शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

विधेयकाला मंजुरी मिळेपर्यंत मराठ्यांचा ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 20:31 IST

संवाद यात्रेची आझाद मैदानात धडक; राज्यभर धरपकड

मुंबई : मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणाऱ्या विधेयकाला मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मूक मोर्चाने दिला आहे. आरक्षणासाठी विविध मागण्यांसाठी मराठा समाजाने राज्यात सुरू केलेल्या संवाद यात्रेचा समारोप सोमवारी आझाद मैदानात झाला. दरम्यान, मोठ्या संख्येने येणाºया मराठा कार्यकर्त्यांची राज्यभर धरपकड केल्याने आझाद मैदानात जमलेल्या कार्यकर्ते व समन्वयकांनी शासनाप्रती तीव्र नाराजी व्यक्त केली.

समन्वयक विरेंद्र पवार म्हणाले की, १६ नोव्हेंबरला संवाद यात्रेची सुरूवात झाली होती. शिस्तबद्धपणे सुरू असलेल्या यात्रेचा समारोप आझाद मैदानात होणार होता. तरीही सरकारने कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, पुणे अशा विविध जिल्ह्यांत कार्यकर्त्यांची अडवणूक केली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. मात्र मराठा समाजाने पुन्हा एकदा शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आपल्या मागण्या रेटून धरल्या आहेत. संवाद यात्रेचे रुपांतर आझाद मैदानात ठिय्या आंदोलनात झाले आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार ३० नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा.

मराठा आरक्षण मिळाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा जल्लोष करणार नसल्याचे राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले. कोंढरे म्हणाले की, न्यायालयात टिकेल असे आरक्षण सरकारने द्यावे. आरक्षणासाठी ४०हून अधिक कार्यकर्त्यांनी जीवाचे बलिदान दिले आहे. त्यामुळे आरक्षणानंतर कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करता आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा