शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

राज्यात मराठा-धनगर समाज एकत्र; भविष्यात सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 17:42 IST

सामान्य धनगर बांधवांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. माझी सर्व धनगर समाजाला विनंती आहे मतभेद विसरून एकत्र या असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केले.

अहमदनगर – जालना येथील पोलीस लाठीचार्जनंतर मराठा आंदोलन पेटलं होतं. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यात धनगर समाजानेही त्यांच्या मागणीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी चौंडी येथं मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला उपस्थित राहून मनोज जरांगे पाटील यांनी धनगर समाजाच्या मागणीला पाठिंबा दिला. त्यामुळे भविष्यात मराठा-धनगर समाज एकत्र आल्यानं राज्य सरकारसमोर मोठं संकटं उभं राहण्याची शक्यता आहे.

चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं दर्शन घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, हा लढा सामान्य धनगर आणि सामान्य मराठा बांधवांचा आहे. धनगर समाजाने मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे आमचेही कर्तव्य आहे. सामान्य मराठा घराघरातून रस्त्यावर उतरला तसाच धनगर बांधवानेही स्वत:चे मतभेद सोडून, राजकारण सोडत लेकरांसाठी एकत्र यावेत. भविष्यात दोन्ही समाज शंभर टक्के एकत्र येतील. जर समाज एकटवटला नाही तर मराठा असो धनगर कुणालाही न्याय मिळणे कठीण आहे असं त्यांनी म्हटलं.

तसेच सामान्य धनगर बांधवांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. माझी सर्व धनगर समाजाला विनंती आहे मतभेद विसरून एकत्र या. फक्त मतभेद सोडावेच लागतील. मी राजकीय व्यासपीठावर जात नाही. हे सामाजिक व्यासपीठ आहे. सरकारने प्रत्येकाला वेळ द्यायचा आणि वेळ मारून घ्यायचे हे धोरण स्वीकारले. आता आम्हाला एकत्र विचार करण्याची गरज आहे. हा वर्षानुवर्षाचा लढा आहे. भविष्यात काय होईल याचा विचार सरकारने करणे गरजेचं आहे असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

दरम्यान, जर या दोन जाती एकत्र झाल्या तर सरकारला २ तासही आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. आमच्या दोन्ही समाजाचे दु:ख सारखे आहे. भविष्यात काहीही होऊ शकते. एकत्र येऊ शकतो, एकत्रित लढाई करू शकतो. आमच्या लेकरांसाठी लढू शकतो. आमचा कुणीही मालक नाही. धनगर बांधवांनी घराघरातून बाहेर पडून एकत्र आले पाहिजे असंही मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केले.

शिवशाही-होळकरशाही एकत्र येऊ

मराठा समाजाचा संघर्षयोद्धा धनगर समाजाच्या संघर्षात साथ द्यायला आला आहे. आम्ही धनगर बांधवांच्या वतीने त्यांचे स्वागत करू. धनगर आरक्षणाची चळवळ हातात हात घालून पुढे लढाई. या देशात ज्या क्रांती झाली. जिथे यश मिळाले, तिथे होळकरशाही आणि शिवशाही एकत्र येऊन यश मिळाली, आरक्षणाविरोधातील हुकुमशाही मोडून काढण्यासाठी आम्ही एकत्र आलोय असं धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील