शहरं
Join us  
Trending Stories
1
BIhar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
5
शेकडो वर्षे जुने जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक तथ्ये...
6
"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया
7
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये मीठ का घालतंय? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स
8
या भारतीय क्रिकेटरनं घेतली निवृत्ती; रैना-कोहलीच्या कॅप्टन्सीत पदार्पणात रचला होता इतिहास
9
KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लग्जरी इलेक्ट्रिक कार देती ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत
10
Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!
11
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
12
युट्यूब शॉर्ट्स की इन्स्टाग्राम रील्स, कुठे होते सर्वाधिक कमाई? जाणून घ्या नेमकं गणित...
13
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
14
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
15
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
16
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
17
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
18
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
19
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
20
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!

बार्शीत मराठा समाज करणार मनोज जरांगेंविरोधात आंदोलन; नेमकं काय कारण? आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 11:22 IST

कळत-नकळत जरांगे यांच्या आंदोलनातून महाविकास आघाडीला फायदा पोहचवण्याचं काम होतंय, जे ३१ खासदार निवडून आले त्यांच्यावर एकही शब्द जरांगे बोलत नाहीत असा आरोप बार्शीतील मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी केला आहे.

सोलापूर - मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सातत्याने उपोषण आंदोलन करून मनोज जरांगे पाटील राज्यभरात चर्चेत आले. त्यांच्या आंदोलनामुळे राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठ्यांना १० टक्के स्वतंत्र आरक्षण मंजूर केले. मात्र ओबीसीतूनच आरक्षण हवं ही मागणी जरांगेंनी कायम ठेवली.  मात्र आता सोलापूरातील बार्शी इथं मराठा समाजाकडूनच मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

मराठा समाजाचे स्थानिक नेते अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वात जरांगे पाटलांविरोधात १ दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. मनोज जरांगे यांना विचारलेल्या १० प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने शिंदे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. अण्णासाहेब शिंदे म्हणाले की, तुम्ही आमचे नेते आहात, आम्ही तुम्हाला काही शंका विचारली त्यावर तुम्ही राजेंद्र राऊत, देवेंद्र फडणवीसांवर बोलले परंतु आम्ही काय विचारतोय त्यावर उत्तर दिले नाही. तुम्हाला समाजाने काही शंका विचारायची नाही का?, समाजाने तुम्हाला काय प्रश्न विचारायचे नाहीत का? समाजातून काही प्रश्न आले, ते आम्ही विचारल्यावर तुम्ही उत्तर न देता त्यात राजकारण का घातलं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच मी विचारलेल्या प्रश्नावर माझ्या शंकेचे निरसन तुम्ही करायला हवे होते. मला समाजाचं काम करायचंय, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मराठा म्हणून जरांगेंना भेटायला गेले. त्यात काही गावचे सरपंच, पंचायत समितीचे माजी सदस्य, अनेक महिलांचे पैसे खाणारे, मनोज जरांगेंच्या नावाखाली पैसे घेतले असे लोक गेले होते. मात्र यांचा समाजाशी काही संबंध नाही. मूळ मुद्दा विषय जरांगेंनी बाजूला केले. आम्ही १० शंका विचारल्या त्यावर तुम्ही उत्तर द्यायला हवं होतं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही महायुतीला मतदान केले नाही, महाविकास आघाडीला मते दिली. मग ३१ खासदार ज्या पक्षाचे निवडून गेलेत तुम्ही त्यांच्यावर एक शब्दही का बोलत नाही? तुम्ही तुमचा पक्ष काढा मरेपर्यंत आम्ही तुमच्यासोबत राहू असं अण्णासाहेब शिंदे यांनी म्हटलं.

दरम्यान, बार्शीत येऊन उत्तरे द्या असं मी जरांगेंना म्हटलं का? तुम्हाला मराठाविरुद्ध मराठा दंगली घडवायच्या आहेत का? तुम्ही बार्शीत येताय, बार्शी तालुक्यात तुम्हाला मराठा समाजाचा आमदार ठेवायचा नाही का? उद्योगधंदे करणाऱ्या पोरांच्या हातात तुम्ही कटोरा देणार का? या पोरांची जबाबदारी जरांगेंनी घ्यावी मग बार्शीत यावे. १९९४ साली शरद पवारांनी मराठ्यांचे किती वाटोळे केले हे तुम्हाला माहिती आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तरीपण तुम्ही त्यांना फायदा पोहचवताय. कळत-नकळत आपला महाविकास आघाडीला फायदा होतोय. तुमच्या धोंगडी बैठकीमुळे जातीजातीत तेढ निर्माण व्हायला लागला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे काही तरूण दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतायेत. जरांगेविरोधात कुणी बोललं तर सर्व स्तरावर त्याला दडपण्याचा प्रयत्न केला जातो असंही अण्णासाहेब शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलOBCअन्य मागासवर्गीय जाती