शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

"पण बरेच झाले, लोकांचे डोळे उघडतात..."; 'लाडकी बहीण' योजनेवरून मनोज जरांगे यांचा सरकारवर निशाणा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 13:37 IST

"... पण, आता अशी एकही बहिण नसेल की, तिला घर नाही किंवा गाडी नाही म्हणून."

काय असते की, सरकार शेतकरी विरोधी आहे की नाही, हे शतकऱ्यांनी पाच वर्षांतच बघायला हवे. खरंच, गोरगरिबांनी एवढे भळभळायला नको आणि पलट्या मारून यांना नीट करायला हवे. आता त्या लाडक्या बहिणींचे नाही का, आधी सरसकट पैसे दिले आणि आता एकाएकीच म्हणताय अटी लावायच्या. तुझ्याकडे घर नाही पाहिजे, फोर व्हीलर नाही पाहिजे, आणखी काही बरंच आहे वाटतं. मला काही जास्त अटी माहीत नाहीत. पण, आता अशी एकही बहिण नसेल की, तिला घर नाही किंवा गाडी नाही म्हणून... आणि आधी नाही का जमलं? आधी बघायचे ना? आधी सरसकट वाढवून टाकले, आता मोकळे झाले. पण बरेच झाले, लोकांचे डोळे उघडतात. की हे वेळेवर किती फसवणूक करतात. जे करतंय ते चांगल्यासाठीच करतेय सरकार, लोकं हुशार व्हायला लागलेत, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. यासंदर्भात बोलताना जरांगे म्हणाले, "हे मागणी केल्याने काही काम करतात का?  जेथे त्यांचे हीत आहे, ते तिकडे बजेट टाकणार. कॉन्ट्रॅक्टरला टाकणार, कंपन्यांना टाकणार, त्यांच्या मित्रांना टाकणार. इकडे गोरगरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही करणार. संपूर्ण बिल माफी नाही करणार, आरक्षण हवे आहे, तेही नाही देणार. त्यांच्या हिशेबानेच अर्थसंकल्प असतो तो."

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आपली काही कर्जमाफीची मागणी आहे का? असे विचारले असता जरांगे म्हणाले, "असायला काय? मला काय कडू लागते का? पण देणार नाहीत ना हो. हे देणारच नाहीत. शेतकरी किती दिवसापासून संकटात आहेत? त्यांचे पीक विमे येत नाहीत. त्यांची नुकसान भरपाई येत नाही आणखी. त्यांचा हक्क त्यांना मिळत नाही, मालाला भाव वाढत नाही. हे सर्व शेतकऱ्यांना बघावेच लागणार आहे."

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलBudgetअर्थसंकल्प 2024ladki bahin yojanaलाडकी बहीण योजना