शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Maratha Kranti Morcha : म्हणून मराठ्यांना आरक्षण मिळणे गरजेचे

By बाळकृष्ण परब | Updated: July 26, 2018 14:30 IST

मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटून त्याचे हिंसक पडसाद राज्याच्या कानाकोपऱ्यात उमटू लागले आहेत. त्यावरून राज्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटून त्याचे हिंसक पडसाद राज्याच्या कानाकोपऱ्यात उमटू लागले आहेत. त्यावरून राज्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठ्यांना आरक्षणाची कशी गरज आहे इथपासून ते इवढी वर्षे राज्यापासून गावपातळीपर्यंत सत्ता उपभोगणाऱ्या या समाजाला आरक्षणाची काय गरज? इथपर्यंतची मतमतांतरे व्यक्त होत आहेत. मराठा समाजाबाबत वर्षांनुवर्षांपासून असलेल्या समज गैरसमजांचा त्यात मोठा वाटा आहे.मराठा समाज म्हणजे सत्ताधारी, शिवकाळापासून महाराष्ट्राच्या रहाटगाडग्याची सूत्रे आपल्या हाती ठेवणारा, स्वातंत्र्यौत्तर काळात राज्यस्तरापासून गावपातळीपर्यंत नेतृत्व करणारा, हाती जमीनजुमला असलेला वर्ग या म्हणण्यात बहुतांशी तथ्थ आहे, नाही असे नाही. पण ते पूर्ण सत्य नाही. मराठा ही महाराष्ट्रात सत्ताधारी जात असली तरी प्रत्येक मराठा कुटुंबाला सत्तेतून मिळणारे लाभ मिळालेले नाहीत. लाखो मराठा कुटुंबे राजकारणापासून दूर आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे जमिनीचा. मराठा समाज हा प्रामुख्याने शेतकरी. पण आजही जमीनदार म्हणावी अशी मराठा कुटुंबे मोजकीच आहेत. गावठी दोन चार एवढ्या प्रमाणात. बाकीचा बहुतांश मराठा समाज हा मध्यम आणि अल्पभूधारक आहे. असे असले तरी आपल्या "मराठा" असण्याच्या भावनेतून या वर्गाने भूतकाळात कुठल्याही शासकीय सोईसुविधांची मागणी केलेली नव्हती. वडिलोपार्जित शेती करावी आणि उदरनिर्वाह चालवावा हा या समाजाचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला शिरस्ता. पण कालौघात वाढलेली लोकसंख्या, त्यातून जमीनीचे झालेले तुकडीकरण, लहरी हवामानामुळे आलेली अनिश्चितता आणि जागतिकीकरणानंतर शेतीची जागतिक बाजारपेठेत झालेली फरफट यामुळे मराठा समाजातील बहुतांश कुटुंबांच्या एकंदरीत सामाजिक स्थितीला हादरे बसले. हाती फार पैसा नसल्याने उच्च शिक्षण घेणे कठीण होऊन बसले.एकीकडे आपली अशी अवस्था असताना इतर समाज आरक्षणाच्या माध्यमातून विविध लाभ घेताहेत. त्यांना शैक्षणिक सुविधा आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळतेय. जे शिक्षण घेण्यासाठी आपल्याला भरमसाठ फी द्यावी लागते, तेच शिक्षण इतरांना अत्यल्प खर्चात मिळते, हे पाहून मराठा समाजात अन्यायाची भावना तीव्र झाली. तसेच मराठे आणि इतर अशी दरी निर्माण झाली. एखाद्या मराठा तरुणाला विचारले असता तो याबाबत पोटतिडकीने बोलतो. पण मराठे म्हणजे घरंदाज, पुढारलेले अशीच प्रतिमा आपल्याकडे उभी राहिलेली असल्याने मराठा समाजाला दिलासा मिळेल अशी पावले वेळीच उचलली गेली नाहीत. अगदी राज्यातील सत्तासूत्रे मराठ्यांच्या हाती असतानाही आपल्या जातीबांधवांसाठी काहीतरी करावे, असे त्यांना वाटले नाही. कदाचित खाजगी शिक्षण संंस्थांचे जाळे विणण्यात व्यस्त असल्याने त्यांना वेळ मिळाला नसावा. पण या सर्वांमुळे लाखो मराठा विद्यार्थी गुणवत्ता असूनही आर्थिक पाठबळ नसल्याने उच्च शिक्षणापासून वंचित राहिले. त्यांची शैक्षणिक पिछेहाट होत गेली. शेती करावी तर उत्पन्नाची हमी नाही आणि नोकरी करावी तर दर्जेदार शिक्षण नाही आणि ज्यांच्याकडे शिक्षण आहे त्यांना पात्रतेनुसार नोकऱ्या नाहीत. यामुळे अनेक मराठा तरुणांचा कोंडमारा झाला. त्यातून असंतोष वाढला. अखेर याच असंतोषाची परिणती मूक मोर्चात झाली. आरक्षण मिळाल्यास आपल्या किमान काही तरी समस्या सुटतील, अशी मराठा समाजाची भावना आहे. पण आज आरक्षणाचं घोंगडं भिजत पडलंय. कोर्टकचेऱ्या चालू आहेत. त्याला प्रत्युत्तरादाखल मूक मोर्चाचा ठोक मोर्चा झालाय. हिंसाचार, जाळपोळ झाली. स्पष्टच सांगायचं तर हे चुकीचं आहे. त्यातून आरक्षण मिळण्याची आणि मिळालं तर ते टिकण्याची अजिबात शक्यता नाही. पण मराठा समाजातील एक मोठा वर्ग खरोखरच बिकट अवस्थेत आहे. त्याला सावरणे गरजेचे आहे. त्यासाठी सद्यस्थितीत मराठा समाजाला आरक्षण देणे हा तातडीचा उपाय आहे. मग ते आरक्षण जातीय निकषांवर मिळो वा आर्थिक निकषांवर!!!

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठाreservationआरक्षण