शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

आणखी किती दिवस चर्चा करायची, अन्याय सहन करणार नाही; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 10:56 IST

तुम्ही शब्द द्यायचा आणि पाळायचा नाही हे किती दिवस चालणार? असा सवाल जरांगेंनी सरकारला विचारला.

बीड - Manoj Jarange Patil on Maratha Reservation ( Marathi News ) चर्चेतून मार्ग निघतो,पण आम्ही थांबणार नाही. तुम्ही चर्चेत गुंतवून आम्हाला पुढे पुढे ढकलत राहणार हे चालणार नाही. आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण हवं आहे. सरकारसोबत आजही चर्चा सुरू आहे. वेळ देणार नाही. तुमचे शब्द होते, तुम्ही पूर्ण केला नाही. आम्ही कधीही चर्चेला आलेल्या परत पाठवले नाही.तुमचा सन्मानच केला. तुम्ही ३० दिवस मागितले आम्ही ४० दिवस दिले. चर्चेत गुंतवून ठेवायचे आणि विषय भरकटवायचा हे होणार नाही अशा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या सभेपूर्वी दिला आहे. 

बीडमध्ये जरांगे पाटलांची निर्णयाक सभा होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी २४ डिसेंबरपर्यंत सरकारला मुदत दिली होती.परंतु आजही यावर ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आज बीडच्या सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी पत्रकारांशी जरांगेंनी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा समाजाला किती दिवस तुम्ही झुलवत ठेवणार? आमच्या संयमाचा अंत पाहिला जातोय. तुम्ही शब्द द्यायचा आणि पाळायचा नाही हे किती दिवस चालणार? सुरुवातीला ३ महिने, त्यानंतर ४० दिवस दिले तरी पुढे काय झाले? अजूनही आज आणि उद्याचा दिवस आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच आम्ही कायद्याच्या चौकटीतच आरक्षण मागतोय, आम्ही मागास सिद्ध झालोय, ५४ लाख नोंदी सापडलेत. मग हे कायद्यात बसलेत ना..किती दिवस समाजाला येड्यात काढणार आहात? मराठ्यांनी किती दिवस अन्याय सहन करायचा हे आम्ही चालू देणार नाही. आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणारच. इच्छाशक्ती असली की एका दिवसात आरक्षण मिळेल. एकाचे ऐकून तुम्ही मराठ्यांवर अन्याय करताय. पुढील काळात मराठे कसे आरक्षण घेतात हे तुम्ही पाहा. मराठ्यांनी ज्याला मोठे केले, त्याच्या डोक्यात किडे भरले आहेत. विष ओकायला लागलेत. ही किती गटारगंगा होती हे मराठ्यांना लक्षात आले. कुजकं बोलतो का? माझ्या नादी लागू नको. शहाणा हो असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना दिले आहे. 

दरम्यान, सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावे, वारंवार चर्चा केली जातेय. तेच तेच सुरू आहे. सरकारने माझ्याशी संपर्क केला, बोलणं सुरू आहे. पण किती दिवस चर्चा करणार? संयमांचा अंत किती बघणार? प्रत्येकवेळी मराठ्यांनी शब्द पाळायचा. आम्हालाही काही मर्यादा आहेत. मुख्यमंत्र्यांशी बोलणे नाही, गिरीश महाजनांचा फोन आला होता. कायद्याच्या चौकट सरकारच्या दृष्टीने वेगळी आहे का? लोक हुशार झालेत. आम्हाला आरक्षण हवं आणि आम्ही ते घेणारच. मराठ्यांची गरज नाही अशा भावनेतून सरकार चाललंय असा आरोप जरांगे पाटील यांनी सरकावर केला. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जाती