शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

“१९ तारखेला अधिवेशन बोलवा अन् कायदा पारित करा, २० तारखेला सर्व चर्चा बंद”: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 11:56 IST

Manoj Jarange Patil: मुंबईला २० जानेवारीला जायचे म्हणजे जायचे. सर्वांनी मुंबईकडे चला, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.

Manoj Jarange Patil: १९ तारखेला अधिवेशन बोलवून त्यात कायदा पारित करा. त्यांचे म्हणणे होते की, फेब्रुवारी महिन्यापर्यंत जाईल. पण त्यांना नाही म्हणालो आहे. हे चर्चेचे गुऱ्हाळ चालत राहणार आहे. वेळकाढूपणा होऊ शकतो. आपण सावध राहायला हवे. त्यामुळे २० तारखेला मुंबईला जाणारच. मुंबईला गेल्यावर चर्चा सगळी बंद होईल. मग सगळे सोयीस्कर होईल. सरकार जर सुतासारखे सरळ करायचे असेल, सरकारला आडमुठी भूमिका सोडायला लावायची असेल, तर मराठ्यांना २० तारखेला मुंबईकडे जावेच लागेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. २० तारखेला मराठा समाजातील बांधव मुंबईकडे कूच करणार आहेत. कोट्यवधी मराठा आंदोलक मुंबई धडकणार असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मीडियाशी बोलताना मनोज जरांगे यांनी सांगितले की, सापडलेल्या ५४ लाख नोंदींवर तातडीने प्रमाणपत्र वितरीत करण्याचा मुद्दा चर्चेत आला. ग्रामपंचायतींमध्ये त्याची यादी लावणे आणि सगेसोयरे शब्दाविषयीही आमची सरकारबरोबर चर्चा झाली. मागेल त्याला मराठ्याला आरक्षण यावरही चर्चा झाली. तसे त्यांना लिहूनही दिले आहे. सापडलेल्या नोंदी अपलोड करून ठेवायला हवे. गावनमुन्याच्या नोंदीही घेण्याबाबत चर्चा झाली. हे सगळे २० तारखेच्या आत करा असे आम्ही सांगितले आहे, अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली. 

मुंबईला २० जानेवारीला जायचे म्हणजे जायचे

सगेसोयरे शब्दावर शासननिर्णय किंवा कायदा पारित करण्यासंदर्भातही सांगितले आहे. आता बघू काय करतात. पण काहीही होवो, मुंबईला २० जानेवारीला जायचे म्हणजे जायचे. आशेवर कुणीही राहायचे नाही, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. आम्ही स्पष्टच सांगितले. ज्याची नोंद मिळाली, त्याच्या रक्ताच्या सगेसोयऱ्यांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. तरच तुमचे-आमचे जमेल. नाहीतर नाही जमणार. नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सगेसोयऱ्यांना लाभ मिळायला हवा. त्यासाठी शासननिर्णय किंवा कायदा पारित केल्याशिवाय ते होणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले. 

दरम्यान, दररोज ९० ते १०० किमीचा प्रवास करायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी चालायचे, इतरांनी गाडीत बसून प्रवास करायचा आहे. ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी त्या मुक्काम स्थळाच्या  शेजारी असलेल्या गावकऱ्यांकडून जेवणाची सोय होणार आहे. पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील शिरुरमध्ये असणार आहे. प्रत्येक मुक्काम डोंगरात असणार आहे. गावात  कोणताही मुक्काम असणर नाही. मराठा समाज मुंबईला जाणारच, मराठ्यांनी मुंबईला जाण्याची तयारी ठेवा. सर्वांनी मुंबईकडे चला, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील