शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

"मनात असलं तर काहीही...."; शरद पवार-मराठा समन्वयकांच्या बैठकीवर मनोज जरांगे थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 10:54 IST

मराठा आरक्षणावरून राज्य सरकार आणि विरोधक या दोघांवर मनोज जरांगे पाटील यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 

छत्रपती संभाजीनगर - मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी मविआ-महायुतीनं एकत्रित निर्णय घेतला पाहिजे. फक्त घुमवा घुमवी नको. आरक्षण द्यायचं असेल तर काही लागत नाही. मनात असल्यावर काहीही करता येते. उगाच काही तरी सांगायचे आणि दिशाभूल करावी यात काही अर्थ नाही. एकमेकांत गैरसमज पसरवण्याचं काम आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही हे ठरवायचंय असं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समन्वयक आणि शरद पवार यांच्या भेटीवर भाष्य केले. छत्रपती संभाजीनगर येथे मनोज जरांगे पाटील यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

मराठा आरक्षणावर सरकारने पुढाकार घेऊन लाईव्ह चर्चा घडवून आणणं गरजेचे आहे. या चर्चेसाठी सत्ताधारी, विरोधकांसोबत जरांगे, लक्ष्मण हाके यांच्यासह मराठा, ओबीसी नेत्यांना बोलावावं, या चर्चेतून जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल असं शरद पवारांनी म्हटलं होतं, त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, लाईव्ह नव्हे तर डोंगरावर जाऊन एकमेकांशी ओरडाओरड करून चर्चा करावी पण आम्हाला आरक्षण पाहिजे. इतकं येड्यात काढायचं नाही. कोलवाकोलवी करायची नाही. आरक्षणासाठी भेटीगाठी होत नाहीत असा टोला जरांगेंनी लगावला. 

तसेच मराठ्यांना आरक्षण देणे गरजेचे आहे. आपल्याला मुर्ख कोण बनवतंय हे सहज लोकांना कळते. आधी अशिक्षितपणा होता, मात्र आता लगेच कोण कसं वागतंय हे कळतं. गोरगरिबांना न्याय द्यायचा असेल तर एकत्र यायला हवं. जातीला न्याय दिला पाहिजे. तुम्हाला जे काही करायचे करा आम्हाला आरक्षण हवं. ७०-७५ वर्षापासून सगळेच गोरगरिब मराठ्यांना वेड्यात काढतायेत. लोकांच्या मनात खूप खदखद आहे. सगळ्या जातीजमातीत खदखद आहे असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितले.

दरम्यान, आम्ही कधीही महाविकास आघाडी, महायुती यांना विरोधक मानलं नाही. मराठ्यांची त्सुनामी उसळली आहे त्या लाटेत सर्व वाहून जाणार आहेत. माझा मराठा एक झालेला राजकीय लोकांना पचत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा एकत्र आल्याचं त्यांनी कधी पाहिलेले नाही. सत्ताधारी-विरोधक हे केवळ गैरसमज पसरवतायेत. आपल्याला कुणी मॅनेज होत नसेल तर त्याला फसवायचे. माझ्या समाजाने तुमच्या नेत्यांच्या हमाल्या करायच्या का?,  विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांचे हे समाजासाठी नाटक आहे. समाजात गोंधळ निर्माण करुन गैरसमज पसरवण्याचे षडयंत्र आहे. समाजाला वेड्यात काढण्यासाठी हा चालुपणा आहे असा आरोपही मनोज जरांगे पाटलांनी केला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणSharad Pawarशरद पवार