शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

आणखी किती दिवस चर्चा करायची, अन्याय सहन करणार नाही; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 10:56 IST

तुम्ही शब्द द्यायचा आणि पाळायचा नाही हे किती दिवस चालणार? असा सवाल जरांगेंनी सरकारला विचारला.

बीड - Manoj Jarange Patil on Maratha Reservation ( Marathi News ) चर्चेतून मार्ग निघतो,पण आम्ही थांबणार नाही. तुम्ही चर्चेत गुंतवून आम्हाला पुढे पुढे ढकलत राहणार हे चालणार नाही. आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण हवं आहे. सरकारसोबत आजही चर्चा सुरू आहे. वेळ देणार नाही. तुमचे शब्द होते, तुम्ही पूर्ण केला नाही. आम्ही कधीही चर्चेला आलेल्या परत पाठवले नाही.तुमचा सन्मानच केला. तुम्ही ३० दिवस मागितले आम्ही ४० दिवस दिले. चर्चेत गुंतवून ठेवायचे आणि विषय भरकटवायचा हे होणार नाही अशा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या सभेपूर्वी दिला आहे. 

बीडमध्ये जरांगे पाटलांची निर्णयाक सभा होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी २४ डिसेंबरपर्यंत सरकारला मुदत दिली होती.परंतु आजही यावर ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आज बीडच्या सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी पत्रकारांशी जरांगेंनी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा समाजाला किती दिवस तुम्ही झुलवत ठेवणार? आमच्या संयमाचा अंत पाहिला जातोय. तुम्ही शब्द द्यायचा आणि पाळायचा नाही हे किती दिवस चालणार? सुरुवातीला ३ महिने, त्यानंतर ४० दिवस दिले तरी पुढे काय झाले? अजूनही आज आणि उद्याचा दिवस आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच आम्ही कायद्याच्या चौकटीतच आरक्षण मागतोय, आम्ही मागास सिद्ध झालोय, ५४ लाख नोंदी सापडलेत. मग हे कायद्यात बसलेत ना..किती दिवस समाजाला येड्यात काढणार आहात? मराठ्यांनी किती दिवस अन्याय सहन करायचा हे आम्ही चालू देणार नाही. आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणारच. इच्छाशक्ती असली की एका दिवसात आरक्षण मिळेल. एकाचे ऐकून तुम्ही मराठ्यांवर अन्याय करताय. पुढील काळात मराठे कसे आरक्षण घेतात हे तुम्ही पाहा. मराठ्यांनी ज्याला मोठे केले, त्याच्या डोक्यात किडे भरले आहेत. विष ओकायला लागलेत. ही किती गटारगंगा होती हे मराठ्यांना लक्षात आले. कुजकं बोलतो का? माझ्या नादी लागू नको. शहाणा हो असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना दिले आहे. 

दरम्यान, सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावे, वारंवार चर्चा केली जातेय. तेच तेच सुरू आहे. सरकारने माझ्याशी संपर्क केला, बोलणं सुरू आहे. पण किती दिवस चर्चा करणार? संयमांचा अंत किती बघणार? प्रत्येकवेळी मराठ्यांनी शब्द पाळायचा. आम्हालाही काही मर्यादा आहेत. मुख्यमंत्र्यांशी बोलणे नाही, गिरीश महाजनांचा फोन आला होता. कायद्याच्या चौकट सरकारच्या दृष्टीने वेगळी आहे का? लोक हुशार झालेत. आम्हाला आरक्षण हवं आणि आम्ही ते घेणारच. मराठ्यांची गरज नाही अशा भावनेतून सरकार चाललंय असा आरोप जरांगे पाटील यांनी सरकावर केला. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जाती