शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

विधेयकाला मंजुरी मिळेपर्यंत मराठ्यांचा ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 20:31 IST

संवाद यात्रेची आझाद मैदानात धडक; राज्यभर धरपकड

मुंबई : मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणाऱ्या विधेयकाला मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मूक मोर्चाने दिला आहे. आरक्षणासाठी विविध मागण्यांसाठी मराठा समाजाने राज्यात सुरू केलेल्या संवाद यात्रेचा समारोप सोमवारी आझाद मैदानात झाला. दरम्यान, मोठ्या संख्येने येणाºया मराठा कार्यकर्त्यांची राज्यभर धरपकड केल्याने आझाद मैदानात जमलेल्या कार्यकर्ते व समन्वयकांनी शासनाप्रती तीव्र नाराजी व्यक्त केली.

समन्वयक विरेंद्र पवार म्हणाले की, १६ नोव्हेंबरला संवाद यात्रेची सुरूवात झाली होती. शिस्तबद्धपणे सुरू असलेल्या यात्रेचा समारोप आझाद मैदानात होणार होता. तरीही सरकारने कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, पुणे अशा विविध जिल्ह्यांत कार्यकर्त्यांची अडवणूक केली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. मात्र मराठा समाजाने पुन्हा एकदा शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आपल्या मागण्या रेटून धरल्या आहेत. संवाद यात्रेचे रुपांतर आझाद मैदानात ठिय्या आंदोलनात झाले आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार ३० नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा.

मराठा आरक्षण मिळाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा जल्लोष करणार नसल्याचे राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले. कोंढरे म्हणाले की, न्यायालयात टिकेल असे आरक्षण सरकारने द्यावे. आरक्षणासाठी ४०हून अधिक कार्यकर्त्यांनी जीवाचे बलिदान दिले आहे. त्यामुळे आरक्षणानंतर कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करता आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा