शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्रे मिळणार; मनोज जरांगेंनाही CM शिंदेंचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 13:04 IST

पटकन आपण आरक्षणाचा निर्णय घ्या असं आपण करू शकत नाही. कारण जो निर्णय सरकार घेईल तो टिकाऊ आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा असला पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई – मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार गांभीर्य आहे. २ मार्गाने आपण मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. त्यात जुन्या कुणबी नोंदी आणि रद्द झालेल्या मूळ आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलीय. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी युद्ध पातळीवर काम करतंय. मनोज जरांगे पाटील यांनी स्वत:ची काळजी घेतली पाहिजे, वैद्यकीय उपचार घेतले पाहिजे. जरांगे पाटील यांच्या तब्येतीची सरकारला चिंता आहे. मराठा समाजासाठी त्यांनी जो लढा उभारला आहे तो सरकारने गांभीर्याने घेतला आहे असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पटकन आपण आरक्षणाचा निर्णय घ्या असं आपण करू शकत नाही. कारण जो निर्णय सरकार घेईल तो टिकाऊ आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा असला पाहिजे. त्याचे फायदे कायमस्वरुपी मराठा समाजाला मिळाले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आजच्या बैठकीत न्या. शिंदे समितीचा अहवाल उद्या कॅबिनेटमध्ये स्वीकारल्यानंतर महसूल मंत्री, संबंधित तहसिलदार, जिल्हाधिकारी असतील. ज्या जुन्या नोंदी आहेत त्यांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. दोन्ही बाजूने सरकार पुढे जातंय. त्यामुळे मराठा आंदोलनाला गालबोट लागू नये याची काळजी घेतली पाहिजे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत मराठा समाजाआडून अशाप्रकारे हिंसक घटना होतायेत त्या घडवू इच्छितात का याचा विचार मराठा समाजाने केला पाहिजे. राज्यातील जनतेला मी शांततेचे आवाहन करतो. कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे ही सरकारसोबतच नागरिकांची जबाबदारी आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाला गालबोट लागू नये यासाठी मराठा क्रांती मोर्चा, मनोज जरांगे पाटील यांनीसुद्धा घेतली पाहिजे. मी सर्वांना शांततेचे आवाहन करतो, मनोज जरांगे पाटील यांनी पाणी आणि वैद्यकीय उपचार घ्यावेत. सरकारला अवधी द्यावा. क्युरेटिव्ह पिटिशन आपण दाखल केले आहे त्यातून सुदैवाने आपल्यासाठी मार्ग खुला झाला आहे असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं.

दरम्यान, उद्या मनोज जरांगे पाटील यांचे काही प्रतिनिधी यांच्यासोबत मराठा उपसमिती आणि अधिकारी चर्चा करतील. विभागीय अधिकारी त्यांना विनंती करतील. ५८ मोर्चे गेल्यावेळी आरक्षणासाठी निघाले. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चे निघाले. कुठेही गालबोट लागले नाही. लाखोंचे मोर्चे काढूनही राज्यातील शांतता, कायदा सुव्यवस्था धोक्यात आली नाही. परंतु दुर्दैवाने आज काही ठिकाणी जाळपोळ सुरू आहे. मराठा समाजाने सजग होऊन याकडे पाहिले पाहिजे. टोकाचे पाऊल उचलू नका असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावनिक आवाहन केले आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण