शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशात तांत्रिक विघ्नेच फार; मुंबईत २००, तर राज्यात १३ हजार तक्रारी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 08:57 IST

या सर्व तक्रारी १०० टक्के सोडवल्या जातील, असे शिक्षण विभागाचे सहसंचालक श्रीराम पानझडे यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: इयत्ता अकरावीच्या कॉलेज प्रवेशासाठी सरकारने प्रत्येक विभागामध्ये विद्यार्थ्यांसाठी मदत कक्ष सुरू केले आहेत. मात्र, या कक्षांना मर्यादित अधिकार असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्यांचे पुणे कार्यालयाकडून निराकरण होईपर्यंत वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप होत आहे. दरम्यान, आतापर्यंत मुंबईत २००, तर राज्यभरात १३ हजार तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. या सर्व तक्रारी १०० टक्के सोडवल्या जातील, असे शिक्षण विभागाचे सहसंचालक श्रीराम पानझडे यांनी सांगितले.

अकरावी प्रवेश  प्रक्रियेत शनिवारी सायंकाळपर्यंत नऊ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी राज्यभरात नोंदणी केली. सुरुवातीचे एक-दोन दिवस ठीक गेले. नंतर मात्र संकेतस्थळ हँग होण्याचे प्रकार  वारंवार घडू लागले. तसेच २७ व २८  मे या दोन दिवसांत विद्यार्थ्यांनी शुल्क भरल्यानंतर त्यांना त्याबाबतचा संदेश येईनासा झाला.  लॉगिन आयडी, पासवर्ड विसरणे, डमी विद्यार्थ्याने अर्ज करणे किंवा अर्ज भरतानाच डबल स्पेस दिली जाणे, अशा तांत्रिक कारणामुळे विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात अडथळे निर्माण झाले.

‘रिपीटर’कडून फ्रेश म्हणून अर्ज

मुंबईमध्ये २६ मेपासून पाच दिवसांत २०० तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी ९० टक्के तक्रारींचा निपटारा झाला आहे. मात्र काही  रिपीटर विद्यार्थ्यांनी फ्रेश विद्यार्थी म्हणून अर्ज भरला, अशावेळी मदत कक्षांकडे पूर्ण अधिकार नसल्यामुळे तक्रार पुण्याला पाठविण्याशिवाय पर्याय नसतो, असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले.

विभागातील प्रत्येक मदत कक्षांना त्यांच्या कामाची व्याप्ती वाढवून दिली आहे. काही प्रमाणात त्यांना अधिकार बहाल केले आहेत. राज्यात  शुक्रवारी एकाच दिवशी ६०० तक्रारी  प्राप्त झाल्या. त्या सर्व सोडवल्या आहेत.-श्रीराम पानझडे, सहशिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण विभाग

टॅग्स :collegeमहाविद्यालयEducationशिक्षण