शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगेंनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा; म्हणाले, “...तर सगळे मराठे अयोध्येला जाणार”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 14:33 IST

Manoj Jarange Patil News: राम मंदिराचे काम अर्धवट झाले आहे, तरी तुम्ही तीच तारीख का निवडली, अशी शंका आम्ही कधी उपस्थित केली नाही, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil News ( Marathi News ): आम्ही कट्टर हिंदू आहोत. अमूकच तारीख का निवडली, याचा आणि राम मंदिर लोकार्पणाचा काही संबंध नाही. मुंबईत मुद्दामहून १८ तारखेपर्यंत जमावबंदी लागू केली. त्यामुळे आम्ही २० तारीख निवडली. अयोध्येत राम मंदिर होत आहे, याचा आम्हालाही तितकाच आनंद आहे. आम्ही मुंबईत आनंद व्यक्त करू, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराचे लोकार्पण केले जाणार आहे. मात्र, नेमकी हीच वेळ मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्यासाठी निवडली, असा आरोप केला जात आहे. यावर मनोज जरांगे यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. 

मीडियाशी बोलताना, छत्रपती शिवरायांच्या काळात जास्त महत्व ध्येय आणि विचारांना दिले जात होते. त्याचप्रमाणे आमचे ध्येय आणि सूत्र ठरले आहे. गोरगरीब मराठ्यांच्या ध्येयांसाठी आम्ही काम करतो आहे, असे सांगत मनोज जरांगे यांनी नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, देव मनात असायला हवा. सगळे तिथे पोहोचू शकत नाही. सामान्य शेतकरी शेतातून राम-राम म्हणतो. एकमेकांना भेटल्यावर राम-राम म्हणतो. राम मंदिराचे काम अर्धवट झाले आहे, तरी तुम्ही तीच तारीख का निवडली, अशी शंका आम्ही कधी उपस्थित केली नाही. श्रीरामावर तुमच्यापेक्षा आमची जास्त आस्था आहे. २० तारखेला सगळा मराठा पायी चालण्यास सुरुवात करेल, तेव्हा २२ तारखेला सगळेच जण राम मंदिराच्या लोकार्पणाचा आनंद व्यक्त करणार आहेत. आम्हीही त्या आनंदात सहभागी आहोत. गेल्या चार महिन्यांपासून आमचे आंदोलन सुरू आहे. विविध टप्प्यांवर आंदोलन सुरू आहे. सरकारशी चर्चा सुरू आहे, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

सरकार मुद्दामहून असे पसरवतेय, असा समज होईल

प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घेऊन मराठे मुंबईकडे निघणार आहेत. आम्ही इकडे आनंद व्यक्त करतो. हे सगळ्यांना मान्य आहे. असे काही जोडू नका. अन्यथा सरकार मुद्दामहून असे पसरवतेय, असा समज समाजात होईल आणि सरकारविषयी नाराजी वाढेल, असे नमूद करत, सरकारने कोणाचीही वाहने अडवू नयेत.आंतरवालीचे प्रयोग करण्याचा पुन्हा प्रयत्न करू नये. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना विनंती आहे, तुम्ही त्या भानगडीत पडू नका. मुंबईकडे मराठे शांतपणे येणार आहेत आणि शांतपणे परत जाणार आहेत. एखादे वाहन जरी अडवले तरी तिघांच्या दारात जाऊन लाखो मराठे बसतील. मुंबईसह नागपूर, बारामती या ठिकाणी जाऊन तिघांच्या दारात बसू. घराला वेढा दिला जाईल, असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे यांनी दिला. 

मनोज जरांगे पाटील अयोध्येत जाऊन श्रीरामांचे दर्शन घेणार का?

अयोध्येत जाण्याबाबत मनोज जरांगे यांना प्रयत्न विचारण्यात आला. यावर सकारात्मक उत्तर देत, श्रीरामांनी सरकारला सुबुद्धी द्यावी. श्रीरामांच्या चरणी आमची विनंती आहे, साकडे आहे की, केंद्रापासून राज्य सरकारपर्यंत सर्वांना सद्बुद्धी द्यावी. २० तारखेच्या आत आम्हाला आरक्षण द्या. मग मराठे मोकळे झाले, तिकडे यायला. मग काही अडचण नाही. मनोज जरांगेसह सगळे मराठे अयोध्येत दर्शनासाठी जातील. पण काही झाले तरी आरक्षण सोडणार नाही, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

दरम्यान, आम्ही ठरवले आहे आता महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेणार. आमचा जीव गेला तरीही मुंबईचे आंदोलन होणारच. लाठीचार्जमध्ये हात-पाय मोडले गेले. मी ते काहीही विसरलो नाही. आंतरवाली सराटीच्या लाठीचार्जची आठवण आली की आजही माझ्या अंगावर काटा येतो. त्या किंकाळ्या इतक्या होत्या की गाव हादरले होते. मोठा आवाज, रक्ताने माखलेली जागा, धूर, लाठीचार्ज, माता माऊलींच्या किंकाळ्या, अमानुष लाठीचार्ज ही घटना आठवली की सरकारचे तोंडही पाहू नये असे वाटते. पण आता गाव त्याच ताकदीने पेटून उठले आहे. जे रक्त सांडले त्याचे बळ निर्माण झाले आहे. तो विषय काढण्यासारखा नाही. ज्या मातामाऊलींचे रक्त सांडले आहे ते वाया जाऊ देणार नाही. या समाजासाठी मरेपर्यंत गद्दारी करणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर