शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

आरक्षण लढ्यातील हुतात्मांच्या कुटुंबातील सदस्याला नोकरी द्या : मराठा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 15:56 IST

मराठा आरक्षणासाठी हुतत्मा झालेल्या मराठा बांधवाच्या कुटुंबातील एकाला नोकरी, 10 लाख रुपये आर्थिक मदत, अरबी समुद्रातील बहुचर्चित शिवस्मारकाच्या उभारणीसाठी प्रयत्न करावे, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.  

मुंबई - मराठा क्रांती ठोक मोर्चाने पुन्हा एकदा  आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाच्या वतीने 58 शिस्तबद्ध मुकमोर्चे काढले होते. आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना 42 मराठा बांधवांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. या हुतात्मांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीत सामावून घ्या, यासह इतर मागण्यांसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे.

मराठा आरक्षणासाठी हुतत्मा झालेल्या मराठा बांधवाच्या कुटुंबातील एकाला नोकरी, 10 लाख रुपये आर्थिक मदत, अरबी समुद्रातील बहुचर्चित शिवस्मारकाच्या उभारणीसाठी प्रयत्न करावे, अशी मागणी औरंगाबाद येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.  

दरम्यान राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोल्हापूर आणि सातारा येथील गादीला मान आहे. मात्र राजकीय फायद्यासाठी अनेक पक्षाचे वरिष्ठ नेते महाराजांच्या वंशजाना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखत असून हे थांबविण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून कऱण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला बजेट देण्यात यावे आणि जाचक अटी कमी कराव्या. तसेच सारथी संस्थेचे कार्यालय पुण्यात आहे. मात्र याची खरी गरज दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी आहे. त्यामुळे सारथीचे सेंटर औरंगाबादमध्ये द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या अन्यथा, 9 ऑगस्ट रोजी मराठा बांधव मुंबईत आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.