शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

मनोज जरांगेंनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा; म्हणाले, “...तर सगळे मराठे अयोध्येला जाणार”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 14:33 IST

Manoj Jarange Patil News: राम मंदिराचे काम अर्धवट झाले आहे, तरी तुम्ही तीच तारीख का निवडली, अशी शंका आम्ही कधी उपस्थित केली नाही, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil News ( Marathi News ): आम्ही कट्टर हिंदू आहोत. अमूकच तारीख का निवडली, याचा आणि राम मंदिर लोकार्पणाचा काही संबंध नाही. मुंबईत मुद्दामहून १८ तारखेपर्यंत जमावबंदी लागू केली. त्यामुळे आम्ही २० तारीख निवडली. अयोध्येत राम मंदिर होत आहे, याचा आम्हालाही तितकाच आनंद आहे. आम्ही मुंबईत आनंद व्यक्त करू, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराचे लोकार्पण केले जाणार आहे. मात्र, नेमकी हीच वेळ मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्यासाठी निवडली, असा आरोप केला जात आहे. यावर मनोज जरांगे यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. 

मीडियाशी बोलताना, छत्रपती शिवरायांच्या काळात जास्त महत्व ध्येय आणि विचारांना दिले जात होते. त्याचप्रमाणे आमचे ध्येय आणि सूत्र ठरले आहे. गोरगरीब मराठ्यांच्या ध्येयांसाठी आम्ही काम करतो आहे, असे सांगत मनोज जरांगे यांनी नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, देव मनात असायला हवा. सगळे तिथे पोहोचू शकत नाही. सामान्य शेतकरी शेतातून राम-राम म्हणतो. एकमेकांना भेटल्यावर राम-राम म्हणतो. राम मंदिराचे काम अर्धवट झाले आहे, तरी तुम्ही तीच तारीख का निवडली, अशी शंका आम्ही कधी उपस्थित केली नाही. श्रीरामावर तुमच्यापेक्षा आमची जास्त आस्था आहे. २० तारखेला सगळा मराठा पायी चालण्यास सुरुवात करेल, तेव्हा २२ तारखेला सगळेच जण राम मंदिराच्या लोकार्पणाचा आनंद व्यक्त करणार आहेत. आम्हीही त्या आनंदात सहभागी आहोत. गेल्या चार महिन्यांपासून आमचे आंदोलन सुरू आहे. विविध टप्प्यांवर आंदोलन सुरू आहे. सरकारशी चर्चा सुरू आहे, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

सरकार मुद्दामहून असे पसरवतेय, असा समज होईल

प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घेऊन मराठे मुंबईकडे निघणार आहेत. आम्ही इकडे आनंद व्यक्त करतो. हे सगळ्यांना मान्य आहे. असे काही जोडू नका. अन्यथा सरकार मुद्दामहून असे पसरवतेय, असा समज समाजात होईल आणि सरकारविषयी नाराजी वाढेल, असे नमूद करत, सरकारने कोणाचीही वाहने अडवू नयेत.आंतरवालीचे प्रयोग करण्याचा पुन्हा प्रयत्न करू नये. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना विनंती आहे, तुम्ही त्या भानगडीत पडू नका. मुंबईकडे मराठे शांतपणे येणार आहेत आणि शांतपणे परत जाणार आहेत. एखादे वाहन जरी अडवले तरी तिघांच्या दारात जाऊन लाखो मराठे बसतील. मुंबईसह नागपूर, बारामती या ठिकाणी जाऊन तिघांच्या दारात बसू. घराला वेढा दिला जाईल, असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे यांनी दिला. 

मनोज जरांगे पाटील अयोध्येत जाऊन श्रीरामांचे दर्शन घेणार का?

अयोध्येत जाण्याबाबत मनोज जरांगे यांना प्रयत्न विचारण्यात आला. यावर सकारात्मक उत्तर देत, श्रीरामांनी सरकारला सुबुद्धी द्यावी. श्रीरामांच्या चरणी आमची विनंती आहे, साकडे आहे की, केंद्रापासून राज्य सरकारपर्यंत सर्वांना सद्बुद्धी द्यावी. २० तारखेच्या आत आम्हाला आरक्षण द्या. मग मराठे मोकळे झाले, तिकडे यायला. मग काही अडचण नाही. मनोज जरांगेसह सगळे मराठे अयोध्येत दर्शनासाठी जातील. पण काही झाले तरी आरक्षण सोडणार नाही, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

दरम्यान, आम्ही ठरवले आहे आता महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेणार. आमचा जीव गेला तरीही मुंबईचे आंदोलन होणारच. लाठीचार्जमध्ये हात-पाय मोडले गेले. मी ते काहीही विसरलो नाही. आंतरवाली सराटीच्या लाठीचार्जची आठवण आली की आजही माझ्या अंगावर काटा येतो. त्या किंकाळ्या इतक्या होत्या की गाव हादरले होते. मोठा आवाज, रक्ताने माखलेली जागा, धूर, लाठीचार्ज, माता माऊलींच्या किंकाळ्या, अमानुष लाठीचार्ज ही घटना आठवली की सरकारचे तोंडही पाहू नये असे वाटते. पण आता गाव त्याच ताकदीने पेटून उठले आहे. जे रक्त सांडले त्याचे बळ निर्माण झाले आहे. तो विषय काढण्यासारखा नाही. ज्या मातामाऊलींचे रक्त सांडले आहे ते वाया जाऊ देणार नाही. या समाजासाठी मरेपर्यंत गद्दारी करणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर