शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 19:00 IST

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत लढण्याचा निर्णय घेतला तर अपक्ष लढू नाहीतर सर्व जागांवर पाडापाडी फिक्स आहे, असं विधान मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलं होतं. त्यावरून आता संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी जरांगे पाटील यांना एक सल्ला दिला आहे

मराठा समाजाला सरसकट ओबीसींमधून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मागच्या वर्षभरापासून आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे राज्यातील राजकारणाची बरीच समिकरणं बदलली आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा कुणाला दणका बसेल आणि कुणाला फायदा होईल, याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत लढण्याचा निर्णय घेतला तर अपक्ष लढू नाहीतर सर्व जागांवर पाडापाडी फिक्स आहे, असं विधान केलं होतं. त्यावरून आता संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगे पाटील यांना एक सल्ला दिला आहे. ‘’जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’ असा सल्ला संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. 

मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया देताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांचा उद्देश आणि माझा उद्देश एकच आहे. त्यामुळे त्यांनी पाडण्यापेक्षा उमेदवार निवडून कसे आणता येतील, हे मी त्यांना समजावून सांगितलेलं आहे.  तसेच मी त्यांना विनंती केली आहे की आपण सगळ्यांनी केवळ चळवळ करून भागणार नाही तर सत्तेत येणं आवश्यक आहे. त्यामुळे पाडण्यापेक्षा तुम्ही सत्तेत येणं आवश्यक आहे. त्यासाठी तुमच्याकडे दोनच पर्याय आहेत. त्यातील पहिला पर्याय म्हणजे आमच्यासोबत येणं आणि दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही स्वत: लढणं. आता जो काही निर्णय असेल तो ते घेतील. पण सकारात्मक चर्चा झाली आहे, एवढं निश्चित आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. 

यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वाटचालीबाबत माहिती देताना संभाजीराजे म्हणाले की,  महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची स्थापना काही दिवसांपूर्वी झाली आहे. त्यानंतर सगळीकडे चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पूर्वी स्वराज्य संघटना म्हणून आम्ही पुढे गेले होतो. आता महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून आम्ही वाटचाल करणार आहोत. स्वराज्य पक्षाचं पहिलंच आंदोलन हे ६ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणार आहे. अरबी समुद्रात नियोजित असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, ज्याचं भूमीपूजन देखील झालं होतं. तिथे ते स्मारक आहे की नाही हे पाहण्यासाठीही आमचं हे आंदोलन असणार आहे. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचं औपचारिकपणे उद्धाटन होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील