शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

अंतरवालीत पोहोचताच मनोज जरांगेंच्या चार महत्वाच्या सूचना; मराठा समाजाला सांगितले 'काय करायचे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 14:34 IST

Maratha Reservation Jarange Patil Latest Update: मनोज जरांगे पाटलांनी देखील अंतरवाली सराटीमध्ये पोहोचताच घरी न जाता आंदोलनस्थळी समाजाच्या लोकांची सभा बोलविली होती. यामध्ये त्यांनी चार महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. 

रविवारी राज्य शासनाकडून राजपत्र आणि मराठा आरक्षणाचा मसुदा घेऊन मराठा आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली. यानंतर लाखोंच्या संख्येने आलेले मराठा आंदोलक आपापल्या गावी परतले आहेत. मनोज जरांगे पाटलांनी देखील अंतरवाली सराटीमध्ये पोहोचताच घरी न जाता आंदोलनस्थळी समाजाच्या लोकांची सभा बोलविली होती. यामध्ये त्यांनी चार महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. 

अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर होणार आहे. कायदा करण्यासाठी अधिसूचना गरजेची आहे, असे जरांगे पाटील म्हणाले. विरोधकांना हरकती घेऊ द्या आपण सकारात्मक बाजू सांगावी. विरोध करणाऱ्यांना शांततेत उत्तर द्या. मराठ्यांसाठी कायदा फायदेशीर हे सोशल मीडियावरही सांगा, असा संदेश जरांगे यांनी मराठा समाजाला दिला आहे. 

मला माझा समाज महत्त्वाचा आहे कुठलाही नेता महत्त्वाचा नाहीय. काही लोक मराठा समाजाचे आंदोलन मुद्दाम चिघळण्याचा प्रयत्न करत आहेत. आंदोलन संपले नाही तात्पुरते स्थगित केले आहे, असेही जरांगे यांनी मराठा समाजाच्या लोकांसमोर स्पष्ट केले आहे. तसेच आंदोलन सुरु ठेवायचे की नाही असेही जरांगे यांनी उपस्थितांना विचारले, तेव्हा तेथील लोकांनी आंदोलन सुरुच ठेवायचे, असे सांगितले. समाजाच्या भल्यासाठी रक्त सांडलेय. आता शेपूट राहिलेय, असेही जरांगे म्हणाले. 

अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे. उद्या रायगडावर जाण्यासाठी निघणार असून 30 तारखेला शिवरायांना अभिवादन करणार आहोत. प्रत्येक मराठ्याला प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय माघार नाही. सगेसोयऱ्यांबाबतच्या अध्यादेशाची उद्यापासून अंमलबजावणी करावी. मराठ्यांनी 100टक्के आंदोलन जिंकले आहे. कालचा अध्यादेश ओबीसी व मराठा या दोघांसाठी आहे. परिपूर्ण आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नाही. पहिले प्रमाणपत्र मिळाल्यावर भव्य विजयसभा घेणार, असेही जरांगे म्हणाले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील