शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

Maratha Reservation:”...त्याच दिवशी दिल्लीत खासदारकीचा राजीनामा देणार होतो”; छत्रपती संभाजी महाराजांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 16:36 IST

राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांवर ढकलत आहे. आम्हाला आरक्षण(Maratha Reservation) मिळावं हीच अपेक्षा. सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली त्याचा कुठला पाठपुरावा केला आहे?

ठळक मुद्देपहिल्यांदा राज्य सरकारने जबाबदारी घेऊन मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक मागासलेले पण सिद्ध करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजेमराठा समाजाच्या वतीने मी पुढे येतो तुम्हीही आमनेसामने या होऊन जाऊ दे चर्चा असं मी म्हणतोय पण कुणीही येत नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला १५ पानी पत्र पाठवलं. या पत्रातही खूप तफावती आहे

नांदेड - संसदेचं अधिवेशन सुरु होतं. मराठा समाजाची भावना संसदेत मांडायची असं मी मागणी केली. पण मला बोलायला परवानगी दिली नाही. कुठलीही गोष्ट भांडल्याशिवाय मिळत नाही. माझ्या समाजाची ताकद आहे. शिवशाहूचा वारसा गप्प बसणार का? दिल्लीत शिवाजी महाराजांचा अपमान झाला तेव्हा दरबारात राजेंनी औरंगजेबाला धुडकावून लावलं होतं. मला जर त्या दिवशी बोलायला दिलं नसतं तर त्याच दिवशी खासदारकी सोडून टाकली असती असा गौप्यस्फोट खासदार छत्रपती संभाजी महाराज(Sambhajiraje Chhatrapati) यांनी केला आहे.

नांदेड येथील मराठा क्रांती मूक आंदोलनावेळी संभाजीराजे बोलत होते. ते म्हणाले की, मला बोलायची संधी मिळाली. ज्या शाहू महाराजांनी संपूर्ण भारतात पहिल्यांदा आरक्षण दिलं त्यावर बोलायला मिळालं नाही तर उपयोग काय? अशा भाषणानं मी सुरुवात केली. महाराष्ट्रातील खासदारांनी मला बोलता यावं म्हणून मदत केली त्यांचे आभार मानतो. नुसतं जयजयकार करुन चालणार नाही. मराठा समाज पुढारलेला आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. हा समाज मागासलेले नाही असं म्हणत आरक्षण रद्द केले. त्यामुळे पुढे काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला. ५८ मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाने आरक्षणाबद्दल त्यांची भावना व्यक्त केली. नांदेडमध्ये इतक्या मोठ्या संख्येने लोक जमले आहेत. लोकं बोलले, आम्ही बोलले आता लोकप्रतिनिधींनी बोललं पाहिजे. फक्त बोलून नव्हे कृतीतून दाखवायला हवे. स्वराज्य हे फक्त मराठ्यांसाठी नाही अठरापगड जाती १२ बलुतेदारांसाठी निर्माण केले. शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं. ओबीसीला आरक्षण देताना मराठा समाजाचा समावेश करण्यात आला. मग गरीब मराठा समाजाला आरक्षण कधी मिळणार? आपला आवाज दिल्लीत उठायला हवाय असं संभाजीराजेंनी सांगितले.

तसेच राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांवर ढकलत आहे. आम्हाला आरक्षण(Maratha Reservation) मिळावं हीच अपेक्षा. सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली त्याचा कुठला पाठपुरावा केला आहे? केंद्राने आरक्षणाची ५० टक्के मर्यादा वाढवावी अशी राज्य सरकार मागणी करतंय. परंतु पहिल्यांदा राज्य सरकारने जबाबदारी घेऊन मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक मागासलेले पण सिद्ध करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. केंद्राने घटना दुरुस्ती करुन ५० टक्क्यांवर आरक्षण दिलं पाहिजे. मराठा समाजाच्या वतीने मी पुढे येतो तुम्हीही आमनेसामने या होऊन जाऊ दे चर्चा असं मी म्हणतोय पण कुणीही येत नाही अशी टीकाही छत्रपती संभाजीराजेंनी राजकीय नेत्यांवर केली.

दरम्यान, अशोक चव्हाणांना संभाजीराजेंना भेटायला वेळ नव्हता. दिल्लीत आले शिवसेना, काँग्रेस नेत्यांना भेटले. पण समाजाला दिशाहिन करणं चालणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला १५ पानी पत्र पाठवलं. या पत्रातही खूप तफावती आहे. १५ पानी पत्र पाठवायचं होतं मग पहिलं मूक आंदोलन कोल्हापूरला झालं, नाशिकला झालं, आमदार आले, मंत्री आले. मला मुख्यमंत्र्यांचे पत्र पटत नाही. १५ जुलैला सरकारचा एक जीआर निघाला. ज्यांच्या नियुक्त्या २०१४ पासून झालेत त्यांना पुन्हा कामावर घ्या. त्यावर लोकं खुश झाले. परंतु जात प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी कुठे आहे? असा सवाल अधिकाऱ्यांनी केला. मग जीआर काढण्याला अर्थ काय? असा संतप्त सवालही संभाजीराजेंनी उपस्थित केला.    

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Reservationमराठा आरक्षण