शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारच्या चहापानावर बहिष्कार; हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांचा सरकारवर घणाघाती आरोप
2
Smriti Mandhana : "आता पुढे जाण्याची वेळ आलीय, मला हे प्रकरण..."; स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं!
3
EMI चा भार हलका होणार! RBI च्या निर्णयापाठोपाठ 'या' ४ बँकांकडून कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात
4
"नवऱ्याने दिला धोका, भारतात दुसरं लग्न..."; पाकिस्तानी महिलेने पंतप्रधान मोदींकडे मागितला न्याय
5
Palash Muchchal : "माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ..."; स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यावर पलाश मुच्छलची पोस्ट
6
66 पैशांच्या स्टॉकचा धमाका, एका महिन्यात पैसा डबल...! खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, सातत्यानं लागतंय अप्पर सर्क्रिट
7
Video: मालिका विजयानंतर विराट कोहलीने सिंहाचलम मंदिरात घेतला भगवान विष्णूचा आशीर्वाद...
8
कोण आहे हा २५ जणांची राखरांगोळी करणाऱ्या क्लबचा मालक सौरभ लुथरा? ४ देश आणि २२ शहरांत क्लबची चेन...
9
नाईट क्लबमध्ये बेली डान्स सुरु होता, वरून आगीचे गोळे पडू लागले...; आग सिलिंडरने नाही तर... गोव्याचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर...
10
फक्त १२% नव्हे! EPFO मध्ये 'या' नियमानुसार जमा करता येतात जास्तीचे पैसे; निवृत्तीनंतर मिळेल मोठा फंड
11
गोवा आग प्रकरणात मोठी कारवाई; क्लबच्या मालकाला अटक, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
12
बनावट कागदपत्रं दाखवून लाटली सरकारी नोकरी, १० वर्षांनंतर फुटलं बिंग, स्टाफ नर्सवर कारवाई
13
गोव्यातील क्लब दुर्घटनेनंतर मोठा प्रश्न! गॅस स्फोटात विम्याचे नियम काय? 'या' चुकीमुळे ५० लाखांचे कवच गमावले!
14
इलॉन मस्कची 'SpaceX' रचणार इतिहास! कंपनीचे मूल्य ७२ लाख कोटींवर पोहोचणार? OpenAI चा रेकॉर्ड मोडणार
15
Video: यशस्वीने विराटला केक भरवला, रोहितकडे येताच हिटमॅन म्हणाला- 'नको रे, परत जाड होईल...'
16
इंडिगोच्या घोळाचा आमदारांनांही फटका, नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकिटं रद्द
17
IND vs SA : टॉस जिंकला नसता तर... विराट-अर्शदीपचा 'सेंच्युरी पे सेंच्युरी' व्हिडिओ व्हायरल
18
अरे व्वा! WhatsApp Call रेकॉर्डिंगसाठी थर्ड-पार्टी Appची गरज नाही! फक्त एक सेटिंग बदला
19
मेट्रोनं प्रवास करणाऱ्या भारतीय युवकाचं एका व्हायरल फोटोनं आयुष्य पालटलं; जाणून घ्या सत्य काय?
20
हायव्होल्टेज ड्रामा! "मी तिच्यासोबत नवरा बनून राहीन"; ३ मुलांच्या आईच्या प्रेमात वेडी झाली तरुणी
Daily Top 2Weekly Top 5

"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 19:00 IST

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत लढण्याचा निर्णय घेतला तर अपक्ष लढू नाहीतर सर्व जागांवर पाडापाडी फिक्स आहे, असं विधान मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलं होतं. त्यावरून आता संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी जरांगे पाटील यांना एक सल्ला दिला आहे

मराठा समाजाला सरसकट ओबीसींमधून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मागच्या वर्षभरापासून आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे राज्यातील राजकारणाची बरीच समिकरणं बदलली आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा कुणाला दणका बसेल आणि कुणाला फायदा होईल, याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत लढण्याचा निर्णय घेतला तर अपक्ष लढू नाहीतर सर्व जागांवर पाडापाडी फिक्स आहे, असं विधान केलं होतं. त्यावरून आता संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगे पाटील यांना एक सल्ला दिला आहे. ‘’जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’ असा सल्ला संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. 

मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया देताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांचा उद्देश आणि माझा उद्देश एकच आहे. त्यामुळे त्यांनी पाडण्यापेक्षा उमेदवार निवडून कसे आणता येतील, हे मी त्यांना समजावून सांगितलेलं आहे.  तसेच मी त्यांना विनंती केली आहे की आपण सगळ्यांनी केवळ चळवळ करून भागणार नाही तर सत्तेत येणं आवश्यक आहे. त्यामुळे पाडण्यापेक्षा तुम्ही सत्तेत येणं आवश्यक आहे. त्यासाठी तुमच्याकडे दोनच पर्याय आहेत. त्यातील पहिला पर्याय म्हणजे आमच्यासोबत येणं आणि दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही स्वत: लढणं. आता जो काही निर्णय असेल तो ते घेतील. पण सकारात्मक चर्चा झाली आहे, एवढं निश्चित आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. 

यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वाटचालीबाबत माहिती देताना संभाजीराजे म्हणाले की,  महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची स्थापना काही दिवसांपूर्वी झाली आहे. त्यानंतर सगळीकडे चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पूर्वी स्वराज्य संघटना म्हणून आम्ही पुढे गेले होतो. आता महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून आम्ही वाटचाल करणार आहोत. स्वराज्य पक्षाचं पहिलंच आंदोलन हे ६ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणार आहे. अरबी समुद्रात नियोजित असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, ज्याचं भूमीपूजन देखील झालं होतं. तिथे ते स्मारक आहे की नाही हे पाहण्यासाठीही आमचं हे आंदोलन असणार आहे. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचं औपचारिकपणे उद्धाटन होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील