शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

अकरावी प्रवेशात तांत्रिक विघ्नेच फार; मुंबईत २००, तर राज्यात १३ हजार तक्रारी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 08:57 IST

या सर्व तक्रारी १०० टक्के सोडवल्या जातील, असे शिक्षण विभागाचे सहसंचालक श्रीराम पानझडे यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: इयत्ता अकरावीच्या कॉलेज प्रवेशासाठी सरकारने प्रत्येक विभागामध्ये विद्यार्थ्यांसाठी मदत कक्ष सुरू केले आहेत. मात्र, या कक्षांना मर्यादित अधिकार असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्यांचे पुणे कार्यालयाकडून निराकरण होईपर्यंत वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप होत आहे. दरम्यान, आतापर्यंत मुंबईत २००, तर राज्यभरात १३ हजार तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. या सर्व तक्रारी १०० टक्के सोडवल्या जातील, असे शिक्षण विभागाचे सहसंचालक श्रीराम पानझडे यांनी सांगितले.

अकरावी प्रवेश  प्रक्रियेत शनिवारी सायंकाळपर्यंत नऊ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी राज्यभरात नोंदणी केली. सुरुवातीचे एक-दोन दिवस ठीक गेले. नंतर मात्र संकेतस्थळ हँग होण्याचे प्रकार  वारंवार घडू लागले. तसेच २७ व २८  मे या दोन दिवसांत विद्यार्थ्यांनी शुल्क भरल्यानंतर त्यांना त्याबाबतचा संदेश येईनासा झाला.  लॉगिन आयडी, पासवर्ड विसरणे, डमी विद्यार्थ्याने अर्ज करणे किंवा अर्ज भरतानाच डबल स्पेस दिली जाणे, अशा तांत्रिक कारणामुळे विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात अडथळे निर्माण झाले.

‘रिपीटर’कडून फ्रेश म्हणून अर्ज

मुंबईमध्ये २६ मेपासून पाच दिवसांत २०० तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी ९० टक्के तक्रारींचा निपटारा झाला आहे. मात्र काही  रिपीटर विद्यार्थ्यांनी फ्रेश विद्यार्थी म्हणून अर्ज भरला, अशावेळी मदत कक्षांकडे पूर्ण अधिकार नसल्यामुळे तक्रार पुण्याला पाठविण्याशिवाय पर्याय नसतो, असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले.

विभागातील प्रत्येक मदत कक्षांना त्यांच्या कामाची व्याप्ती वाढवून दिली आहे. काही प्रमाणात त्यांना अधिकार बहाल केले आहेत. राज्यात  शुक्रवारी एकाच दिवशी ६०० तक्रारी  प्राप्त झाल्या. त्या सर्व सोडवल्या आहेत.-श्रीराम पानझडे, सहशिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण विभाग

टॅग्स :collegeमहाविद्यालयEducationशिक्षण