शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विधेयकाला मंजुरी मिळेपर्यंत मराठ्यांचा ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 20:31 IST

संवाद यात्रेची आझाद मैदानात धडक; राज्यभर धरपकड

मुंबई : मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणाऱ्या विधेयकाला मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मूक मोर्चाने दिला आहे. आरक्षणासाठी विविध मागण्यांसाठी मराठा समाजाने राज्यात सुरू केलेल्या संवाद यात्रेचा समारोप सोमवारी आझाद मैदानात झाला. दरम्यान, मोठ्या संख्येने येणाºया मराठा कार्यकर्त्यांची राज्यभर धरपकड केल्याने आझाद मैदानात जमलेल्या कार्यकर्ते व समन्वयकांनी शासनाप्रती तीव्र नाराजी व्यक्त केली.

समन्वयक विरेंद्र पवार म्हणाले की, १६ नोव्हेंबरला संवाद यात्रेची सुरूवात झाली होती. शिस्तबद्धपणे सुरू असलेल्या यात्रेचा समारोप आझाद मैदानात होणार होता. तरीही सरकारने कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, पुणे अशा विविध जिल्ह्यांत कार्यकर्त्यांची अडवणूक केली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. मात्र मराठा समाजाने पुन्हा एकदा शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आपल्या मागण्या रेटून धरल्या आहेत. संवाद यात्रेचे रुपांतर आझाद मैदानात ठिय्या आंदोलनात झाले आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार ३० नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा.

मराठा आरक्षण मिळाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा जल्लोष करणार नसल्याचे राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले. कोंढरे म्हणाले की, न्यायालयात टिकेल असे आरक्षण सरकारने द्यावे. आरक्षणासाठी ४०हून अधिक कार्यकर्त्यांनी जीवाचे बलिदान दिले आहे. त्यामुळे आरक्षणानंतर कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करता आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा