शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्रे मिळणार; मनोज जरांगेंनाही CM शिंदेंचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 13:04 IST

पटकन आपण आरक्षणाचा निर्णय घ्या असं आपण करू शकत नाही. कारण जो निर्णय सरकार घेईल तो टिकाऊ आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा असला पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई – मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार गांभीर्य आहे. २ मार्गाने आपण मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. त्यात जुन्या कुणबी नोंदी आणि रद्द झालेल्या मूळ आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलीय. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी युद्ध पातळीवर काम करतंय. मनोज जरांगे पाटील यांनी स्वत:ची काळजी घेतली पाहिजे, वैद्यकीय उपचार घेतले पाहिजे. जरांगे पाटील यांच्या तब्येतीची सरकारला चिंता आहे. मराठा समाजासाठी त्यांनी जो लढा उभारला आहे तो सरकारने गांभीर्याने घेतला आहे असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पटकन आपण आरक्षणाचा निर्णय घ्या असं आपण करू शकत नाही. कारण जो निर्णय सरकार घेईल तो टिकाऊ आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा असला पाहिजे. त्याचे फायदे कायमस्वरुपी मराठा समाजाला मिळाले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आजच्या बैठकीत न्या. शिंदे समितीचा अहवाल उद्या कॅबिनेटमध्ये स्वीकारल्यानंतर महसूल मंत्री, संबंधित तहसिलदार, जिल्हाधिकारी असतील. ज्या जुन्या नोंदी आहेत त्यांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. दोन्ही बाजूने सरकार पुढे जातंय. त्यामुळे मराठा आंदोलनाला गालबोट लागू नये याची काळजी घेतली पाहिजे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत मराठा समाजाआडून अशाप्रकारे हिंसक घटना होतायेत त्या घडवू इच्छितात का याचा विचार मराठा समाजाने केला पाहिजे. राज्यातील जनतेला मी शांततेचे आवाहन करतो. कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे ही सरकारसोबतच नागरिकांची जबाबदारी आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाला गालबोट लागू नये यासाठी मराठा क्रांती मोर्चा, मनोज जरांगे पाटील यांनीसुद्धा घेतली पाहिजे. मी सर्वांना शांततेचे आवाहन करतो, मनोज जरांगे पाटील यांनी पाणी आणि वैद्यकीय उपचार घ्यावेत. सरकारला अवधी द्यावा. क्युरेटिव्ह पिटिशन आपण दाखल केले आहे त्यातून सुदैवाने आपल्यासाठी मार्ग खुला झाला आहे असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं.

दरम्यान, उद्या मनोज जरांगे पाटील यांचे काही प्रतिनिधी यांच्यासोबत मराठा उपसमिती आणि अधिकारी चर्चा करतील. विभागीय अधिकारी त्यांना विनंती करतील. ५८ मोर्चे गेल्यावेळी आरक्षणासाठी निघाले. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चे निघाले. कुठेही गालबोट लागले नाही. लाखोंचे मोर्चे काढूनही राज्यातील शांतता, कायदा सुव्यवस्था धोक्यात आली नाही. परंतु दुर्दैवाने आज काही ठिकाणी जाळपोळ सुरू आहे. मराठा समाजाने सजग होऊन याकडे पाहिले पाहिजे. टोकाचे पाऊल उचलू नका असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावनिक आवाहन केले आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण