शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

पोलिस भरतीत मराठा उमेदवारांना ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षणाचा लाभ नाहीच!, अपर पोलिस महासंचालकांचे पत्र 

By उद्धव गोडसे | Updated: July 18, 2024 15:44 IST

कोल्हापुरात २३ उमेदवार

कोल्हापूर : पोलिस भरतीसाठी ईडब्ल्यूएस (आर्थिक दुर्बल घटक) प्रवर्गातून अर्ज भरलेल्या उमेदवारांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. त्याऐवजी एसईबीसी (सामाजिक व शैक्षणिक इतर मागास प्रवर्ग), ओबीसी (इतर मागास प्रवर्ग) आणि खुल्या प्रवर्गाची निवड करावी लागणार आहे. याबाबतचे परिपत्रक प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी मंगळवारी (दि. १६) जारी केले. त्यामुळे पोलिस भरतीचा निकाल लांबणार असून, मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील १७ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, अनेक मराठा उमेदवारांनी ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रक्रियेत सहभाग घेतला. काही जिल्ह्यांत मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षाही झाली. आरक्षित जागांनुसार अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वीच अपर पोलिस महासंचालकांनी ईडब्ल्यूएस आरक्षणाबद्दल महत्त्वाचे परिपत्रक काढले आहे.

ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज भरलेल्या उमेदवारांना या प्रवर्गाऐवजी एसईबीसी, ओबीसी किंवा खुल्या प्रवर्गाचा पर्याय द्यावा. त्यानंतरच अंतिम निकाल जाहीर करण्याचे निर्देश सर्व पोलिस अधीक्षक कार्यालये आणि पोलिस आयुक्तालयांना दिले आहेत. निवड होणाऱ्या उमेदवारांना एसईबीसी किंवा ओबीसी प्रवर्गाचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत मिळणार आहे.

कोल्हापुरात २३ उमेदवारकोल्हापुरात पोलिस शिपाई पदाच्या १५४ जागांसाठी झालेल्या प्रक्रियेत ईडब्ल्यूएस प्रवर्गातून २३ उमेदवार आहेत. या सर्व उमेदवारांना बोलवून घेऊन ईडब्ल्यूएसऐवजी अन्य प्रवर्गांचा पर्याय दिला जाणार आहे. तसेच उमेदवारांकडून हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणPoliceपोलिस