शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सरकारचं शिष्टमंडळ भेटीला; आंदोलन मागे घेणार? जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 12:45 IST

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ लोणावळ्यात दाखल झालं आहे.

Manoj Jarange Patil ( Marathi News ) :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याहून मुंबईकडे कूच करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांचा ताफा लोणावळ्यात पोहोचला आहे. कुठे पदयात्रा तर कुठे वाहनांनी प्रवास करत मनोज जरांगे पाटील सरकारला घेरण्यासाठी मुंबईकडे निघाले आहेत. हजारो आंदोलकांसह जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले तर सरकारची मोठी कोंडी होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ लोणावळ्यात दाखल झालं आहे. मात्र आधी मी समाजाशी चर्चा करणार आणि मग शिष्टमंडळाने नव्याने आणलेल्या प्रस्तावावर चर्चा करेन, अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे.

"आम्हाला आरक्षण हवं आहे आणि ते मिळाल्यावर आम्ही पुन्हा घरी जाऊ. मग ते बीडमध्ये मिळू, पुण्यात मिळू, लोणावळ्यात मिळू की वाशीला मिळू. आम्ही काय मुंबईत कायमचं राहायला चाललेलो नाहीत. आरक्षण मिळालं की आम्ही माघारी जाऊ," असं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं आहे. मात्र तपासून बघू, निर्णय घेऊ अशी भाषा शिष्टमंडळाची असेल तर ते आम्हाला मान्य होणार नाही, असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला आहे.

रात्रीच्या सभेला सकाळी सुरुवात

मनोज जरांगे पाटील यांचा चौथा मुक्काम व सभा लोणावळा शहराच्या जवळ असलेल्या वाकसई चाळ येथे बुधवारी रात्री 8.30 वाजता होणार होता. मात्र वाघोली ते लोणावळा असा प्रवास करताना मनोज जरांगे पाटील यांना तब्बल 10 तासाहून अधिक वेळ लागल्याने त्यांना मुक्काम व सभा स्थळी पोहचण्यासाठी सकाळचे 6.45 वाजले. सकाळी 6 वाजता जरांगे पाटील मावळच्या भूमीत दाखल झाले. त्यानंतर आता त्यांच्या सभेला सुरुवात झाली आहे.

मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी व त्यांचे विचार ऐकण्यासाठी रात्रभर सभास्थळी अनेक नागरिक शेकोट्या पेटवून बसले होते. याविषयी पहाटे चार वाजता त्यांच्याशी संवाद साधला असता आमच्या मुला बाळांना आरक्षणाचा हक्क मिळावा म्हणून आमचा मनोज दादा रात्रंदिवस जागा असताना आम्हाला झोप कशी येणार अशी बोलकी प्रतिक्रिया सभास्थळी असलेल्या लोकांनी दिली.         दरम्यान, सरकारच्या शिष्टमंडळाने आणलेला नवा प्रस्ताव मनोज जरांगेंना मान्य होणार का आणि ते आपलं आंदोलन मागे घेणार का, हे पाहणं औत्सक्याचं ठरणार आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणlonavalaलोणावळाState Governmentराज्य सरकार