शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शरद पवारांच्या नादी लागले अन्...; भाजपा आ.अमित साटम यांचा मनोज जरांगेंना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 12:06 IST

सगेसोयरे पुढे आणायचे आणि त्यांनाच राजकारणात मोठे करायचे असाच शरद पवारांचा नेहमी सुप्त अध्यादेश राहिलेला आहे अशी टीकाही साटम यांनी केली. 

मुंबई - शरद पवारांकडून मनोज जरांगे पाटील यांचा राजकीय गेम होत असून कपटी शक्तींच्या संमोहनातून जरांगेंनी बाहेर पडावे असा सल्ला भाजपा आमदार अमित साटम यांनी देत शरद पवारांवर निशाणा साधला. 

भाजपा आमदार अमित साटम म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेत उपोषणाला बसले तेव्हा एक सामान्य मराठा म्हणून मला खूप अभिमान वाटला. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाचे पालन करत होतात. शिवाजी महाराज ज्यावेळी युद्धावर जायचे तेव्हा कुठलीही सामान्य जनता त्यात भरडली जाता कामा नये असे त्यांचे आदेश असायचे. परंतु आता आपण शरद पवारांच्या नादी लागलात आणि भरकटत जात आहात असं त्यांनी म्हटलं. 

तसेच आपल्या आंदोलनाला जो इतर समाजाचा पाठिंबा मिळत होता मात्र आता आपल्या बोलण्या आणि वागण्यानं त्यापासून दूरावत जात आहात असं वाटतं. अजूनही वेळ गेली नाही. कपटी शक्तींच्या संमोहनातून आपण बाहेर पडावं अशी मी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो. आपल्यात गरीब मराठा समाजाला न्याय देण्याची कुवत आहे. सगेसोयरे पुढे आणायचे आणि त्यांनाच राजकारणात मोठे करायचे असाच शरद पवारांचा नेहमी सुप्त अध्यादेश राहिलेला आहे अशी टीकाही साटम यांनी केली. 

दरम्यान,  शरद पवारांनी गरीब मराठा कुटुंबातून येणारा एकतरी मराठा मोठा केला असेल तर तो दाखवावा. मराठा समाजाला न्याय आणि दिशा दाखवण्याची कुवत आहे हे ते जाणतात म्हणून कदाचित तुमचा राजकीय गेम होत आहे असं सांगत अमित साटम यांनी मनोज जरांगे पाटील यांना सल्ला दिला. 

जरांगे पाटील-प्रसाद लाड यांच्यात जुंपली

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोष व्यक्त करत आहेत. मात्र फडणवीस यांचा बचाव करण्यासाठी पुढे आलेल्या प्रसाद लाड यांच्यावर जरांगेंनी तोफ डागली. "तू किती पैसेवाला आहेस आणि तू किती भ्रष्टाचारी आहेस. माझ्या नादी लागू नको. मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तुझं घर मोठं करणारी औलाद आहे तू. माझ्या नादी लागू नको. मी तुझं केव्हा नाव घेतलं का?  आमच्यामध्ये ढवळाढवळ करू नको. कारण आमच्या लेकरांचं वाटोळं झालंय," अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यावर मराठा समाजासाठी मी कितीही शिविगाळ ऐकायला तयार आहे. पण, मराठा समाजासाठी ६० वर्षांत कुणी काय केले आणि कुणी काय केले नाही, यावर एकदा खुली चर्चा होऊन जाऊ द्या असे प्रसाद लाड यांनी म्हटलं.

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणAmit Satamअमित साटमSharad Pawarशरद पवार