

यावेळी सगेसोयरेंच्या अध्यादेशाबाबत संयम बाळगा, अशा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनाबाबत विचारले असता मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे म्हणून तर आम्ही सरकारला सहा महिन्यांचा वेळ दिला होता. मात्र प्रत्येक वेळी माणूस भावनिक होऊन आपल्या जातीच्या लेकराचं वाटोळं करून घेऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांना सरकार म्हणून जशा मर्यादा आहेत. तसेच आम्हालाही काही मर्यादा आहे. तुमच्या आश्वासनानं आमच्या मुलांचं पोट भरणार नाही. आमची मुलं २०-२५ वर्षे शिकतात. पण त्यांचं भविष्य घडण्याच्या वेळी त्यांची संधी हिरावली जाते. त्यामुळे आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला पाहिजे. ते कसं द्यायचं ते तुम्ही ठरवा. तसेच सगेसोयरेबाबत आलेल्या हरकतीचं तुम्हाला काय करायचं आहे तो आमचा प्रश्न नाही तो सरकारचा आहे.  हरकतींचा विषय पुढे करून एवढ्य मोठ्या समाजाचा अपमान करायचा ही सरकारची भूमिका योग्य नाही ,असेही जरांगे पाटील यांनी सुनावले.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदेOBC Reservationओबीसी आरक्षण