शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Maratha Reservation: आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 06:13 IST

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल येताच, विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून महिनाभरात सर्व वैधानिक प्रक्रिया पार पाडली जाईल, तसेच आंदोलकांवरील साधे गुन्हे मागे घेतले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले.

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल येताच, विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून महिनाभरात सर्व वैधानिक प्रक्रिया पार पाडली जाईल, तसेच आंदोलकांवरील साधे गुन्हे मागे घेतले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले.सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या काही संघटनांसोबत चर्चा केली. या वेळी खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे, विविध संघटनांचे समन्वयक उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून, मराठा समाजाच्या भावना आणि सूचनांची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. मागासवर्गीय आयोगाने लवकरात लवकर आपला अहवाल द्यावा, अशी विनंती राज्य सरकारने केली आहे. आयोग स्वायत्त असल्याने त्याला आदेश देता येत नाहीत. परंतु, उच्च न्यायालयानेही आयोगाला अहवालाबाबतचे वेळापत्रक स्पष्ट करण्यास सांगितले आहे. त्यानुसार अहवाल मिळताच आरक्षणाबाबतच्या सर्व वैधानिक बाबी तपासून त्याबाबत विशेष अधिवेशनात आरक्षणावर निर्णय घेतला जाईल.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या सर्व आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र, पोलिसांना मारहाण, त्यांच्यावर हल्ला अथवा एसटी बस आदींची जाळपोळ अशा घटनांतील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत. पोलिसांबाबत तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मेगाभरतीदरम्यान मराठा समाजातील तरूणांवर कदापि अन्याय होऊ देणार नाही. सर्व बाबींची पडताळणी करूनच भरती प्रक्रिया राबविली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.फूट पाडण्याचा हेतू नाहीमुख्यमंत्री म्हणाले की, अनेक लोक मराठा आंदोलन चालवित आहेत. हे सर्व समाजाच्या हितासाठी काम करत आहेत. हा प्रश्न सरकारलाही सोडवायचा आहे. फूट पाडणे, कोणाचा मान कमी करायचा- कुणाचा वाढवायचा, असल्या बाबींत सरकारला रस नाही. ज्यांना चर्चा हवी आहे, त्यांच्याशी आम्ही बोलत आहोत. सरकारला समन्वयातून प्रश्न सोडवायचा असल्याचे ते म्हणाले.आमदारांनी राजीनामे मागे घ्यावेतआरक्षणाचा निर्णय विधिमंडळात होणार आहे. अशा वेळी मराठा आरक्षणाच्या बाजूने मतदान करून आमदार मराठा समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू शकतील. राजीनामा देऊन ते मतदान करू शकणार नाहीत. त्यामुळे भावनेच्या भरात राजीनामा देत आमदारांनी ही संधी गमावू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस