शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

“सरकारने किती बळी घ्यायचे ठरवले?”; मराठा आरक्षणप्रश्नी मुंबईत आत्महत्या, मनोज जरांगेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 15:24 IST

Maratha Reservation Manoj Jarange Patil: या आत्महत्येला फक्त सरकार जबाबदार आहे. २४ तारखेनंतर होणारे आंदोलन सरकारला परवडणार नाही, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला.

Maratha Reservation Manoj Jarange Patil:मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत एका मराठा युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षापासून समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यात अनेकांचे बळीही गेले आहेत. त्यामुळे सरकारने आता तरी जागे व्हावे अशी मागणी मराठा समाज करत आहे. यातच मराठा आरक्षणप्रश्नी नेतृत्व करणारे मनोज जरांगे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. 

जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय युवक सुनील बाबुराव कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली, अशी माहिती मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ट्विट करून दिली. या आत्महत्या प्रकरणी मनोज जरांगे यांनी सरकारवर संताप व्यक्त केला. सरकारने बळी घ्यायचे का ठरवले आहे हे कळत नाही. सरकारमुळे बळी पडायला लागले आहेत, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. 

आत्महत्या करायला लागले तर आरक्षण घेऊन उपयोग काय? 

भावांनो आरक्षण मिळणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही. खूप वर्ष दम धरला आहे. थोडे दिवस आणखी दम धरा. तुमच्या पायाला हात लावून सांगतो पोरं जायला लागले, आत्महत्या करायला लागले तर आरक्षण घेऊन उपयोग काय? तुम्ही दम धरा. पण हे सगळे पाप सरकारचे आहे. सरकारला किती मुडदे पाडायचे आहेत माहिती नाही. एक माणूस कमी झाला. याला पूर्ण जबाबदार सरकार आहे. आता तरी त्याचे बलिदान वाया जाऊ देऊ नये. सरकारने आता तातडीने मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा. २४ तारखेनंतर होणारे आंदोलन सरकारला परवडणार नाही, असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे यांनी दिला. 

दरम्यान, या आत्महत्येला फक्त सरकार जबाबदार आहे. आमच्या हक्काचा असणारा विषय ताबडतोब मिटवला तर ही वेळ येणारच नाही. मराठा समाजाचा अंत सरकारने पाहू नये. २४ तारखेनंतर होणारे शांततेचे आंदोलन सरकारला स्वस्थ बसू देणार नाही. असे काही ऐकल्यानंतर खूप वेदना होतात. या वेदना थोडे दिवस सहन करा. पाया पडून सांगतो कोणी आत्महत्या करू नका. आमच्या परिवारातील आमचा भाऊ गेला आहे. आमचा माणूस गेला आहे तो परत येणार नाही. सरकारने तातडीने आरक्षण द्या, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील