शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
3
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
4
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
5
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
6
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
7
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
8
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
9
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
10
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
11
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
12
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
13
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
14
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
15
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
16
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
17
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
18
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
19
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
20
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?

“१९ तारखेला अधिवेशन बोलवा अन् कायदा पारित करा, २० तारखेला सर्व चर्चा बंद”: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 11:56 IST

Manoj Jarange Patil: मुंबईला २० जानेवारीला जायचे म्हणजे जायचे. सर्वांनी मुंबईकडे चला, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.

Manoj Jarange Patil: १९ तारखेला अधिवेशन बोलवून त्यात कायदा पारित करा. त्यांचे म्हणणे होते की, फेब्रुवारी महिन्यापर्यंत जाईल. पण त्यांना नाही म्हणालो आहे. हे चर्चेचे गुऱ्हाळ चालत राहणार आहे. वेळकाढूपणा होऊ शकतो. आपण सावध राहायला हवे. त्यामुळे २० तारखेला मुंबईला जाणारच. मुंबईला गेल्यावर चर्चा सगळी बंद होईल. मग सगळे सोयीस्कर होईल. सरकार जर सुतासारखे सरळ करायचे असेल, सरकारला आडमुठी भूमिका सोडायला लावायची असेल, तर मराठ्यांना २० तारखेला मुंबईकडे जावेच लागेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. २० तारखेला मराठा समाजातील बांधव मुंबईकडे कूच करणार आहेत. कोट्यवधी मराठा आंदोलक मुंबई धडकणार असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मीडियाशी बोलताना मनोज जरांगे यांनी सांगितले की, सापडलेल्या ५४ लाख नोंदींवर तातडीने प्रमाणपत्र वितरीत करण्याचा मुद्दा चर्चेत आला. ग्रामपंचायतींमध्ये त्याची यादी लावणे आणि सगेसोयरे शब्दाविषयीही आमची सरकारबरोबर चर्चा झाली. मागेल त्याला मराठ्याला आरक्षण यावरही चर्चा झाली. तसे त्यांना लिहूनही दिले आहे. सापडलेल्या नोंदी अपलोड करून ठेवायला हवे. गावनमुन्याच्या नोंदीही घेण्याबाबत चर्चा झाली. हे सगळे २० तारखेच्या आत करा असे आम्ही सांगितले आहे, अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली. 

मुंबईला २० जानेवारीला जायचे म्हणजे जायचे

सगेसोयरे शब्दावर शासननिर्णय किंवा कायदा पारित करण्यासंदर्भातही सांगितले आहे. आता बघू काय करतात. पण काहीही होवो, मुंबईला २० जानेवारीला जायचे म्हणजे जायचे. आशेवर कुणीही राहायचे नाही, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. आम्ही स्पष्टच सांगितले. ज्याची नोंद मिळाली, त्याच्या रक्ताच्या सगेसोयऱ्यांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. तरच तुमचे-आमचे जमेल. नाहीतर नाही जमणार. नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सगेसोयऱ्यांना लाभ मिळायला हवा. त्यासाठी शासननिर्णय किंवा कायदा पारित केल्याशिवाय ते होणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले. 

दरम्यान, दररोज ९० ते १०० किमीचा प्रवास करायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी चालायचे, इतरांनी गाडीत बसून प्रवास करायचा आहे. ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी त्या मुक्काम स्थळाच्या  शेजारी असलेल्या गावकऱ्यांकडून जेवणाची सोय होणार आहे. पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील शिरुरमध्ये असणार आहे. प्रत्येक मुक्काम डोंगरात असणार आहे. गावात  कोणताही मुक्काम असणर नाही. मराठा समाज मुंबईला जाणारच, मराठ्यांनी मुंबईला जाण्याची तयारी ठेवा. सर्वांनी मुंबईकडे चला, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील