शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 19:00 IST

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत लढण्याचा निर्णय घेतला तर अपक्ष लढू नाहीतर सर्व जागांवर पाडापाडी फिक्स आहे, असं विधान मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलं होतं. त्यावरून आता संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी जरांगे पाटील यांना एक सल्ला दिला आहे

मराठा समाजाला सरसकट ओबीसींमधून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मागच्या वर्षभरापासून आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे राज्यातील राजकारणाची बरीच समिकरणं बदलली आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा कुणाला दणका बसेल आणि कुणाला फायदा होईल, याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत लढण्याचा निर्णय घेतला तर अपक्ष लढू नाहीतर सर्व जागांवर पाडापाडी फिक्स आहे, असं विधान केलं होतं. त्यावरून आता संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगे पाटील यांना एक सल्ला दिला आहे. ‘’जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’ असा सल्ला संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. 

मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया देताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांचा उद्देश आणि माझा उद्देश एकच आहे. त्यामुळे त्यांनी पाडण्यापेक्षा उमेदवार निवडून कसे आणता येतील, हे मी त्यांना समजावून सांगितलेलं आहे.  तसेच मी त्यांना विनंती केली आहे की आपण सगळ्यांनी केवळ चळवळ करून भागणार नाही तर सत्तेत येणं आवश्यक आहे. त्यामुळे पाडण्यापेक्षा तुम्ही सत्तेत येणं आवश्यक आहे. त्यासाठी तुमच्याकडे दोनच पर्याय आहेत. त्यातील पहिला पर्याय म्हणजे आमच्यासोबत येणं आणि दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही स्वत: लढणं. आता जो काही निर्णय असेल तो ते घेतील. पण सकारात्मक चर्चा झाली आहे, एवढं निश्चित आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. 

यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वाटचालीबाबत माहिती देताना संभाजीराजे म्हणाले की,  महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची स्थापना काही दिवसांपूर्वी झाली आहे. त्यानंतर सगळीकडे चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पूर्वी स्वराज्य संघटना म्हणून आम्ही पुढे गेले होतो. आता महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून आम्ही वाटचाल करणार आहोत. स्वराज्य पक्षाचं पहिलंच आंदोलन हे ६ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणार आहे. अरबी समुद्रात नियोजित असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, ज्याचं भूमीपूजन देखील झालं होतं. तिथे ते स्मारक आहे की नाही हे पाहण्यासाठीही आमचं हे आंदोलन असणार आहे. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचं औपचारिकपणे उद्धाटन होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील