शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

…तर देवेंद्र फडणवीस यांच्या दारात आंदोलनाला बसू, मनोज जरांगे पाटलांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 13:21 IST

Maratha Reservation: आंदोलनासाठी मुंबईत येणारे ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न केल्यास देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोरच आम्ही आंदोलना बसू, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्यात यावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून आक्रमक आंदोलन करत आहेत. आता मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून अंतरवली सराटी येथून मुंबईपर्यंत मोर्चा काढून मुंबईत उपोषण करण्याची घोषणा केली आहे. तसेच या आंदोलनासाठी सुमारे ३ कोटी मराठे मुंबईत येतील असा दावाही त्यांनी केला आहे. तसेच आंदोलनासाठी मुंबईत येणारे ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न केल्यास देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोरच आम्ही आंदोलना बसू, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

आरक्षणासाठी मराठा समाजाकडून मुंबईत करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत आज प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आंदोलनासाठी मुंबईत येणारी वाहनं अडवू नयेत, अडवल्यास ती वाहनं गृहमंत्र्यांच्या दारात उभी करू असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला होता. त्याबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, गृहमंत्री वाहनं अडवणार नाहीत. वाहनं अडवली तर आम्ही सामान कसं न्यायचं. आम्हाला खाण्यापिण्याचं सामान, कपडे, इतर वस्तू लागणार आहेत. वाहनं अडवली तर  कशा न्यायच्या, डोक्यावरून न्यायच्या का? आम्हाला तिथे राहुट्या नसतील तर उन थंडीपासून बचावासाठी ट्रॅक्टरमध्येच आसरा घ्यावा लागणार आहे. त्यामुळे ट्रॅक्टरबरोबर ट्रॉली लागणार आहे. ट्रॉलीमध्ये या वस्तू ठेवाव्या लागणार आहेत. पाऊस आला तर आमची त्या ट्रॉलीमध्येच झोपायची व्यवस्था होणार आहे. तिथे आम्हाला कुणी घर देणार आहे का? दिलं तरी कोट्यवधी लोकांना जागा मावणार आहे का? मग तुम्ही जर आमचे ट्रॅक्टर अडवणार असाल. त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असाल, गाड्या, ट्रॅक्टर अडवून जप्ती आणणार असाल तर तुम्ही अडवा बघू कसे अडवता ते. एकाही ट्रॅक्टरवाल्याने घाबरण्याचं कारण नाही. कारण आपण ते दैनंदिन गरजा भावण्यासाठी नेणार आहोत. कोण ट्रॅक्टर अडवते ते बघूयाच. सगळ्या मराठा बांधवांना विनंती आहे की कुणीही घाबरण्याचं कारण नाही. कुणाचाही ट्रॅक्टर जप्त होणार नाही. जर ट्रॅक्टर अडवलेच तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दारात आम्ही सगळे जाऊन बसू. नागपूरच्या आणि मुंबईच्या त्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलना बसू. देवेंद्र फडणवीस यांच्या दारातच जाऊन बसायचं. करोडोंच्या संख्येने जाऊन बसायचं उठायचंच नाही. ट्रॅक्टर अडवाच तुम्ही. कसे गुन्हे दाखल करता, तेच बघूया, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

तसेच मराठा आरक्षणासाठी मुंबईत आमरण उपोषण होणार आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत. त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळतील. हे आंदोलन शांततामय आणि लोकशाही मार्गाने होणार आहे. त्यामुळे आम्हाला परवानगी द्यावीच लागेल. परवानगी न मिळाल्यास या देशात कायदा, नियम आणि लोकशाहीच राहिली नाही, असा त्याचा अर्थ होईल, असेही जरांगे पाटील म्हणाले.

मुंबईत होणाऱ्या आंदोलनासाठीची व्यवस्था पाहण्यासाठी आमचं शिष्टमंडळ गेले आहे. आंदोलकांची संख्या पाहता आम्हाला अनेक मैदानं लागणार आहेत. तसेच मराठा बांधवांमध्ये मतभेद असलीत नसतील माहिती नाही. पण सर्व मराठ्यांनी मतभेद सोडून गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून एकत्र येऊन साथ द्यावी, सोबत यावं, अशी विनंती आम्ही मुंबईतील मराठा बांधवाना केली आहे, असेही जरांगे पाटील यांनी सांगितलं. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMumbaiमुंबई