शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

बार्शीत मराठा समाज करणार मनोज जरांगेंविरोधात आंदोलन; नेमकं काय कारण? आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 11:22 IST

कळत-नकळत जरांगे यांच्या आंदोलनातून महाविकास आघाडीला फायदा पोहचवण्याचं काम होतंय, जे ३१ खासदार निवडून आले त्यांच्यावर एकही शब्द जरांगे बोलत नाहीत असा आरोप बार्शीतील मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी केला आहे.

सोलापूर - मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सातत्याने उपोषण आंदोलन करून मनोज जरांगे पाटील राज्यभरात चर्चेत आले. त्यांच्या आंदोलनामुळे राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठ्यांना १० टक्के स्वतंत्र आरक्षण मंजूर केले. मात्र ओबीसीतूनच आरक्षण हवं ही मागणी जरांगेंनी कायम ठेवली.  मात्र आता सोलापूरातील बार्शी इथं मराठा समाजाकडूनच मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

मराठा समाजाचे स्थानिक नेते अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वात जरांगे पाटलांविरोधात १ दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. मनोज जरांगे यांना विचारलेल्या १० प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने शिंदे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. अण्णासाहेब शिंदे म्हणाले की, तुम्ही आमचे नेते आहात, आम्ही तुम्हाला काही शंका विचारली त्यावर तुम्ही राजेंद्र राऊत, देवेंद्र फडणवीसांवर बोलले परंतु आम्ही काय विचारतोय त्यावर उत्तर दिले नाही. तुम्हाला समाजाने काही शंका विचारायची नाही का?, समाजाने तुम्हाला काय प्रश्न विचारायचे नाहीत का? समाजातून काही प्रश्न आले, ते आम्ही विचारल्यावर तुम्ही उत्तर न देता त्यात राजकारण का घातलं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच मी विचारलेल्या प्रश्नावर माझ्या शंकेचे निरसन तुम्ही करायला हवे होते. मला समाजाचं काम करायचंय, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मराठा म्हणून जरांगेंना भेटायला गेले. त्यात काही गावचे सरपंच, पंचायत समितीचे माजी सदस्य, अनेक महिलांचे पैसे खाणारे, मनोज जरांगेंच्या नावाखाली पैसे घेतले असे लोक गेले होते. मात्र यांचा समाजाशी काही संबंध नाही. मूळ मुद्दा विषय जरांगेंनी बाजूला केले. आम्ही १० शंका विचारल्या त्यावर तुम्ही उत्तर द्यायला हवं होतं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही महायुतीला मतदान केले नाही, महाविकास आघाडीला मते दिली. मग ३१ खासदार ज्या पक्षाचे निवडून गेलेत तुम्ही त्यांच्यावर एक शब्दही का बोलत नाही? तुम्ही तुमचा पक्ष काढा मरेपर्यंत आम्ही तुमच्यासोबत राहू असं अण्णासाहेब शिंदे यांनी म्हटलं.

दरम्यान, बार्शीत येऊन उत्तरे द्या असं मी जरांगेंना म्हटलं का? तुम्हाला मराठाविरुद्ध मराठा दंगली घडवायच्या आहेत का? तुम्ही बार्शीत येताय, बार्शी तालुक्यात तुम्हाला मराठा समाजाचा आमदार ठेवायचा नाही का? उद्योगधंदे करणाऱ्या पोरांच्या हातात तुम्ही कटोरा देणार का? या पोरांची जबाबदारी जरांगेंनी घ्यावी मग बार्शीत यावे. १९९४ साली शरद पवारांनी मराठ्यांचे किती वाटोळे केले हे तुम्हाला माहिती आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तरीपण तुम्ही त्यांना फायदा पोहचवताय. कळत-नकळत आपला महाविकास आघाडीला फायदा होतोय. तुमच्या धोंगडी बैठकीमुळे जातीजातीत तेढ निर्माण व्हायला लागला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे काही तरूण दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतायेत. जरांगेविरोधात कुणी बोललं तर सर्व स्तरावर त्याला दडपण्याचा प्रयत्न केला जातो असंही अण्णासाहेब शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलOBCअन्य मागासवर्गीय जाती